शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या शिक्षणाला बाप्पा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 22:44 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुणवत्ता असूनही पैशांअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडणारी असंख्य गुणी मुले-मुली आपण अवती-भवती पाहतो. आता मात्र, त्यांना पैशांअभावी शिक्षण सोडायचे कारण उरणार नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नवीन उपक्रमानुसार गावागावांतील गणेश मंडळेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत.जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे अडीच हजार गणेश मंडळे तात्पुरती नोंदणी ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गुणवत्ता असूनही पैशांअभावी पुढील शिक्षण अर्धवट सोडणारी असंख्य गुणी मुले-मुली आपण अवती-भवती पाहतो. आता मात्र, त्यांना पैशांअभावी शिक्षण सोडायचे कारण उरणार नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नवीन उपक्रमानुसार गावागावांतील गणेश मंडळेच या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत.जिल्ह्यामध्ये दरवर्षी साधारणपणे अडीच हजार गणेश मंडळे तात्पुरती नोंदणी करून उत्सव साजरा करतात. आता मात्र तात्पुरती नोंदणी करता येणार नाही. मंडळांना कायमस्वरुपी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी मंडळांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी एका दिवसात नोंदणीची सोय करण्यात आली आहे. आॅनलाईन फॉर्म भरून त्यावरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. हा फॉर्मही मराठीत आहे. त्यामुळे माहिती भरणेही सोपे ठेवण्यात आले आहे. मंडळांनी आपले जमा-खर्चाचे हिशोबही वेळच्यावेळी धर्मादाय आयुक्तांकडे सादर केले तर मंडळांना प्रत्येक वर्षी उत्सवाला परवानगी घ्यायची गरज राहणार नाही. या उपक्रमामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयात मारावे लागणारे खेटेही बंद होणार आहेत.दरम्यान, गणेशोत्सव म्हटले की सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात. साहजिकच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीचा आग्रह केला तरी त्याला लोक प्रतिसाद देत असतात. बाप्पांवरील श्रद्धेपोटी अनेकजण मोठ्या रकमेची वर्गणीही देत असतात. या वर्गणीच्या माध्यमातून गरिबांचे शिक्षण पूर्ण झाल्यास एक वेगळा सकारात्मक पायंडा पडणार आहे.जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांकडून कायमस्वरुपी नोंदणीचे अर्ज मागविण्यात येणार आहेत. १ जूनपासून आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, मंडळांनी आपल्या उत्पन्नातील दहा टक्के रक्कम गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याला निश्चितच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही दहावी परीक्षेत ८५ टक्क्यांच्यावर गुण मिळविलेल्या गरीब कुटुंबांतील मुला-मुलींची नावे कळविण्याचे आवाहन धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून केले आहे.उपक्रमाचा लाभ कोणाला?याच अनुषंगाने अत्यंत गरीब असलेल्या तसेच पालकांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांनी दहावी, बारावीला ८५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी धर्मादाय कार्यालय, योदोगोपाळ पेठ, चौथा मजला, राजधानी टॉवर्स, सातारा येथे दि. ७ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक धमार्दाय आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी केले.