शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलीस हैराण

By admin | Updated: June 11, 2015 00:53 IST

सुट्यांचे वांदे : ब्रिटीशकालीन मंजूर पदसंख्या एवढेच आताही मनुष्यबळ

परळी: अतिरिक्त ताण-तणावामुळे दिवसेंदिवस पोलिसांवरील ताण आणखीनच वाढत चालला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत संपूर्ण ग्रामीण भाग येत आहे. मात्र पोलिसांचे अपुरे मणुष्यबळ आणि वाढत चाललेला क्राईम रेट यामुळे पोलीस अक्षरश: हतबल झाले आहेत.सध्याही पोलिसांचे ब्रिटीशकालीन कामकाज सुरू आहे. १९२९ च्या मंजूर पदसंख्ये एवढेच कर्मचारी सध्या आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अधिकाऱ्यांचीही काम करताना मोठी दमछाक होत आहे. दुसरीकडे पोलिसांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. सततच्या कामामुळे कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत चालला आहे.सातारा तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत सुमारे १५२ गावे येतात. त्यामध्ये वाडी-वस्त्या आहेत. गावची लोकसंख्याही वाढत चालली आहे. गावांच्या हद्दी वाढल्या आहेत; परंतु पोलिसांची संख्या मात्र त्या मानाने वाढली नाही. इंग्रजांच्या कालावधीत १९२९ मध्ये जी पदसंख्या होती तेवढी पदसंख्या २०१५ मध्येही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाण्याचा कारभार चालविताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही जीव मेटाकुटीला येत आहे.सातारा तालुका पोलीस ठाण्यात सध्या ५५ कर्मचारी कार्यरत आहेत. आठवड्यातील चार दिवस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्त, पेट्रोलिंग काम करावे लागते. मोर्चे, आंदोलने, गटतटातील वाद, मिरवणुका यासाठी सातत्याने बंदोबस्त वाढवावा लागतो. तालुका पोलीस ठाण्यात सातारा शहरातीलही काहीसा भाग जोडला गेला आहे. त्यामुळे वाढता विस्तार पाहता लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रोजगाराच्या इतर संधी येथे निर्माण झालेल्या असल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या सगळ्यांवर अवघे चार अधिकारी व ५५ कर्मचारी कसे नियंत्रण राखणार, हा मोठा प्रश्नच आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर्मचारी वाढीची मागणी केल्यास आश्वासने सातत्याने दिले जात आहेत. मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि ठाण्याच्या हद्दीत गावे जास्त आहेत. त्यातच महिला कर्मचारी संख्या जास्त असल्याने अनेकवेळा अडीअडचणी येत आहेत. त्यामुळे अजून दहा कर्मचारी वाढल्यास कामाचा ताण थोडासा कमी होऊ शकतो.-दत्तात्रय नाळे, पोलीस निरीक्षक सातारा तालुकासणासुदीचे दिवस बंदोबस्तामध्ये !सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकूण ४ अधिकारी व ५५ कर्मचारी आहेत. त्यामध्ये एक महिला अधिकारी व १९ महिला कर्मचारी आहेत. त्यामुळे पुरुष कर्मचाऱ्यास जास्त कामाचा ताण पडत आहे. महिला कर्मचाऱ्यास रात्रपाळीस ठेवता येत नसल्याने पुरुष कर्मचाऱ्यास दिवस-रात्र काम करावे लागत आहे.पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक गुन्हे घडतात. त्यांच्या तपासासाठीही पुरेसा वेळ कर्मचाऱ्यांना देता येत नाही. सणासुदीला तर सुटी मिळणे सोडाच, आठवडा सुटीही अनेकदा मिळत नाहीत. लगतच्या पोलीस ठाण्याच्या मदतीला जावे लागते, ते वेगळेच. या कारणांमुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरील ताण आणखीनच वाढतच चालला आहे.