शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पालिकेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी !

By admin | Updated: November 13, 2016 01:14 IST

वैशाली बोले-दुबळे : दोन्ही आघाड्यांनी नगराध्यक्षांना रबर स्टॅम्प केल्याचा आरोप

सातारा : ‘शहरात पार्किंग व्यवस्था नाही. बागा, खेळाची मैदाने यांची सोय चांगल्या पद्धतीची नाही. अनेक ठिकाणी खेळासाठी राखीव असणारी जागा दोन्ही आघाड्यांच्या बगलबच्च्यांनी लाटली आहेत. विकासासाठी मला काय मिळते, याकडेच नगरसेवकांचे लक्ष असते. दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रतोद आणि इतर दोघे असे एकूण चार-सहा जण पालिकेचा कारभार पाहतात. मात्र सातारा पालिका ‘प्रायव्हेट लिमिटेड’ करण्याचा काहींचा हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही,’ अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली बोले-दुबळे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केली.वैशाली बोले म्हणाल्या, ‘नगराध्यक्षपद पाच वर्षांसाठी आहे. त्यातच नगराध्यक्षांना वापरायला मिळणाऱ्या पैशाचे घबाड पाहूनच काहीजण ही निवडणूक लढण्यासाठी उतरलेले आहेत. सर्वसामान्य उमेदवार डोईजड होऊ शकतो, हे लक्षात आल्यानेच नगरविकास आघाडीतर्फे स्वत: वेदांतिकाराजे भोसले निवडणूक लढवत आहेत. त्या साताऱ्याच्या नगराध्यक्ष झाल्या तर पालिकेचा कारभार पालिकेच्या इमारतीतून नव्हे तर ‘सुरुची’वरून चालेल. सर्वसामान्य माणसांना समस्या घेऊन जाणेही कठीण होणार आहे.’‘वर्षानुवर्षे सत्ता केंद्रित झाल्याने साताऱ्याचा विकास थांबला आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूरच्या दृष्टीने सातारा शहर मागे राहिले आहे. नोकरीसाठी, शिक्षणासाठी इतकेच काय पण दवाखान्यात उपचार घेण्यासाठी देखील सातारकरांना सातारा शहर सोडावे लागत आहे. .’ असा आरोपही त्यांनी केला.सातारा शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया उभा करण्याचा साधा प्रयोगदेखील झाला नाही, असे सांगून बोले म्हणाल्या, ‘४० वर्षे या लोकांनी काय केले, हेच जनतेला कळत नाही. शहराचा नगराध्यक्ष म्हणजे केवळ ‘रबर स्टँप’ राहिला.बाकी सत्तेच्या चाव्या या दोन वाड्यांकडेच राहिल्या आहेत. कमिशन पोहोच झाल्याशिवाय ठेकेदाराला काम मिळत नाही.’ खासदारांनी मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅट्रॉसिटी रद्द करा, अशी मागणी केल्याने मागासवर्गीय लोक भयभीत झाले आहेत. इतर लोकप्रतिनिधी याबाबत शांत राहिले असताना साताऱ्याचे खासदार व आमदार यांनी मराठा मोर्चा आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे इतर मागास समाजही आपले आरक्षण हिरावून घेतले जाईल काय? या चिंतेत आहेत. प्लास्टिक बंदीत कारवाई केली गेल्याने व्यापारी, डॉक्टर नाराज आहेत.बिल्डर लॉबीही वेदांतिकाराजे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाली आहे. पालिकेचे गाळे दोन्ही आघाड्यांनी कार्यकर्त्यांच्या घशात घातले आहेत. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा ‘जलमंदिर’शी रिलेटेड आहे. मात्र, आताच त्या नगराध्यक्ष झाल्याच्या थाटात वावरत आहेत, असा टोलाही बोले यांनी लगावला. (प्रतिनिधी)शहरातील सर्वसामान्य घरातील महिलाही साताऱ्याच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकते, हे दाखवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. निवडणुकीसाठी पैसा लागतो, हे चुकीचं वाक्य मी खोडून काढले आहे. शहरात ४० हजार महिला आहेत. आमदारांना नगराध्यक्षांना आपल्या घरातीलच महिला का दिसली?- वैशाली बोले-दुबळे