शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना ...

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणच्या वीज वाहिन्या तुटल्याने याचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

धबधबे लागले कोसळू

मेढा : जावळी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येथील केळघर घाटात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी घाटरस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

बंदोबस्ताची मागणी

सातारा : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी उपद्रव मांडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे श्वान ये-जा करणारे पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

सातारा : सदर बझार परिसरात रस्त्यावरील सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

अपघाताला निमंत्रण

पळशी : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर - म्हसवड मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. यामुळे या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छतेची मागणी

सातारा : येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.