शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

प्रतापगड कारखाना भविष्यात स्वबळावर चालवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:35 IST

कुडाळ : किसन वीर साखर कारखान्याने सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतला होता. कारखाना भागीदारी करार ...

कुडाळ : किसन वीर साखर कारखान्याने सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना करारावर चालविण्यासाठी घेतला होता. कारखाना भागीदारी करार करून सहकारात टिकविण्याचे काम केले. सद्यस्थितीत किसन वीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असून प्रतापगड कारखाना चालविण्याचा मूळ हेतूच साध्य होत नाही. यामुळे हा करार रद्द करण्याचा निर्णय प्रतापगड संचालक मंडळाने घेतला असून याबाबत साखर आयुक्तांकडे लवादाची नोटीस दाखल केली आहे,’ अशी माहिती संचालक व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे दिली.

यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे, बाळासाहेब निकम, मालोजीराव शिंदे, प्रकाश भोसले व प्रदीप तरडे उपस्थित होते.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१२-१३ मध्ये प्रतापगड सहकारी साखर व किसन वीर सहकारी साखर कारखान्याबरोबर भागीदारी करार केला होता. किसन वीर कारखान्याकडून सुरुवातीस प्रतापगड कारखाना हा पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्नही केला. परंतु सध्या किसनवीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याने मागील पाच वर्षांत तीन गळीत हंगाम हा प्रतापगड कारखाना बंद ठेवण्यात आला. कारखान्याच्या कामगारांना पंधरा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. मागील गळीत हंगामातील शेतकऱ्यांची बारा महिने बिले दिले नाहीत. तसेच काराराची कोणतीही पूर्तता झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारखान्याची प्रॉपर्टी ॲक्ट रद्द करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. यामुळे किसन वीर कारखान्याकडून प्रतापगड कारखान्याशी असणारा करार मोडावा. प्रतापगड व्यवस्थापन आणि शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा येणारा गळीत हंगाम यशस्वीपणे चालवला जाईल. तसेच किसन वीर कारखाना व्यवस्थापनानाने सामंजस्याने प्रतापगडचा करार संपुष्टात आणावा, असे आवाहनही प्रतापगड संचालक मंडळाने केले आहे.

चौकट :

तालुक्यातील शेतकऱ्यांचा फायदा

प्रतापगड स्वबळावर सुरू झाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सर्व कायदेशीर पूर्तता करून प्रतापगड व्यवस्थापन कारखाना आपल्या ताब्यात घेऊन येणारा गळीत हंगाम यशस्वी करणार आहे. सभासद आणि शेतकऱ्यांचा विचार करून स्वबळावर कारखाना चालवणे हा प्रतापगड संचालक मंडळाने निर्णय घेतल्यामुळे कामगारांचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल.