शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना ...

परळी : परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दररोच तासनतास वीज गायब होऊ लागल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परळी खोऱ्यात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणच्या वीज वाहिन्या तुटल्याने याचा वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

धबधबे लागले कोसळू

मेढा : जावळी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे येथील केळघर घाटात अनेक ठिकाणी लहान-मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी घाटरस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

बंदोबस्ताची मागणी

सातारा : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांनी उपद्रव मांडला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हे श्वान ये-जा करणारे पादचारी तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

सातारा : सदर बझार परिसरात रस्त्यावरील सांडपाणी मुख्य रस्त्यावर आल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

रिफ्लेक्टरची मागणी

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे महामार्गावर तत्काळ रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

अपघाताला निमंत्रण

पळशी : मोही (ता. माण) येथील शिंगणापूर - म्हसवड मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. यामुळे या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

स्वच्छतेची मागणी

सातारा : येथील महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरात काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडई परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.