शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

वीज कंपनीने बत्तीगुल कार्यक्रम थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन ...

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे. त्यामुळे वीज कंपनीने सुरू केलेला बत्तीगुल कार्यक्रम थांबणार कधी, असा संतप्त सवाल वीजग्राहक व शेतकरी विचारत आहेत.

वीज कंपनी अन् त्यांचा भोंगळ कारभार हा काही ग्राहकांसाठी नवा नाहीच. मात्र, सध्याचे उन्हाळ्याचे दिवस पाहता या दिवसात सतत जात असलेल्या विजेमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. तर प्रचंड उन्हामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दिवसभरात दोन ते तीन तासच विद्युत पंप चालवावा लागत असून, एवढ्या कालावधीतून मिळणाऱ्या पाण्यावर शेतीच भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील शेतकरी काबाडकष्टाने आपली शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला वीज कंपनीच्या गलथानपणाचा फटका बसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांना डोळ्यांदेखत जळू लागलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी या ठिकाणी झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना काही प्रमाणात सध्यातरी पाणी आहे. याच्या आधारावरच येथील शेतकऱ्यांनी शेतात पिके धरली आहेत. ती पिके सध्या जोमात आली असताना त्यांना पाणी देण्यात वारंवार अडचणी येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना अगोदरच पाण्यासाठी विहिरीवरील नंबराची वाट पहावी लागते. अशावेळी त्यांच्या नंबरला जर वीज गेली तर मात्र कित्येक तास त्याला विजेची वाट पहावी लागत असून, असलेली वीजही पुरेशा दाबाने उपलब्ध नसल्यास तो विद्युत पंपाच्या साह्याने आपल्या शेतीला पाणीही व्यवस्थित देऊ शकत नाही. आज अशा परिस्थितीमुळे माण परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळू लागली आहेत. गत काही दिवसांपासून तर देवापूरसह अनेक परिसरात तर विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे.

१३देवापूर

फोटो ओळी - देवापूर(ता. माण) परिसरातील जळालेली पिके.