शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

जिल्ह्यात ७५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

वाठार स्टेशन : जिल्ह्यात यंदा किसन वीर उद्योग समूहाचा प्रतापगड कारखाना वगळता पंधरा कारखान्यांचे गाळप सध्या ...

वाठार स्टेशन : जिल्ह्यात यंदा किसन वीर उद्योग समूहाचा प्रतापगड कारखाना वगळता पंधरा कारखान्यांचे गाळप सध्या वेगाने सुरू आहे. यातून आजअखेर जिल्ह्यात ६९ लाख १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ७५ लाख ४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

जिल्ह्यात मागील वर्ष सोडता सलग दोन वर्षांत शंभर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. या तुलनेत यंदाही साखर उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनाचा टप्पा सहज पार होईल, अशी परस्थिती आहे. एका बाजूने साखर उत्पादन वाढत असताना दुसऱ्या बाजूने मात्र शेतकऱ्याला ऊस दर देण्याबाबतीत अनेक कारखाने उदासीन आहेत. एकरकमी एफआरपी दर देण्याची मानसिकता अनेक कारखानदारांची दिसत नाही. दोन ते तीन टप्प्यांत एफआरपी देण्यासाठी कारखान्यांनी शेतकऱ्यांना बांधून घेतले आहे. शरयू कारखान्याने तर एफआरपीला कोलदांडा लावत अवघ्या २ हजार १०० रुपयांचे पेमेंट दोन महिन्यांनंतर देत शेतकऱ्यांना फसवण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यामुळे या कारखान्याबाबत शेतकरी उदासीन आहेत.

जिल्ह्यात १८ फेब्रुवारीअखेर फलटण तालुक्यातील श्रीराम जवाहर कारखान्याने ३ लाख ४३ हजार ६३२ मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ९७ हजार ४०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. न्यू फलटण साखरवाडीने ३ लाख ३८ हजार ८९५ मेट्रिक टन गाळप करीत ३ लाख ९७ हजार ६४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. शरयू शुगरने ६ लाख ४ हजार ६ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ५ लाख ७१ हजार ४५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

स्वराज इंडिया फलटणने ५ लाख ३४ हजार ९०५ मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ३१ हजार २७५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगरने जिल्ह्यात सर्वात जास्त गाळप केले. यात ९ लाख ५९ हजार १२० मेट्रिक टन गाळप करीत १० लाख २९ हजार ८५० लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

माण-खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर ३ लाख ९७ हजार २८० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ४२ हजार ६०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. खटाव-माण कारखान्याने ४ लाख ५५ हजार ३१० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ८३ हजार २६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. जयवंत शुगर कऱ्हाडने ४ लाख ५७ हजार ०७० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ८८ हजार २५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा कऱ्हाडने ७ लाख ९८ हजार ५६० मेट्रिक टन गाळप करीत ९ लाख ५२ हजार १४० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सह्याद्री कऱ्हाडने ७ लाख ८३ हजार ५०० मेट्रिक टन गाळप करीत ९ लाख ६६ हजार ४५० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

रयत कऱ्हाड कारखान्याने ३ लाख ५५ हजार ४२० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख २२ हजार २७० लाख क्विंटल साखर उत्पादित केली. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने १ लाख ५८ हजार ८७५ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत १ लाख ८८ हजार ४०० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्याने ४ लाख ३५ हजार ३५० मेट्रिक टन गाळप करीत ४ लाख ९० हजार ६३० लाख मेट्रिक टन उत्पादित केली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना भुईजने २ लाख ८० हजार १२० मे टन गाळप करीत २ लाख ३९ हजार ८६० लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नुकताच किसन वीर कारखान्याचा खंडाळा कारखाना सुरू करण्यात आला असून, या कारखान्याने ११ हजार १९० मेट्रिक टन गाळप करीत २ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदा मागील वर्षीची एफआरपी न दिल्याबद्दल प्रतापगड कारखाना बंद आहे.