शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गाड्या परत देण्याची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एवढ्या दिवस घरात असलेले नागरिक रस्त्यावर आले. परिणामी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ...

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे एवढ्या दिवस घरात असलेले नागरिक रस्त्यावर आले. परिणामी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडवला गेला. अनेकांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. पहिल्या दिवशीच ही स्थिती असेल तर यापुढे आणखी काय होईल, याची चिंता आता प्रशासनाला लागली आहे. अनलॉक झाले असले तरी नागरिकांनी बेफिकीर वागू नये, अन्यथा कोरोनाची ही दुसरी लाट जिवावर उठेल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

..........

गाड्यांच्या बॅटरी खराब

लॉकडाऊनमुळे अनेक दिवस चारचाकी गाड्या घरातील पार्किंगमध्ये धूळ खात पडून होत्या. अनेकांनी या गाड्या सुरू करण्याचा प्रयत्न केला असता गाड्यांच्या बॅटरी खराब झाल्याचे समोर आले. त्यामुळे कारचालकांना गॅरेजमधून दुरुस्ती करण्याला बोलवावे लागले. अनेकांनी बॅटरी खराब झाल्यामुळे नवीन बॅटरी टाकल्या, तर काहीनी बॅटरी चार्ज केली. नवीन बॅटरी खरेदी करताना मनमानी दर आकारले गेल्याने वाहनचालकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

......

गाड्या परत देण्याची प्रक्रिया सुरू

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या गाड्या जप्त करण्याचा सपाटा लावला होता. जिल्ह्यात जवळपास पोलिसांनी ७६७ वाहने जप्त केली आहेत. ही वाहने आता परत देण्याची प्रक्रिया पोलिसांकडून लवकरच सुरू होणार आहे. काही पोलीस ठाण्याकडून या गाड्या आता परत देण्यात येत आहेत. गाड्या घरी आणण्यासाठी अनेक जणांनी सोमवारी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. मात्र दंड भरल्याशिवाय कोणालाही गाडी दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

...................................................................................