शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

गावचे राजकारण पिकाच्या मुळावर

By admin | Updated: July 15, 2015 00:22 IST

अभेपुरीत खुन्नस : विद्युत मोटारगृहातील साहित्यांची तोडफोड

वाई : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापायला लागलेले असतानाच वाई तालुक्यातील अभेपुरी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात व्यक्तीने राजकीय खुन्नशीतून दहा शेतकऱ्यांच्या शेतातील भाताच्या तरव्यावर तणनाशकाची फवारणी केली आहे. तसेच शेतीपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्य तोडून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. याबाबत माहिती अशी की, अभेपुरी येथील शेतकरी कऱ्हाड, कर्जत येथून नवनवीन जातीचे बियाणे आणतात. यंदाही शेतकऱ्यांनी बासमती ३७०, इंद्रायणी इंडम यासारख्या भाताच्या बियाण्यांच्या रोपांचे तरवे केले होते. गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अशातच रविवारी लिंगवात व वाडा या दोन शिवारातील शेतकऱ्यांच्या भाताच्या रोपाच्या तरव्यावर अज्ञातानी तणनाशकाची फवारणी केली. याचा परिणाम दोन-तीन दिवसांनंतर दिसायला लागला आहे. रोपे जळायला लागली आहेत, त्यानंतर कोणीतरी तणनाशक फवारल्याचे लक्षात आले. तसेच काही शेतपाणी योजनेच्या वीजगृहातील साहित्यांचे नुकसान केले आहे. यामध्ये झुंजार मांढरे यांचे ७५ किलो, विजय मांढरे यांचे २० किलो, महादेव मांढरे यांचे ६० किलो, भानुदास मांढरे यांचे १० किलो, अशोक मांढरे यांचे २० किलो, सोमनाथ मांढरे यांचे १० किलो, दिपक पवार यांचे २५ किलो असे सुमारे २२५ किलो बियाणे जळाले. यामध्ये दहा ते पंधरा एकर शेतात भाताची लागण झाली असती. (प्रतिनिधी)तीन दिवसांपूर्वी शिवारात भाताच्या रोपाच्या शेतावर गेलो असता तरवा पिवळा व वाळून जाऊ लागल्यासारखा दिसू लागला. म्हणून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविला असता त्यावर तणनाशक फवारले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे आमचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.- झुंजार मांढरे, शेतकरी