शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

शेतीपंपांचा गेले दहा दिवस विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस ...

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला असून, अद्याप तरी विद्युत मंडळाने वीजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे येथील सुमारे तीनशे एकर बागायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही वीज बिल भरा तरच आम्ही सुरू करू, असे रहिमतपूर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

धामणेर येथील ब्रह्मपुरीनजीक टंकसाळे वस्ती व कोकीळ वस्ती येथे कृष्णा नदीकाठावर दोन विद्युत डीपी आहेत. या डीपीवर सुमारे तीस ते पस्तीस विद्युत पंप आहेत. यावर सुमारे ३०० एकर बागायती क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, भुईमूग, आले, तरकारी अशी महत्त्वाचे पिके आहेत. या विद्युत डीपीमधील काही दोन टक्के शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत; परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी बिले भरलेली आहेत. अशा शेतकऱ्यांचे उन्हाळी दिवसात फार मोठे नुकसान होण्याचा धोका विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत, त्यांची विद्युत कनेक्शन बंद करा; परंतु ५० टक्के सवलतीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यांनी वीज बिले भरली आहेत त्यांचे तरी विद्युत पंप चालू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तरीसुद्धा अधिकारी विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाहीत. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार विद्युत विद्युत मंडळाकडून होत आहे, अशी भावना शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(कोट)

आम्ही शेतकऱ्यांच्यावतीने रहिमतपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चार-पाच वेळा विद्युत डीपी बंद आहे, असे सांगितले. तरीसुद्धा आम्हाला वरून आदेश आहेत. तेव्हा आम्ही विद्युत डीपी सुरू करू शकत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. आमची सुमारे पन्नास एकर क्षेत्र या डीपीवर आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज बिल थकीत आहेत त्यांची कनेक्शन बंद करा, बाकीचे तरी सुरू करावीत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा व विद्युत पुरवठा सुरळीत करावा.

-सागर कोकीळ शेतकरी, धामणेर (ता. कोरेगाव)

(कोट)

विद्युत डीपीवरील सर्व शेतीपंपाची वीज बिले भरल्याशिवाय दुरुस्ती कामाची मागणी करू नये अशाप्रकारे महावितरणचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत बिले भरावीत, नंतर खांबांची कामे करून विद्युतपुरवठा सुरळीत करता येईल.

-थोरवडे, शाखाप्रमुख महावितरण, रहिमतपूर (ता. कोरेगाव)

१९धामणेर

फोटो. : धामणेर (ता. कोरेगाव) येथे वादळी पावसामुळे विद्युत खांब पडलेले आहे. (छाया : शशिकांत क्षीरसागर)