शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोलिसांचा वॉच; वचकही हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST

कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू ...

कोरोनाचं संकट येऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या संकटानं सर्वांनाच ग्रासलं आहे. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू असून दररोज रुग्णवाढीचे मोठमोठे आकडे समोर येत आहेत. सातारा जिल्ह्यात तर बाधित दीड लाखाजवळ पोहोचलेत. त्यामुळे कोरोना संकट रोखण्याची जबाबदारी नागरिकांचीच अधिक आहे. त्यासाठी शासन नियमांचे पालन आवश्यकच आहे. प्रशासन आपल्यासाठी राबत असताना त्यांना मदतीची भूमिका घ्यायलाच हवी. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचीही भूमिका महत्त्वाची आहे.

कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पण, अनेकवेळा पोलिसांनाच कारवाई करताना अनेकांचे मोबाईल कॉल येतात. अशावेळी कायदा महत्त्वाचा मानून चूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीच गरज आहे. तरच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर वचक बसेल. तसेच जिल्ह्याच्या सीमेवरही कडक बंदोबस्त असायला हवा. प्रवासाची परवानगी असेल तरच पुढे सोडण्यात यावे. कारण, जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात येणारे हे कोरोना वाहक ठरु शकतात. त्यामुळे अशा लोकांवर वॉच असायलाच हवा. तरच कोरोनाला अटकाव बसण्यास मदत होईल.

चौकट :

... तरच इतरांवर वचक !

कोरोनामुळे निर्बंध असल्याने जिल्ह्यातील पोलीस दक्ष आहेत. पण, अनेकवेळा कारवाई दरम्यान पोलिसांकडून काहींना कोणाच्या तरी मोबाईल कॉलमुळे सोडून द्यावे लागते. अशावेळी पोलिसांनी कायद्यापुढे सर्व समानच हे तत्त्व अंगिकारुन कारवाई करण्याची गरज आहे. तरच इतरांवरही वचक बसण्यास मदत होईल.

- नितीन काळेल

......................................................