शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

जिल्ह्यात आजअखेर ७५ लाख क्विंटल साखरनिर्मिती

By admin | Updated: March 16, 2016 23:40 IST

हंगाम अंतिम टप्प्यात : चौदा कारखान्यांच्या माध्यमातून ६४ मेट्रिक टन उसाचे गाळप

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच वाढलेल्या साखर कारखानदारीमुळे गाळप हंगामाचा समारोप एप्रिलअखेर होत आहे. वेळेत सुरु झालेल्या चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात गतवर्षीप्रमाणेच ऊसदराचे तंत्र शासनाने राबवल्याने कोणत्याही संघर्षाशिवाय या हंगामातील गाळप यशस्वी झाले. आज अखेर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ६४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत ७५ लाख क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.एफआरपीनुसार ऊसदर हे तंत्र गतवर्षी यशस्वी ठरल्यानंतर चालू वर्षीच्या गाळप हंगामातही एफआरपीनुसार दर देण्याची भूमिका शासन व साखर आयुक्तांनी घेतली. मात्र बाजारपेठेतील साखरेच्या दराची अस्थिरता विचारात घेता आणि राज्य बँकेचे मिळणारे मूल्यांकन बघता एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना शक्य नसल्याने एफआरपीचा कायदा बाजूला ठेवत ८०-२० असा नवा फॉम्युला निश्चित केला. त्यानुसार ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत ८० टक्के व गाळप संपण्यापूर्वी उरलेली २० टक्के रक्कम देण्याबाबत सहमती दिली.चालू हंगामात उसाचे क्षेत्र गतवर्षी एवढेच असल्याने मे अखेर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी भागात दुष्काळी परिस्थिती व पावसाने ओढ दिल्याने उसाचे सरासरी उत्पादनही कमी झाले तर या हंगामात दोन नवीन कारखानेही वाढले, यामुळे महिनाभरातच शिल्लक उसाचे आव्हान पेलण्याचे काम कारखान्याकडून पूर्ण होईल. (वार्ताहर)‘कृष्णा’ने केले सर्वाधिक गाळपआज जिल्ह्यात कृष्णा कारखान्याने सर्वाधिक ९ लाख ३९ हजार ९१० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १० लाख ९२ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तर या पाठोपाठ सह्याद्री साखर कारखान्याने ९ लाख २२ हजार ४०० मे. टन उसाचे गाळप पूर्ण करीत ११ लाख ७५ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादित करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे, तर किसन वीर कारखान्याने ५ लाख ६१ हजार ८६० मे. टन उसाचे गाळप करत ६ लाख ३८ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.तोडणी यंत्रणेवर उन्हाचा परिणामसद्य:स्थितीत उन्हाचा दाह वाढत चालला आहे. याचा परिणाम तोडणी यंत्रणेवर होत असून बहुतांशी कारखाने क्षमतेपेक्षा कमी गाळप करू लागले आहेत.