शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पादचाऱ्यांच्या डोक्यात नारळाचा ‘प्रसाद’

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

अचानक फुटतायत डोकी : मलकापूरला मुख्य रस्त्यावरील झाडे बनली धोकादायक; नारळ पडल्याने अनेकांना दुखापत; वाहनांचेही नुकसान

माणिक डोंगरे - मलकापूर- शहराच्या मुख्य रस्त्यालगतची नारळाची झाडे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या डोक्यात नारळ व फांद्या पडल्याने दहा ते अकरा जण किरकोळ जखमी झाले, तर अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.शहरातील मलकापूर फाटा ते आहिल्यादेवी चौक या मुख्य रस्त्यालगत नारळाची झाडे आहेत. या झाडांची उंची व विस्तार वाढल्याने झाडाला नारळही मोठ्या प्रमाणावर लागतात. मात्र नारळाची पक्व झालेली फळे अनेक महिन्यांपासून काढलेली नाहीत. ही फळे वाऱ्याची झुळूक जरी आली तरी खाली पडतात. अशा वेळेला रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक किंंवा पादचाऱ्यांना नारळाचा चांगलाच प्रसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत दहा ते अकरा नागरिक येथे जखमी झाले आहेत. तर झाडाच्या सावलीला उभ्या केलेल्या काही वाहनांवर नारळ व फांद्या पडल्याने अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नगरपंचायत व वनविभागाने या धोकादायक झाडांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याच पद्धतीने नगरपंचायत कार्यालय ते शिवाजी चौक दरम्यानच्या रस्त्यालगतची नीलगिरीची काही झाडेही अती विस्तारामुळे धोकादायक बनली आहेत. पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या वादळी वाऱ्यात नीलगिरीची झाडे मोडून पडण्याची परिस्थिती होते. जोराच्या वाऱ्यामुळे या झाडांचा आवाजही मोठा होता. तसेच झाडांची उंची जास्त असल्याने वादळी वारे सुरू असताना नागरिक या झाडांकडे फिरकतही नाहीत. दररोज सुटणाऱ्या वाऱ्यानेही ही झाडे डोलतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडतो.कुणीही या, नारळ न्या! मलकापुरात रस्त्याकडेला नारळाची दहा-पंधरा झाडे आहेत. यांना नारळही मोठ्या प्रमाणात असतात. ज्यावेळी हे नारळ वाऱ्याने पडतात त्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे कोणीही ते नारळ घेऊन जातात. मात्र, या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. डोकं कठीण की नारळ ?काहीजण डोक्याने नारळ फोडण्याचे कसब दाखवितात. त्यामुळे डोकं कठीण की नारळ, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पक्त झालेल्या नारळाचे कवच मानवी कवठीपेक्षाही कडक असते. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर गुरसाळे सांगतात की, ‘डोक्याने नारळ फोडणे ही कला आहे. त्यातून आपली कवठी कठीण आहे, हे सिद्ध होत नाही. नारळ उंचावरून डोक्यावर पडल्यास दुखापत होणार, हे निश्चित. नारळ तीस ते चाळीस फूट उंचावरून अंगावर पडला तर फ्रॅक्चरही होऊ शकते.’ नगरपंचायत पाहतेय तक्रारीची वाटरस्त्याकडेच्या झाडावरून डोक्यात नारळ पडत असल्याच्या घटना वारंवार घडतायत; पण नगरपंचायतीला याची खबरही नसावी, ही आश्चर्यकारक बाब आहे. रस्त्याकडेची संबंधित झाडे नगरपंचायतीच्या अखत्यारित येतात. मात्र, एकानेही नारळ डोक्यात पडल्याची लेखी तक्रार आमच्याकडे केली नसल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांचे म्हणणे आहे. तसेच थेट झाडे तोडण्यापेक्षा त्याची निगा राखण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीमार्फत कार्यवाही करू, असेही तेली म्हणाले.वृक्ष समिती कागदोपत्रीनगरपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करणे, नवीन वृक्ष लावणे किंवा धोकादायक झाडांबाबत निर्णय घेण्यासाठी ‘वृक्ष समिती’ असते; पण मलकापूर नगरपंचायतीत ही समिती कागदोपत्रीच आहे.सत्काराचाही खर्च वाचेल मलकापूर नगरपंचायतीने वेळोवेळी झाडांचे नारळ तोडले तर त्या नारळांचा नगरपंचायतीलाही उपयोग होणार आहे. पंचायतीत होणाऱ्या कार्यक्रमावेळी सत्कार समारंभासाठी नगरपंचायत हे नारळ वापरू शकते. त्यातून नारळावर होणारा खर्च तरी वाचेल.