शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

ऊस पळवापळवीचे धोरण घातक

By admin | Updated: September 26, 2016 00:12 IST

शंभूराज देसाई : साखर कारखान्याची ४६ वी वार्षिक सर्वसाधरण सभा

पाटण : ‘लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या उत्तर व दक्षिणेस खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले असून, त्यांचे देसाई कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या पळवापळवीचे धोरण व अतिक्रमण घातक आहे. ते थांबवावे लागणार आहे. त्यासाठी संचालक व ऊस उत्पादक सभासद यांच्यात समन्वय ठेवा,’ असे आवाहन देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शंभूराज देसाई यांनी केले. देसाई कारखान्याच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आ. देसाई म्हणाले, ‘चालू हंगामात राज्यातील ५० टक्के कारखाने ऊस टंचाईमुळे बंद राहण्याची भीती आहे. आघाडी शासनाने सहकारी कारखानदारी मोडीत काढून तेच कारखाने खासगी तत्त्वावर स्वत:च्या नातेवाईक व बगलबच्च्यांना चालविण्यास दिले आहेत. साखरेला चांगला भाव मिळावा म्हणून राज्यातील सर्व कारखानदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले पाहिजे. देसाई कारखान्याची ४५ वर्षे जुनी मशिनरी असून, यावर्षीच्या हंगामासाठी ७० टक्के नूतनीकरण केले जाणार आहे. यावर्षी पावणे दोन लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी दिवसाला २००० टन उसाचे गाळप झाले पाहिजे आणि पावणेबारा साखर उतारा मिळाला पाहिजे.’ यावेळी रवींद्र भाकरे, बळवंत जानुगडे , बाळकृष्ण पवार यांचा चांगले ऊस उत्पादक म्हणून सत्कार करण्यात आला. सभेस रविराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपसभापती डी. आर. पाटील सर्व संचालक सभासद व शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी) एफआरपी देऊनसुद्धा कारखाना फायद्यात ‘गतवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देऊनसुद्धा देसाई कारखान्यास गत हंगामात साडेचार लाख रुपये नफा गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा झाला आहे. बाकीच्या कारखान्यांनी एफआरपीचे १००० रुपये थकविले आहेत,’ असे देसाई यांनी सांगितले. विमान बनविण्याऱ्या कॅप्टनचे कौतुक... साळवे, ता. पाटण गावचे सुपुत्र कॅप्टन अमोल यादव यांनी विमान बनविले. त्याचा सत्कार झाला. यावेळी कॅप्टन यादव म्हणाले, ‘मी भारतात पहिले विमान बनविले. त्याचे राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आता २०० एकर जमीन व ३०० कोटी रुपये देऊन विमान बनविण्याचा कारखाना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विरोधकांना कारखाना उभा करता आला नाही ‘विरोधकांनी देसाई कारखान्याच्या निवडणुकीत पडद्यामागून पॅनेल उभे करून राजकारण केले. त्यामुळे २५ लाखांचा खर्च कारखान्याला झाला आणि हीच मंडळी आता देसाई कारखान्याचा ऊस बाहेर घालण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्यांना स्वत:चा कारखाना अद्याप उभा करता आलेला नाही,’ अशी टीका आ. देसाई यांनी केली.