शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

राजकारण्यांना आणू वाड्यावरून बांधावर !

By admin | Updated: September 2, 2014 23:47 IST

राजू शेट्टी गरजले : फलटणच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग

फलटण : ‘जनतेने मनात आणले तर ती भल्याभल्यांना पराभूत करू शकते. अन्याय झुगारा आणि महाविकासाला साथ द्या,’ असे आवाहन करतानाच ‘आम्ही राजकारण्यांना वाड्यावरून बांधावर आणण्याचा चंग बांधला आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फलटण येथे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीत झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘सामान्य माणसेच क्रांती करू शकतात. आता फलटण तालुक्यात क्रांतीची वेळ आली आहे,’ असे सांगून खा. शेट्टी म्हणाले, ‘सामान्य माणूस पिसाळला, तर तुमची शंभरी भरलीच समजा. घराघरात भांडणे लावून राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेसना जनतेने संपवावे. या मंडळींना सत्तेचा माज आला आहे. आपल्या डोक्यावर कायम लाल दिवा राहणारच, असा त्यांचा समज आहे. त्यांचा माज उतरविण्याचा शब्द मी देतो.’ ‘आमचा उमेदवार ‘शोपीस’ नसेल,’ अशा शब्दांत आमदार दीपक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावतानाच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना लुटणारे साखर कारखानदार व बँका बुडवणाऱ्यांची चौकशी लावू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. ते म्हणाले, ‘फलटणमध्ये काही झाले तरी रासपचाच उमेदवार असणार आहेत. इथून पुढे कोणीही गुंडगिरी, अन्याय केला तर येरवडा जेलमध्ये जाल.’ यावेळी नगरसेवक अनुप शहा, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वराज संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुकर माळवे, डॉ. उत्तमराव शेंडे, प्रकाश बोंगळे, दत्तूभाऊ धुमाळ, आमीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हा युवक काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)