शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

सेवाज्येष्ठतेसुनार पदोन्नती आदेश रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:39 IST

कराड : नुकताच पदोन्नतीतील आरक्षणाबाबत समिती अध्यक्ष आणि मंडळींनी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती असा निर्णय घेतला आहे. अर्थात, पदोन्नतीतील एससी, एसटी, ...

कराड : नुकताच पदोन्नतीतील आरक्षणाबाबत समिती अध्यक्ष आणि मंडळींनी सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती असा निर्णय घेतला आहे. अर्थात, पदोन्नतीतील एससी, एसटी, भटक्या विमुक्तांचे आरक्षणावर गदारोळ येणार आहे, तरी सदरचा आदेश रद्द करावा. अशी मागणी राज्यस्तरीय माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड.दीपक माळी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

माळी म्हणाले, आदेश रद्द होऊ शकत नसल्यास, त्या समितीवर अध्यक्ष म्हणून कशासाठी राहायचे, ते ज्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्या त्यांच्या निर्णयाने संबंधित एससी,एसटी, भटक्या विमुक्त वर्गाचे हित होणे गरजेचे आहे. हित होण्याऐवजी नुकसान होत असल्यास त्यांनी त्या समितीच्या अध्यक्षपदावर का राहावे, अध्यक्ष मागासवर्गीयांची बाजू घेऊ शकत नसतील, तर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.

एखाद्या समितीचा अध्यक्ष नेमताना त्या वर्गाच्या हिताचे रक्षण व्हावे, म्हणूनच नेमणूक केली असेल ना? सन १९७४ पासून लागू असलेल्या पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात २००१ पासून प्रयत्न केले होते. याचा परिणाम म्हणून २००४ मध्ये तसा ठराव महाराष्ट्र विधानसभेत संमत केला होता. त्यानुसार, २५ मे, २००४ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आले. या संदर्भात राज्य सरकारची विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, राज्य सरकारने गेल्या ७ मे रोजी हा शासन निर्णय जारी केल्याने राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीवर गंडांतर आले आहे. यावेळी राज्यस्तरीय माळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस प्रवीण जांभळे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे नाही घेतला, तर प्रसंगी न्यायालयीन लढा उभारू, असा इशारा दिला आहे.