शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

वीज कंपनीने बत्तीगुल कार्यक्रम थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:34 IST

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन ...

कुकुडवाड : देवापूरसह शेजारील परिसरात गत काही दिवसांपासून वीज कंपनीच्या सतत सुरू असलेल्या बत्तीगुल कार्यक्रमाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर शेतकरी वर्ग चिंतातूर बनला आहे. त्यामुळे वीज कंपनीने सुरू केलेला बत्तीगुल कार्यक्रम थांबणार कधी, असा संतप्त सवाल वीजग्राहक व शेतकरी विचारत आहेत.

वीज कंपनी अन् त्यांचा भोंगळ कारभार हा काही ग्राहकांसाठी नवा नाहीच. मात्र, सध्याचे उन्हाळ्याचे दिवस पाहता या दिवसात सतत जात असलेल्या विजेमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. तर प्रचंड उन्हामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दिवसभरात दोन ते तीन तासच विद्युत पंप चालवावा लागत असून, एवढ्या कालावधीतून मिळणाऱ्या पाण्यावर शेतीच भागवावे लागत आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील शेतकरी काबाडकष्टाने आपली शेती पिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नाला वीज कंपनीच्या गलथानपणाचा फटका बसू लागल्याने अनेक शेतकऱ्यांना डोळ्यांदेखत जळू लागलेली पिके पाहण्याची वेळ आली आहे. माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी या दुष्काळावर मात करण्यासाठी या ठिकाणी झालेल्या जलयुक्तच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना काही प्रमाणात सध्यातरी पाणी आहे. याच्या आधारावरच येथील शेतकऱ्यांनी शेतात पिके धरली आहेत. ती पिके सध्या जोमात आली असताना त्यांना पाणी देण्यात वारंवार अडचणी येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना अगोदरच पाण्यासाठी विहिरीवरील नंबराची वाट पहावी लागते. अशावेळी त्यांच्या नंबरला जर वीज गेली तर मात्र कित्येक तास त्याला विजेची वाट पहावी लागत असून, असलेली वीजही पुरेशा दाबाने उपलब्ध नसल्यास तो विद्युत पंपाच्या साह्याने आपल्या शेतीला पाणीही व्यवस्थित देऊ शकत नाही. आज अशा परिस्थितीमुळे माण परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. त्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने काही ठिकाणी पाणी असूनही केवळ विजेअभावी पिके जळू लागली आहेत. गत काही दिवसांपासून तर देवापूरसह अनेक परिसरात तर विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे.

१३देवापूर

फोटो ओळी - देवापूर(ता. माण) परिसरातील जळालेली पिके.