शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

गरिबांच्या शिक्षणाला बाप्पा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:44 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुणवत्ता असूनही पैशांअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडणारी असंख्य गुणी मुले-मुली आपण अवती-भवती पाहतो. आता मात्र, त्यांना पैशांअभावी शिक्षण सोडायचे कारण उरणार नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नवीन उपक्रमानुसार गावागावांतील गणेश मंडळेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत.जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे अडीच हजार गणेश मंडळे तात्पुरती नोंदणी ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुणवत्ता असूनही पैशांअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडणारी असंख्य गुणी मुले-मुली आपण अवती-भवती पाहतो. आता मात्र, त्यांना पैशांअभावी शिक्षण सोडायचे कारण उरणार नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नवीन उपक्रमानुसार गावागावांतील गणेश मंडळेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत.जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे अडीच हजार गणेश मंडळे तात्पुरती नोंदणी करून उत्सव साजरा करतात. आता मात्र तात्पुरती नोंदणी करता येणार नाही. मंडळांना कायमस्वरुपी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी एका दिवसात नोंदणीची सोय करण्यात आली आहे. आॅनलाईन फॉर्म भरून त्यावरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. हा फॉर्मही मराठीत आहे. त्यामुळे माहिती भरणेही सोपे ठेवण्यात आले आहे. मंडळांनी आपले जमा-खर्चाचे हिशोबही वेळच्यावेळी धर्मादाय आयुक्तांकडे सादर केले तर मंडळांना प्रत्येक वर्षी उत्सवाला परवानगी घ्यायची गरज राहणार नाही. या उपक्रमामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयात मारावे लागणारे खेटेही बंद होणार आहेत.दरम्यान, गणेशोत्सव म्हटले की सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात. साहजिकच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीचा आग्रह केला तरी त्याला लोक प्रतिसाद देत असतात. बाप्पांवरील श्रद्धेपोटी अनेकजण मोठ्या रकमेची वर्गणीही देत असतात. या वर्गणीच्या माध्यमातून गरिबांचे शिक्षण पूर्ण झाल्यास एक वेगळा सकारात्मक पायंडा पडणार आहे.जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांकडून कायमस्वरुपी नोंदणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. १ जूनपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंडळांनी आपल्या उत्पन्नातील दहा टक्के रक्कम गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याला निश्चितच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही दहावी परीक्षेत ८५ टक्क्यांच्यावर गुण मिळविलेल्या गरीब कुटुंबांतील मुला-मुलींची नावे कळविण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून केले आहे.उपक्रमाचा लाभ कोणाला?याच अनुषंगाने अत्यंत गरीब असलेल्या तसेच पालकांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी दहावी, बारावीला ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी धर्मादाय कार्यालय, योदोगोपाळ पेठ, चौथा मजला, राजधानी टॉवर्स, सातारा येथे दि. ७ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक धमार्दाय आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले.