शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सहकार विभागाचे राजकीय षड्यंत्र

By admin | Updated: April 6, 2015 01:30 IST

जिल्हा बॅँक : माजी संचालकांचा आरोप; अपात्रतेला आव्हान देणार

सांगली : ऐन निवडणुकीत जिल्हा बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित करून त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरविण्याची सहकार विभागाची कृती म्हणजे राजकीय षड्यंत्रच आहे, असा गंभीर आरोप माजी संचालक विलासराव शिंदे आणि प्रा. सिकंदर जमादार यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. याप्रकरणी उच्च न्यायालयात आज, सोमवारी दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी वीस हजार रुपयांच्या लेखापरीक्षण शुल्क वसुलीची जबाबदारी बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर शनिवारी निश्चित करण्यात आली असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील ७३ (क व अ) या कलमानुसार हे ४० संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत. सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी ही कारवाई केली. हे सर्व संचालक १९९७ ते २०१२ या तीन पंचवार्षिक कालावधीतील असून, या दिग्गज नेत्यांना बँकेच्या कारभारापासून दूर राहावे लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. सध्या जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीतील अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव आहे, अशा अनेक माजी संचालकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहे. अशावेळीच सहकार विभागाने चौकशी शुल्काचा दणका दिल्याने यामागे राजकीय षड्यंत्र असल्याची टीका आता होत आहे. माजी संचालकांनी ही कारवाई जाणीवपूर्वक निवडणूक कालावधीत करून माजी संचालकांना अडचणीत आणले असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि प्रा. जमादार यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात आज, सोमवारी दाद मागणार असल्याचे सांगितले. न्यायालयाकडून याप्रकरणी योग्य न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. अद्याप नोटिसा नाहीत जिल्हा बॅँकेच्या ४० माजी संचालकांवर प्रत्येकी ४२५ रुपये चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केली आहे. मात्र, अद्याप याबाबतच्या नोटिसा सहकार विभागाकडून माजी संचालकांना प्राप्त झाल्या नाहीत. सोमवारी किंवा मंगळवारी या नोटिसा प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर माजी संचालक न्यायालयात जाणार आहेत. यांनी दाखल केले अर्ज चौकशी शुल्काची जबाबदारी ज्यांच्यावर निश्चित केली आहे, अशा माजी संचालकांपैकी विजय सगरे, डी. के. पाटील, इद्रिस नायकवडी, दिलीप वग्याणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले जात असतानाच कारवाई का केली? आक्षेपार्ह रकमेबद्दलची चौकशी सुरू असतानाच चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित करून राजकीयदृष्ट्या अडचण निर्माण केली जात आहे. आम्ही याप्रकरणी न्यायालयाकडे दाद मागू. - विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी हे एक राजकीय षड्यंत्र आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील आक्षेपार्ह रकमेची जबाबदारी निश्चित झाल्यानंतरही माजी संचालकांना न्यायालयीन दिलासा मिळाला होता. त्यामुळे न्यायालयाकडून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. - प्रा. सिकंदर जमादार, माजी संचालक