शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीने बत्तीगुल कार्यक्रम थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन ...

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे. त्यामुळे वीज कंपनीने सुरू केलेला बत्तीगुल कार्यक्रम थांबणार कधी, असा संतप्त सवाल वीजग्राहक व शेतकरी विचारत आहेत.

वीज कंपनी अन् त्यांचा भोंगळ कारभार हा काही ग्राहकांसाठी नवा नाहीच. मात्र, सध्याचे उन्हाळ्याचे दिवस पाहता या दिवसात सतत जात असलेल्या विजेमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. तर प्रचंड उन्हामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दिवसभरात दोन ते तीन तासच विद्युत पंप चालवावा लागत असून, एवढ्या कालावधीतून मिळणाऱ्या पाण्यावर शेतीच भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील शेतकरी काबाडकष्टाने आपली शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला वीज कंपनीच्या गलथानपणाचा फटका बसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांना डोळ्यांदेखत जळू लागलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी या ठिकाणी झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना काही प्रमाणात सध्यातरी पाणी आहे. याच्या आधारावरच येथील शेतकऱ्यांनी शेतात पिके धरली आहेत. ती पिके सध्या जोमात आली असताना त्यांना पाणी देण्यात वारंवार अडचणी येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना अगोदरच पाण्यासाठी विहिरीवरील नंबराची वाट पहावी लागते. अशावेळी त्यांच्या नंबरला जर वीज गेली तर मात्र कित्येक तास त्याला विजेची वाट पहावी लागत असून, असलेली वीजही पुरेशा दाबाने उपलब्ध नसल्यास तो विद्युत पंपाच्या साह्याने आपल्या शेतीला पाणीही व्यवस्थित देऊ शकत नाही. आज अशा परिस्थितीमुळे माण परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळू लागली आहेत. गत काही दिवसांपासून तर देवापूरसह अनेक परिसरात तर विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे.

१३देवापूर

फोटो ओळी - देवापूर(ता. माण) परिसरातील जळालेली पिके.