शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे सकारात्मक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती ...

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून या तिन्ही गावांनी आंदोलन पुकारले होते. आंदोलन सुरू असताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, चांदोली वनाधिकारी महादेवराव मोहिते, उत्तमराव सावंत यांच्यासह तलाठी, कर्मचारी, आदी महसूलसह वनविभागाचे अधिकारी आपले दप्तर घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे हेही यावेळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांनीही त्यांना समर्पक उत्तरे दिली.

प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पुनर्वसनास विलंब झाला असल्याचे सांगून महसूल आणि वनविभागात समन्वय असल्याचे स्पष्ट केले. पर्याय एक व पर्याय दोनप्रमाणे पुनर्वसन होणार आहे. कृषी विभाग व बांधकाम विभागाने मूल्यांकन केलेले आहे. फक्त ते अंतिम होण्याचे बाकी आहे. पसंत केलेल्या जमिनी संबंधितांना दाखविणार आहे. संकलन यादीमध्ये दुरुस्ती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्रुटी लक्षात येतील तशा त्या दुरुस्त्या केल्या जातील. चुका आम्ही सुधारू, असे आश्वासन प्रांताधिकारी तांबे यांनी दिले.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोयना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.