शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

तांबवेत उंडाळकर गटाची सत्ता कायम

By admin | Updated: November 13, 2015 23:42 IST

कऱ्हाड तालुका : सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी बिनविरोध; पृथ्वीराज चव्हाण गट सत्तेपासून दूर

तांबवे : कऱ्हाड तालुक्यातील तांबवेच्या सरपंचपदी संतोष रामचंद्र कुंभार व उपसरपंचपदी धनंजय रघुनाथ ताटे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीवर माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर गटाची सत्ता कायम राहिली. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलला सरपंच व उपसरपंचपद मिळाल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या तांबजाई पॅनेलेला सत्तेपासून दूर राहावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंडितराव पाटील, ग्रामसेवक प्रमोद ठोके यांच्या उपस्थिती निवडप्रक्रिया पार पडली.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन पॅनेल होते. भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे ६ , सहकार पॅनेलचे ५ व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या तांबजाई पॅनेलचे २ उमेदवार विजयी झाले होते. येथे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व तांबजाई ग्रामविकास पॅनेल यांनी एकत्रित येऊन येथे सत्तास्थापन करण्याचे मनसुबे ठरविले होते. त्याला पूर्णविराम मिळाला. त्या दोन्ही गटांचे मिळून ८ उमेदवार झाल्याने येथे त्यांची सत्ता आली व सहकार पॅनेल सत्तेवरून दूर राहावे लागले त्यांना विरोधी भूमिका बजवावी लागणार. या निवडीवेळी विजयी उमेदवाराचे निवासराव पाटील, माजी उपसरपंच आनंदा ताटे, माजी मुख्याध्यापक एम. जे. पाटील, अशोक पाटील यांनी कौतुक केले. सरपंच व उपसरपंच निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली व जल्लोष साजरा करण्यात आला. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीवेळी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार विठोबा ऊर्फ आबासाहेब पाटील, धनंजय ताटे, संतोष कुंभार, रूपाली फल्ले, मंगल पाटील, वैशाली पाटील, तांबजाई ग्रामविकास पॅनेलचे जावेद मुल्ला, मंगल पवार व सहकार पॅनेलचे प्रदीप पाटील, सुवर्णा देशमुख, नंदाताई करपे, संपत साठे, नंदाताई साठे हे सर्व उमेदवार उपस्थित होते. येथील सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी होते. ग्रामपंचायत १३ सदस्यांची आहे. (वार्ताहर) तंग वातावरणात निवडीयेथील सरपंच व उपसरपंच निवडीवेळी सकाळपासून थोडे तंग वातावरण होते. थोडी वादावादी वगळता आजच्या निवडी शांततेत बिनविरोध पार पाडल्या. नेत्यांची चांगलीच धावपळकाही नेत्यांची सकाळपासून चांगलीच धावपळ झाली. युवकांनीही एकत्रित येऊन भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या विजयी घोषणा दिल्या. काही नेत्यांनी या निवडीमध्ये आपले काय शिजत नाही म्हटल्यावर पळ काढला. त्यांना आता विचार करण्याची वेळ आली आहे.