शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

चित्रपटाच्या कथेप्रमाणे अपहरण करून केलेल्या खुनाचा उलगडा, तिघेजण अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 12:58 IST

किशोर रामचंद्र गायकवाड (वय २८) याचे रेडिएशन पॉवरच्या पैशाच्या कारणावरून हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे झालेले अपहरण व खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांनी उलगडा केला आहे

सातारा : गायकवाडवाडी, ता. कराड येथील  किशोर रामचंद्र गायकवाड (वय २८) याचे रेडिएशन पॉवरच्या पैशाच्या कारणावरून हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे झालेले अपहरण व खुनाचा स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांनी उलगडा केला आहे. याप्रकरणी सर्जेराव राजवस-सावंत ऊर्फ महाराज, सागर देसाई व राहुल शिंदे (सर्व रा. नेर्ले, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, किशोर गायकवाड यांचे १३ जुलै २०१७ रोजी  कारसह बेपत्ता झाल्याची तक्रार उंब्रज पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांना त्याचा शोध घेण्यास यश येत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांनी संदीप पाटील यांना शोध घेण्याची विनंती केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. 

त्यातील मुख्य सूत्रधार सर्जेराव सावंत, त्याचा मेव्हणा सागर देसाई व साथीदार राहुल शिंदे यांनी किशोर गायकवाडकडून रेडिएशन पॉवर व्यवसायासाठी ११ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे किशोरने वारंवार मागितले असता सावंत यांच्याकडून टाळाटाळ होत होती. 

या त्रासाला कंटाळून सावंत याने सागर व राहुल यांच्या मदतीने पूर्वनियोजित कट केला. एका फ्लॅटमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून क्लच वायरने किशोरचा गळा आवळून व लोखंडी रॉडने डोक्यामध्ये मारून गंभीर दुखापत करून त्याचा खून केला. त्यानंतर तो मृतदेह कारच्या डिकीमध्ये टाकून कोल्हापूरमधील विशालगडाच्या घनदाट जंगलामध्ये कड्यावरून कडेलोट करून दिला. त्यानंतर कोणाला संशय येऊ नये, म्हणून किशोरचा मोबाईल स्वत:जवळ ठेवून तो पुणे, मुंबई परिसरात फिरवला. तिकडेच टाकून दिला.  त्यानंतर किशोरची गाडी पुणे, मुंबई, नाशिक, नगरमार्गे अकलूजमधील एका अडगळीच्या ठिकाणी सोडून दिल्याची कबुली दिली.