शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

तलाव जोड प्रकल्पाचा ‘वेळूत करिश्मा’ :तीन तलाव पूर्ण भरले,विहिरी तुडुंब, परिसरातील ओढेही खळाळू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:59 IST

महाराष्ट्रातील पहिला तलाव जोड प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू आहे. तीन तलाव जोडणीचे काम पूर्ण झाले असल्याने तिन्ही तलाव ९० टक्के भरले असून, उर्वरित दोन तलाव जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तलाव पाण्याने फुल्ल

ठळक मुद्देउर्वरित दोनच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात;

जयदीप जाधव ।रहिमतपूर : महाराष्ट्रातील पहिला तलाव जोड प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे सुरू आहे. तीन तलाव जोडणीचे काम पूर्ण झाले असल्याने तिन्ही तलाव ९० टक्के भरले असून, उर्वरित दोन तलाव जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तलाव पाण्याने फुल्ल भरल्यामुळे ओढे, नाले खळाळू लागले असून, विहिरींच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे बहुचर्चित तलाव जोड प्रकल्पाचा करिश्मा वेळूत पाहावयास मिळत आहे.

वेळू या गावाला गेल्या तीन वर्षांपूर्वी ऐन उन्हाळ्यात डिसेंबर ते जून महिन्यांत पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या कालावधीत टँकरने पाणीपुरवठा होत होता. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पेटून उठले. अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन पावसाचे पाणी साठवणे व मुरवण्याचे मोठ्या प्रमाणात काम केले. यामुळे वॉटर कप स्पर्धेत वेळूचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला. या बरोबरच राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे विविध प्रकल्प राबवले. जलयुक्त अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाबरोबर तलाव जोड प्रकल्पालाही सुरुवात केली.

वेळू-बेलेवाडी गावाच्या वरती तलाव नंबर एक हा जुना पाझर तलाव आहे. पावसाळ्यामध्ये पूर्णक्षमतेने भरल्यानंतर या तलावातून वाहून जाणारे पाणी वाया जात होते. तलाव जोड प्रकल्पामुळे त्या तलावातून वाया जाणारे पाणी इतर चार तलावांमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाचपैकी तीन तलावांची मुख्य लाईनची जोडणी पूर्ण झाली आहे. मुख्य लाईनपासून तलावापर्यंत चरी काढून पाणी पोहोचविलेले आहे. तलाव नंबर एक शंभर टक्के भरून पाणी वाहू लागले आहे. हे पाणी सायफन पद्धतीने इतर दोन तलावांमध्ये सोडले जात असून, ते दोन्ही तलाव ९० टक्के भरलेले आहेत. उर्वरित दोन तलावांची जोडणी पावसामुळे धिम्या गतीने सुरू आहे. लवकरच दोन तलावांच्या जोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास सरपंच लक्ष्मीबाई भोसले यांनी व्यक्त केला.सायफन पद्धतीमुळे वाढीव खर्चाला आळा...वेळू येथील पाच पाझर तलावांची २८५ टीसीएम पाणीसाठा निर्मिती क्षमता असून, २१० हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येणार आहे. पाचही पाझर तलावापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी सायफन पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी वाहून नेण्यासाठी भविष्यातही वाढीव निधीची गरज राहणार नाही. पाणी वाहून नेण्यासाठी सायफन पद्धत ही उत्तम व फायदेशीर पद्धत आहे. 

 

वेळू येथील तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे निश्चितपणे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. उर्वरित तलाव जोडणीचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या सहकार्यामुळे खासदार अनू आगा यांनी तलाव जोड प्रकल्पाला विशेषबाब म्हणून निधी उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषद व कृषी विभागाचेही सहकार्य मिळत आहे. महत्त्वपूर्ण तलाव जोड प्रकल्पासाठी ग्रामस्थांची व प्रशासनाची साथ मोलाची ठरली आहे.- लक्ष्मीबाई भोसले, सरपंच