शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना आणू वाड्यावरून बांधावर !

By admin | Updated: September 2, 2014 23:47 IST

राजू शेट्टी गरजले : फलटणच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ मेळाव्यात निवडणुकीचे रणशिंग

फलटण : ‘जनतेने मनात आणले तर ती भल्याभल्यांना पराभूत करू शकते. अन्याय झुगारा आणि महाविकासाला साथ द्या,’ असे आवाहन करतानाच ‘आम्ही राजकारण्यांना वाड्यावरून बांधावर आणण्याचा चंग बांधला आहे,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. फलटण येथे ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दीत झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ‘सामान्य माणसेच क्रांती करू शकतात. आता फलटण तालुक्यात क्रांतीची वेळ आली आहे,’ असे सांगून खा. शेट्टी म्हणाले, ‘सामान्य माणूस पिसाळला, तर तुमची शंभरी भरलीच समजा. घराघरात भांडणे लावून राजकारण करणाऱ्या दोन्ही काँग्रेसना जनतेने संपवावे. या मंडळींना सत्तेचा माज आला आहे. आपल्या डोक्यावर कायम लाल दिवा राहणारच, असा त्यांचा समज आहे. त्यांचा माज उतरविण्याचा शब्द मी देतो.’ ‘आमचा उमेदवार ‘शोपीस’ नसेल,’ अशा शब्दांत आमदार दीपक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावतानाच सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना लुटणारे साखर कारखानदार व बँका बुडवणाऱ्यांची चौकशी लावू, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. ते म्हणाले, ‘फलटणमध्ये काही झाले तरी रासपचाच उमेदवार असणार आहेत. इथून पुढे कोणीही गुंडगिरी, अन्याय केला तर येरवडा जेलमध्ये जाल.’ यावेळी नगरसेवक अनुप शहा, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, स्वराज संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुकर माळवे, डॉ. उत्तमराव शेंडे, प्रकाश बोंगळे, दत्तूभाऊ धुमाळ, आमीर शेख आदी उपस्थित होते. जिल्हा युवक काँग्रेसचे दिगंबर आगवणे यांनी कार्यकर्त्यांसह स्वाभिमानीत प्रवेश केला. (प्रतिनिधी)