शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

दोन्ही काकांकडील सत्ता नव्या पिढीकडे!

By admin | Updated: November 24, 2015 00:27 IST

आता दहिवडीला वेध : नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?

नवनाथ जगदाळे --दहिवडी --लोणंद ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने आता दहिवडीलाही लवकरच नगरपंचायत दर्जा मिळणार आहे. दहिवडीला नगरंपचायत झाल्यानंतर अनेक सुविधा मिळणार, अशी चर्चा होत असल्याने ‘नगरपंचायत म्हणजे काय रे भाऊ?,’ असा प्रतिप्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. त्यातच नगरंपचायत होण्याने दोन्ही काकांकडील सत्ता कदाचित नवीन पिढीकडे जाऊ शकते. सातारा जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त होणार आहे. त्यापैकी लोणंद नगरपंचायत झाल्याने त्या पाठोपाठ आता दहिवडीलाही नगरपंचायत होणार, हे जवळपास निश्चित आहे. फक्त ती कधी होणार एवढाच प्रश्न राहणार आहे. दहिवडी नगरपंचायतीची सर्व प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाल्याने औपचारिक घोषणाच बाकी राहिली आहे. त्यामुळे याची उत्सुकता लागून राहिली आहे. दहिवडी नगरपंचायत होताच अनेक राजकीय संदर्भ बदलणार आहेत. पूर्वीपासून वॉर्डरचना दहिवडीला अस्तित्त्वात होती. ६ वॉर्डमधून १७ उमेदवार निवडून जात होते. त्यापैकी भवानवाडी वॉर्ड वाड्या -वस्त्या तर तुपेवाडी व विठोबा वॉर्ड, काही प्रमाणात गांधी वॉर्डाची रचना शहर व वाड्या-वस्त्या असा होता. तर श्रीराम वॉर्ड व सिद्धनाथ वॉर्ड दहिवडी मुख्य शहरात होता. त्यामुळे ग्रामपंचायतीला प्रतिनिधी निवडून देताना लोकांच्या अंगवळणी पडले होते. आता नवीन अध्यादेशानुसार प्रभाग पद्धत झाल्यास काही ठिकाणी उमेदवार देताना, प्रतिनिधी निवडून देताना कसरत करावी लागणार आहे. भटकीमळा, भवानवाडी, डबरमळा, तुपेवाडी, शिंदेमळा, कटपाळेमळा या वाड्या-वस्त्यांना स्वत:च्या उमेदवाराला मतदान करता येत होते; परंतु प्रभाग रचनेमुळे प्रत्येक वाड्या-वस्त्यांवरील उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार असल्याने लोकांना राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या स्मिता वायदंडे व पंचायत समिती सदस्य व विद्यमान उपसभापती अतुल जाधव यांच्यानंतर दहिवडी हे गाव पूर्णत: वगळले जाणार असल्याने त्यांची ही शेवटची टर्म असणार आहे. नवीन प्रभाग रचनेमुळे ग्रामपंचायतीच्या सुरुवातीच्या काळापासून राहिलेली दोन्ही काकांकडील सत्ता हळूहळू नवीन पिढीकडे सरकणार आहे. प्रभाग रचनेमुळे प्रत्येकाच्या वैयक्तिक कामावर मतदान होणार असल्याने नेत्यांचे अस्तित्त्व कमी होऊन बंडोबाचे पेव फुटणार आहे. नगरपंचायत झाल्याने दहिवडी गावाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे. दहिवडी शहराचा विकास होणार आहे.पायाभूत सुविधा मिळणार...दहिवडी शहराची लोकसंख्या १७ हजारांच्या वर आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने सर्वच शासकीय मुख्यालये दहिवडीला असल्याने लोकांची येथे नेहमीच वर्दळ असते. अशावेळी त्यांना पायाभूत सुविधा देताना ग्रामपंचायतीवरही ताण येत असतो. नगरंपचायतीमुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने उत्पन्न वाढणार आहे. निधी मिळाल्याने पायाभूत सुविधा पुरविण्यास मदत होणार आहे. तर नुकताच लोंणदला नगरंपचायतीचा दर्जा मिळाल्याने आता नंबर दहिवडीचाच अशी चर्चा होत आहे.