शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादा घेतील आता आस्थेने दखल !

By admin | Updated: July 12, 2014 23:48 IST

पोलीस अधीक्षकांचा नवा फंडा : प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाइल नंबरसह झळकल्या पाट्या

दत्ता यादव ल्ल सातारापोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अथवा चौकशीसाठी येणाऱ्या व्यक्तीला अनेकवेळा वागणूक व्यवस्थित मिळत नसते. परिणामी पोलिसांविषयी गैरसमज वाढत जातात. बऱ्याचदा तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जाते. त्यावेळी नेमके कोणाशी बोलावे, तक्रारदाराला सुचत नाही. तसचे बहुतांशवेळा पोलिसांकडून उद्धट वर्तन होत असल्यामुळे याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एक नवा फंडा अंमलात आणला आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या मोबाईल नंबरसह पाट्या झळकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आता पोलीसदादा आस्थेने दखल घेतील.पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीला चांगली वागणूक दिली जात नाही, हा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव असेल. तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार समजून अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे त्या व्यक्तीवर अन्याय होत असतो. परिणामी तो तक्रार न देताच घरचा रस्ता धरतो. यापूर्वी पोलीस ठाण्यात केवळ तक्रार न घेतल्यामुळे पोलिसांवरही खोटे आरोप झालेले आहेत. त्यामुळे विनाकारण पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर जात होती. एखादा नवखा माणूस पोलीस ठाण्यात गेलाच तर तो कावऱ्या बावऱ्या होतो. कोठे चौकशी करायची, कोणाला काय विचारायचे, हे समजत नसते. तेथे असलेल्या पोलिसांकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही तर कोणाला भेटायचे, असा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो. अधिकारी व पोलिसांच्या खिशावर केवळ त्यांची नावे लिहिलेली असतात; परंतु समजा कोणी तक्रार अथवा म्हणणे ऐकून घेतलेच नाही तर कोणाकडे तक्रार करायची, असा प्रश्न तक्रारदारासमोर निर्माण होत असतो. या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस डॉ. अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वेगळाच फंडा अंमलात आणला आहे. पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदाराशेजारी एक पाटी लावली आहे. आपली तक्रार नोंदवून न घेतल्यास किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याने तुमचे म्हणणे ऐकून न घेतल्यास, टाळाटाळ केल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्या पाटीवर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे आणि अन्य एका अधिकाऱ्याचा नंबर त्या पाटीवर देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर पोलीस ठाण्यात ही ‘आस्थेची’ पाटी झळकत आहे. पोलीस ठाण्यात येणारे नागरिक ही पाटी वाचून समाधान व्यक्त करत आहेत. या सूचना फलकामुळे तरी पोलीस नक्कीच आस्थेने तक्रारदाराशी वागतील आणि नागरिकांचाही पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर होईल.