शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

शेतीपंपांचा गेले दहा दिवस विद्युतपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस ...

धामणेर : धामणेर (ता. कोरेगाव) येथील टंकसाळे व कोकीळ वस्तीवरील वादळी पावसाने दोन विद्युत डीपींचे खांब पडल्यामुळे दहा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला असून, अद्याप तरी विद्युत मंडळाने वीजपुरवठा सुरळीत न केल्यामुळे येथील सुमारे तीनशे एकर बागायती क्षेत्रातील पिके धोक्यात आली असून, शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही वीज बिल भरा तरच आम्ही सुरू करू, असे रहिमतपूर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

धामणेर येथील ब्रह्मपुरीनजीक टंकसाळे वस्ती व कोकीळ वस्ती येथे कृष्णा नदीकाठावर दोन विद्युत डीपी आहेत. या डीपीवर सुमारे तीस ते पस्तीस विद्युत पंप आहेत. यावर सुमारे ३०० एकर बागायती क्षेत्र आहे. यामध्ये शेतकऱ्यांची ऊस, भुईमूग, आले, तरकारी अशी महत्त्वाचे पिके आहेत. या विद्युत डीपीमधील काही दोन टक्के शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत; परंतु बाकीच्या शेतकऱ्यांनी बिले भरलेली आहेत. अशा शेतकऱ्यांचे उन्हाळी दिवसात फार मोठे नुकसान होण्याचा धोका विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या अजब कारभारामुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नाहीत, त्यांची विद्युत कनेक्शन बंद करा; परंतु ५० टक्के सवलतीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्यांनी वीज बिले भरली आहेत त्यांचे तरी विद्युत पंप चालू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. तरीसुद्धा अधिकारी विद्युत पुरवठा सुरळीत करीत नाहीत. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार विद्युत विद्युत मंडळाकडून होत आहे, अशी भावना शेतकऱ्यांची होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

(कोट)

आम्ही शेतकऱ्यांच्यावतीने रहिमतपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांना चार-पाच वेळा विद्युत डीपी बंद आहे, असे सांगितले. तरीसुद्धा आम्हाला वरून आदेश आहेत. तेव्हा आम्ही विद्युत डीपी सुरू करू शकत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. आमची सुमारे पन्नास एकर क्षेत्र या डीपीवर आहे. त्यामुळे आमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीज बिल थकीत आहेत त्यांची कनेक्शन बंद करा, बाकीचे तरी सुरू करावीत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा व विद्युत पुरवठा सुरळीत करावा.

-सागर कोकीळ शेतकरी, धामणेर (ता. कोरेगाव)

(कोट)

विद्युत डीपीवरील सर्व शेतीपंपाची वीज बिले भरल्याशिवाय दुरुस्ती कामाची मागणी करू नये अशाप्रकारे महावितरणचे आदेश आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकीत बिले भरावीत, नंतर खांबांची कामे करून विद्युतपुरवठा सुरळीत करता येईल.

-थोरवडे, शाखाप्रमुख महावितरण, रहिमतपूर (ता. कोरेगाव)

१९धामणेर

फोटो. : धामणेर (ता. कोरेगाव) येथे वादळी पावसामुळे विद्युत खांब पडलेले आहे. (छाया : शशिकांत क्षीरसागर)