शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना ...

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणच्या वीज वाहिन्या तुटल्याने याचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

धबधबे लागले कोसळू

मेढा : जावळी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येथील केळघर घाटात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी घाटरस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

बंदोबस्ताची मागणी

सातारा : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी उपद्रव मांडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे श्वान ये-जा करणारे पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

सातारा : सदर बझार परिसरात रस्त्यावरील सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

अपघाताला निमंत्रण

पळशी : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर - म्हसवड मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. यामुळे या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छतेची मागणी

सातारा : येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.