शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे सकारात्मक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती ...

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून या तिन्ही गावांनी आंदोलन पुकारले होते. आंदोलन सुरू असताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, चांदोली वनाधिकारी महादेवराव मोहिते, उत्तमराव सावंत यांच्यासह तलाठी, कर्मचारी, आदी महसूलसह वनविभागाचे अधिकारी आपले दप्तर घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे हेही यावेळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांनीही त्यांना समर्पक उत्तरे दिली.

प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पुनर्वसनास विलंब झाला असल्याचे सांगून महसूल आणि वनविभागात समन्वय असल्याचे स्पष्ट केले. पर्याय एक व पर्याय दोनप्रमाणे पुनर्वसन होणार आहे. कृषी विभाग व बांधकाम विभागाने मूल्यांकन केलेले आहे. फक्त ते अंतिम होण्याचे बाकी आहे. पसंत केलेल्या जमिनी संबंधितांना दाखविणार आहे. संकलन यादीमध्ये दुरुस्ती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्रुटी लक्षात येतील तशा त्या दुरुस्त्या केल्या जातील. चुका आम्ही सुधारू, असे आश्वासन प्रांताधिकारी तांबे यांनी दिले.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोयना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.