शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलीस हैराण

By admin | Updated: June 11, 2015 00:53 IST

सुट्यांचे वांदे : ब्रिटीशकालीन मंजूर पदसंख्या एवढेच आताही मनुष्यबळ

परळी: अतिरिक्त ताण-तणावामुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील ताण आणखीनच वाढत चालला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण ग्रामीण भाग येत आहे. मात्र पोलिसांचे अपुरे मणुष्यबळ आणि वाढत चाललेला क्राईम रेट यामुळे पोलीस अक्षरश: हतबल झाले आहेत.सध्याही पोलिसांचे ब्रिटीशकालीन कामकाज सुरू आहे. १९२९ च्या मंजूर पदसंख्ये एवढेच कर्मचारी सध्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांचीही काम करताना मोठी दमछाक होत आहे. दुसरीकडे पोलिसांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. सततच्या कामामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत चालला आहे.सातारा तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे १५२ गावे येतात. त्यामध्ये वाडी-वस्त्या आहेत. गावची लोकसंख्याही वाढत चालली आहे. गावांच्या हद्दी वाढल्या आहेत; परंतु पोलिसांची संख्या मात्र त्या मानाने वाढली नाही. इंग्रजांच्या कालावधीत १९२९ मध्ये जी पदसंख्या होती तेवढी पदसंख्या २०१५ मध्येही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाण्याचा कारभार चालविताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही जीव मेटाकुटीला येत आहे.सातारा तालुका पोलीस ठाण्यात सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. आठवड्यातील चार दिवस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्त, पेट्रोलिंग काम करावे लागते. मोर्चे, आंदोलने, गटतटातील वाद, मिरवणुका यासाठी सातत्याने बंदोबस्त वाढवावा लागतो. तालुका पोलीस ठाण्यात सातारा शहरातीलही काहीसा भाग जोडला गेला आहे. त्यामुळे वाढता विस्तार पाहता लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रोजगाराच्या इतर संधी येथे निर्माण झालेल्या असल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या सगळ्यांवर अवघे चार अधिकारी व ५५ कर्मचारी कसे नियंत्रण राखणार, हा मोठा प्रश्नच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर्मचारी वाढीची मागणी केल्यास आश्वासने सातत्याने दिले जात आहेत. मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि ठाण्याच्या हद्दीत गावे जास्त आहेत. त्यातच महिला कर्मचारी संख्या जास्त असल्याने अनेकवेळा अडीअडचणी येत आहेत. त्यामुळे अजून दहा कर्मचारी वाढल्यास कामाचा ताण थोडासा कमी होऊ शकतो.-दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक सातारा तालुकासणासुदीचे दिवस बंदोबस्तामध्ये !सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकूण ४ अधिकारी व ५५ कर्मचारी आहेत. त्यामध्ये एक महिला अधिकारी व १९ महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे पुरुष कर्मचाऱ्यास जास्त कामाचा ताण पडत आहे. महिला कर्मचाऱ्यास रात्रपाळीस ठेवता येत नसल्याने पुरुष कर्मचाऱ्यास दिवस-रात्र काम करावे लागत आहे.पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे घडतात. त्यांच्या तपासासाठीही पुरेसा वेळ कर्मचाऱ्यांना देता येत नाही. सणासुदीला तर सुटी मिळणे सोडाच, आठवडा सुटीही अनेकदा मिळत नाहीत. लगतच्या पोलीस ठाण्याच्या मदतीला जावे लागते, ते वेगळेच. या कारणांमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरील ताण आणखीनच वाढतच चालला आहे.