शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

खांब रस्त्यावर अन् गटारे वाऱ्यावर !

By admin | Updated: March 29, 2016 00:28 IST

वाहनांच्या संख्येत वाढ : लोणंदला वाहतुकीच्या समस्येचा विळखा; शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता महत्त्वाचा --लोणंदचं रणकंदन

राहिद सय्यद -- लोणंद -लोणंद शहरातून जाणारा शिरवळ-बारामती चौपदरीकरण रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तसेच लोणंद-सातारा, लोणंद-खंडाळा, लोणंद-फलटण या बाजूकडून सर्वच रस्त्यांवर सर्व प्रकारची व अवजड वाहनांची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच लोणंद मधील विद्युत, टेलिफोन खांब अडथळा ठरत आहेत. दुकानासमोरील पार्किंग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटार व्यवस्था नसल्याने लोणंद शहर वाहतुकीच्या समस्यांच्या विळख्यात अडकल्याचे दिसत आहे.कांद्याची मोठी बाजारपेठ असलेले लोणंद शहर हे अनेक गावांतून येणाऱ्या लोकांसाठी रोजगार मिळवून देणारे ठरले आहे. त्यामुळे लोकांची व वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक लोकांना ये-जा करताना गर्दीचा संघर्ष करावा लागत आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिंगरोड होणे गरजेचे आहे. शिरवळ-बारामती हे चौपदकरीकरण प्रभाग ४, ५, ६ मधून जाणारे आहे. लोणंद नगरपंचायतीचे पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना १७ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी १७ जागांसाठी १०६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. परंतु लोणंदमधील नागरिकांना वर्षानुवर्षे ज्या समस्या उद्भवत आहेत त्याकडे कोणत्याही पक्षाचे किंवा सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही. क्त प्रत्येक निवडणुकीवेळी सर्वच नेत्याकडून आश्वासने सोडून काहीही मिळत नाही अशी स्थिती आहे. येथील प्रभाग क्र. ४, ५, ६ हे अनेक मूलभूत समस्यांनी ग्रासलेले दिसून येत आहेत. यावर उपाययोजना होणे महत्वाचे आहे. प्रभाग क्र. ४ हा इंदिरा नगर, बाळासाहेब नगर, सरहदेचा ओढा परिसर असून, अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे. प्रभागाची लोकसंख्या ९१७ असून, मतदार ९०३ आहेत. या प्रभागांमध्ये अनियमितपणे पाणी, रस्ता, अंतर्गत गटारे, सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतालय, कचराकुंड्या अशा अनेक गोष्टींच्या समस्यांनी हा प्रभाग ग्रासलेला आहे.प्रभाग क्र. ५ व ६ शिरवळ चौक ते अहिल्यादेवी स्मारक आहे. प्रभाग क्र. ५ ची लोकसंख्या ११२५ असून, मतदार १००० आहेत. इथे सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी आरक्षण आहे. प्रभाग ६ मध्ये लोकसंख्या १०९६ आहे. मतदार संख्या सर्वात कमी म्हणजे ३९९ इतकी आहे. येथील निवडणुकीतील आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये अपक्षांची भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील महत्त्वाच्या समस्या म्हणजे वीज, पाणी, अंतर्गत गटारे, रस्ते नाहीत. लोकांना निवांतक्षणी विश्रांती घेता यावी, तसेच लहान मुला-मुलींसाठी गार्डन, पार्क असण्याची गरज आहे. दोन्ही प्रभागांमध्ये वाहतुकीच्या त्रासामुळे पालकांना मुलांना शाळेत सोडावे लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यासाठी पर्यायी रस्ता गावाबाहेरून होण्याची गरज आहे. प्रभाग ४ मध्ये रस्ता, गटारे, कचराकुंडी नसल्याने नागरिक सर्व कचरा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत आहे.- दादा रणदिवे, नागरिक (प्रभाग क्र. ४)प्रभाग ५ मध्ये वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण जास्त असल्याने बाह्य वळण रस्ता होणे गरजेचे आहे. तसेच मोकाट जनावरे, ओला व सुका कचरा यांचे नियोजन करण्याची गरज आहे.- नितीन करंजे, नागरिक (प्रभाग क्र. ५)लोणंद-सातारा रस्त्यावर दोन्ही बाजूस सांडपाणी, गटारे यांची व्यवस्था नसल्याने सांडपाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच रस्त्यालगत असलेले विद्युत खांब, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. - विश्वास कापसे, नागरिक (प्रभाग क्र. ६)