शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजअखेर ७५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

By admin | Updated: March 16, 2016 23:40 IST

हंगाम अंतिम टप्प्यात : चौदा कारखान्यांच्या माध्यमातून ६४ मेट्रिक टन उसाचे गाळप

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच वाढलेल्या साखर कारखानदारीमुळे गाळप हंगामाचा समारोप एप्रिलअखेर होत आहे. वेळेत सुरु झालेल्या चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच ऊसदराचे तंत्र शासनाने राबवल्याने कोणत्याही संघर्षाशिवाय या हंगामातील गाळप यशस्वी झाले. आज अखेर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत ७५ लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.एफआरपीनुसार ऊसदर हे तंत्र गतवर्षी यशस्वी ठरल्यानंतर चालू वर्षीच्या गाळप हंगामातही एफआरपीनुसार दर देण्याची भूमिका शासन व साखर आयुक्तांनी घेतली. मात्र बाजारपेठेतील साखरेच्या दराची अस्थिरता विचारात घेता आणि राज्य बँकेचे मिळणारे मूल्यांकन बघता एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नसल्याने एफआरपीचा कायदा बाजूला ठेवत ८०-२० असा नवा फॉम्युला निश्चित केला. त्यानुसार ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत ८० टक्के व गाळप संपण्यापूर्वी उरलेली २० टक्के रक्कम देण्याबाबत सहमती दिली.चालू हंगामात उसाचे क्षेत्र गतवर्षी एवढेच असल्याने मे अखेर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती व पावसाने ओढ दिल्याने उसाचे सरासरी उत्पादनही कमी झाले तर या हंगामात दोन नवीन कारखानेही वाढले, यामुळे महिनाभरातच शिल्लक उसाचे आव्हान पेलण्याचे काम कारखान्याकडून पूर्ण होईल. (वार्ताहर)‘कृष्णा’ने केले सर्वाधिक गाळपआज जिल्ह्यात कृष्णा कारखान्याने सर्वाधिक ९ लाख ३९ हजार ९१० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १० लाख ९२ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर या पाठोपाठ सह्याद्री साखर कारखान्याने ९ लाख २२ हजार ४०० मे. टन उसाचे गाळप पूर्ण करीत ११ लाख ७५ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादित करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर किसन वीर कारखान्याने ५ लाख ६१ हजार ८६० मे. टन उसाचे गाळप करत ६ लाख ३८ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.तोडणी यंत्रणेवर उन्हाचा परिणामसद्य:स्थितीत उन्हाचा दाह वाढत चालला आहे. याचा परिणाम तोडणी यंत्रणेवर होत असून बहुतांशी कारखाने क्षमतेपेक्षा कमी गाळप करू लागले आहेत.