शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

देश महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे : घाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

नागठाणे : ‘देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, असे उद्गार सातारा ...

नागठाणे : ‘देशाला महासत्ता बनविण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित ठेवणे गरजेचे असून, ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे’, असे उद्गार सातारा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे अर्थशास्र विभागाचे प्रा. डाॅ. आर. एम. घाडगे यांनी काढले.

आर्टस अँड काॅमर्स काॅलेज, नागठाणे या महाविद्यालयात अर्थशास्त्र व भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसंख्या पर्यावरण आणि विकास’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

घाडगे म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ ही देशातील गंभीर समस्या असून, लोकसंख्यावाढीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजाही पूर्ण होत नाहीत. तसेच पर्यावरण आणि लोकसंख्या यांच्यात संतुलन साधण्यासाठी शाश्वत विकासाची गरज आहे.’

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. जे. एस. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘लोकसंख्यावाढ व सामाजिक, आर्थिक व धार्मिक असमानतेमुळे देशात गरीब आणि श्रीमंत ही दरी अधिकच वाढत आहे. त्यामुळे हा समतोल साधण्याची समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. तसेच लोकसंख्यावाढ व सामाजिक विषमता याविषयी संत महात्म्यांनी प्राचीन काळीच भविष्यकालीन स्थितीचे वर्णन केलेले असून, तत्कालीन समाजाला निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे.’

कार्यक्रमाचे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. आर. एम. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. दीपक गुरव यांनी आभार मानले. हा कार्यक्रम झूम ॲपच्या माध्यमातून संपन्न झाला. कार्यक्रमास इतर महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. तांत्रिक साहाय्य प्रा. एन. एम. चोबे यांनी केले.