शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

पादचाऱ्यांच्या डोक्यात नारळाचा ‘प्रसाद’

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

अचानक फुटतायत डोकी : मलकापूरला मुख्य रस्त्यावरील झाडे बनली धोकादायक; नारळ पडल्याने अनेकांना दुखापत; वाहनांचेही नुकसान

माणिक डोंगरे - मलकापूर- शहराच्या मुख्य रस्त्यालगतची नारळाची झाडे दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या डोक्यात नारळ व फांद्या पडल्याने दहा ते अकरा जण किरकोळ जखमी झाले, तर अनेक वाहनांची मोडतोड झाली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.शहरातील मलकापूर फाटा ते आहिल्यादेवी चौक या मुख्य रस्त्यालगत नारळाची झाडे आहेत. या झाडांची उंची व विस्तार वाढल्याने झाडाला नारळही मोठ्या प्रमाणावर लागतात. मात्र नारळाची पक्व झालेली फळे अनेक महिन्यांपासून काढलेली नाहीत. ही फळे वाऱ्याची झुळूक जरी आली तरी खाली पडतात. अशा वेळेला रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक किंंवा पादचाऱ्यांना नारळाचा चांगलाच प्रसाद मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत दहा ते अकरा नागरिक येथे जखमी झाले आहेत. तर झाडाच्या सावलीला उभ्या केलेल्या काही वाहनांवर नारळ व फांद्या पडल्याने अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नगरपंचायत व वनविभागाने या धोकादायक झाडांच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याच पद्धतीने नगरपंचायत कार्यालय ते शिवाजी चौक दरम्यानच्या रस्त्यालगतची नीलगिरीची काही झाडेही अती विस्तारामुळे धोकादायक बनली आहेत. पावसाळ्यापूर्वी येणाऱ्या वादळी वाऱ्यात नीलगिरीची झाडे मोडून पडण्याची परिस्थिती होते. जोराच्या वाऱ्यामुळे या झाडांचा आवाजही मोठा होता. तसेच झाडांची उंची जास्त असल्याने वादळी वारे सुरू असताना नागरिक या झाडांकडे फिरकतही नाहीत. दररोज सुटणाऱ्या वाऱ्यानेही ही झाडे डोलतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडतो.कुणीही या, नारळ न्या! मलकापुरात रस्त्याकडेला नारळाची दहा-पंधरा झाडे आहेत. यांना नारळही मोठ्या प्रमाणात असतात. ज्यावेळी हे नारळ वाऱ्याने पडतात त्यावेळी रस्त्यावरून ये-जा करणारे कोणीही ते नारळ घेऊन जातात. मात्र, या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. डोकं कठीण की नारळ ?काहीजण डोक्याने नारळ फोडण्याचे कसब दाखवितात. त्यामुळे डोकं कठीण की नारळ, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पक्त झालेल्या नारळाचे कवच मानवी कवठीपेक्षाही कडक असते. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. कमलाकर गुरसाळे सांगतात की, ‘डोक्याने नारळ फोडणे ही कला आहे. त्यातून आपली कवठी कठीण आहे, हे सिद्ध होत नाही. नारळ उंचावरून डोक्यावर पडल्यास दुखापत होणार, हे निश्चित. नारळ तीस ते चाळीस फूट उंचावरून अंगावर पडला तर फ्रॅक्चरही होऊ शकते.’ नगरपंचायत पाहतेय तक्रारीची वाटरस्त्याकडेच्या झाडावरून डोक्यात नारळ पडत असल्याच्या घटना वारंवार घडतायत; पण नगरपंचायतीला याची खबरही नसावी, ही आश्चर्यकारक बाब आहे. रस्त्याकडेची संबंधित झाडे नगरपंचायतीच्या अखत्यारित येतात. मात्र, एकानेही नारळ डोक्यात पडल्याची लेखी तक्रार आमच्याकडे केली नसल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांचे म्हणणे आहे. तसेच थेट झाडे तोडण्यापेक्षा त्याची निगा राखण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीमार्फत कार्यवाही करू, असेही तेली म्हणाले.वृक्ष समिती कागदोपत्रीनगरपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत येणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करणे, नवीन वृक्ष लावणे किंवा धोकादायक झाडांबाबत निर्णय घेण्यासाठी ‘वृक्ष समिती’ असते; पण मलकापूर नगरपंचायतीत ही समिती कागदोपत्रीच आहे.सत्काराचाही खर्च वाचेल मलकापूर नगरपंचायतीने वेळोवेळी झाडांचे नारळ तोडले तर त्या नारळांचा नगरपंचायतीलाही उपयोग होणार आहे. पंचायतीत होणाऱ्या कार्यक्रमावेळी सत्कार समारंभासाठी नगरपंचायत हे नारळ वापरू शकते. त्यातून नारळावर होणारा खर्च तरी वाचेल.