शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

पोलीसदादा घेतील आता आस्थेने दखल !

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

पोलीस अधीक्षकांचा नवा फंडा : प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल नंबरसह झळकल्या पाट्या

दत्ता यादव ल्ल सातारापोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अथवा चौकशीसाठी येणाऱ्या व्यक्तीला अनेकवेळा वागणूक व्यवस्थित मिळत नसते. परिणामी पोलिसांविषयी गैरसमज वाढत जातात. बऱ्याचदा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यावेळी नेमके कोणाशी बोलावे, तक्रारदाराला सुचत नाही. तसचे बहुतांशवेळा पोलिसांकडून उद्धट वर्तन होत असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एक नवा फंडा अंमलात आणला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या मोबाईल नंबरसह पाट्या झळकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आता पोलीसदादा आस्थेने दखल घेतील.पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीला चांगली वागणूक दिली जात नाही, हा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव असेल. तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार समजून अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होत असतो. परिणामी तो तक्रार न देताच घरचा रस्ता धरतो. यापूर्वी पोलीस ठाण्यात केवळ तक्रार न घेतल्यामुळे पोलिसांवरही खोटे आरोप झालेले आहेत. त्यामुळे विनाकारण पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर जात होती. एखादा नवखा माणूस पोलीस ठाण्यात गेलाच तर तो कावऱ्या बावऱ्या होतो. कोठे चौकशी करायची, कोणाला काय विचारायचे, हे समजत नसते. तेथे असलेल्या पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही तर कोणाला भेटायचे, असा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो. अधिकारी व पोलिसांच्या खिशावर केवळ त्यांची नावे लिहिलेली असतात; परंतु समजा कोणी तक्रार अथवा म्हणणे ऐकून घेतलेच नाही तर कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न तक्रारदारासमोर निर्माण होत असतो. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस डॉ. अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वेगळाच फंडा अंमलात आणला आहे. पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराशेजारी एक पाटी लावली आहे. आपली तक्रार नोंदवून न घेतल्यास किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, टाळाटाळ केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्या पाटीवर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे आणि अन्य एका अधिकाऱ्याचा नंबर त्या पाटीवर देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्यात ही ‘आस्थेची’ पाटी झळकत आहे. पोलीस ठाण्यात येणारे नागरिक ही पाटी वाचून समाधान व्यक्त करत आहेत. या सूचना फलकामुळे तरी पोलीस नक्कीच आस्थेने तक्रारदाराशी वागतील आणि नागरिकांचाही पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होईल.