शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

खड्ड्यांची जबाबदारी वर्षभर ठेकेदारांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:07 IST

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ...

सातारा : जिल्ह्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती बांधकाम विभागाच्या माध्यमातून युद्धपातळीवर सुरू आहे. जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, या रस्त्यांवर पुन्हा त्याच ठिकाणी खड्डे पडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर याचा ताण येणार नाही.विदर्भ, मराठवाड्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात जास्त पाऊस पडतो. रस्ते करण्याची प्रचलित पद्धत कायम आहे. अनेकदा पाऊस पडला की रस्ता खराब होतो, हे नेहमीचे गणित आहे. यंदा तर पावसाने हद्दच केल्याने जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती होती. रस्त्यांची चाळण झाल्याने सर्वच माध्यमांतून सरकारवर टीका होऊ लागली.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खराब झालेल्या ९२८ किलोमीटर अंतरातील राज्यमार्ग व १ हजार ५०० किलो मीटर अंतरातील प्रमुख जिल्हा मार्गांचे काम बांधकाम विभागाने टार्गेट ठेवले. मध्यंतरीच्या काळात राज्याच्या धर्तीवर एकच डीएसआरचा निर्णय आणि त्यानंतर अंमलात आलेली जीएसटी करप्रणाली याला विरोध करत बांधकाम ठेकेदारांनी कामांवर बहिष्कार टाकला होता. कुठल्याही शासकीय कामाचे टेंडर भरायचे नाही, असे धोरण ठरवून ठेकेदारांनी काम बंद ठेवले, याचा परिणाम म्हणून पावसाळ्याआधी टेंडर प्रक्रिया झाली नाही. त्याचा परिणाम म्हणून रस्त्यावरील खड्डेही मुजविले गेले नाहीत.नोव्हेंबर महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. ६ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मंत्रालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या बांधकाम विभागातील वॉररूमही तयार करण्यात आली. दीड महिन्यात तब्बल २ हजार ४२८ किलोमीटर अंतरातील रस्त्यांवरील खड्डे मुजवायचे काम सुरू करण्यात आले.पूर्ण झालेल्या कामाचे रिपोर्ट रोजच्या रोज बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सायंकाळी पाच वाजता मिळत होते. ते मंत्रालयात पाठविले जाऊ लागले आहेत. ठेकेदारांचे ८५ युनिट जिल्हाभर कार्यरत आहेत. एका कामावर २० कामगार असे एकूण १ हजार ७०० कामगार राबत आहेत.हे काम वेगाने करायचे असले तरी संबंधित ठिकाणी पुन्हा खड्डा पडल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदाराला वेगळे पैसे मिळणार नाहीत.दिलेल्या रकमेतच दुरुस्तीचेकाम करावे लागणार आहे. त्यांनातशी अटही घातली गेली असल्याने सुदैवाने रस्त्यांवर लगेच खड्डेपडतील, ही शक्यता सध्या तरी दिसत नाही.मोबाईल युनिट वर्षभर राहणार सज्जरस्त्यावर खड्डा पडल्यानंतर लोकांनी आवाज उठविण्याची वाट पाहायची गरज नाही. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामांच्या ठिकाणी मोबाईल युनिट सर्व्हे करण्यासाठी पाठवायचे आहे. भरलेला खड्डा पुन्हा खराब झाला असल्यास तो भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यायचे आहे.ओखीच्या संकटामुळेमोठा गतिरोधकदोन दिवसांपासून ओखी वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. पाऊस आणि डांबराचे वैर असते, साहजिकच पावसामुळे रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा गतिरोधक उभा राहिला आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग