शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

जकातवाडी होणार कवितांचे गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 23:27 IST

सातारा : शहराच्या जवळच असलेले जकातवाडी हे गाव ‘माझं गाव कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयाच्या वतीने ...

सातारा : शहराच्या जवळच असलेले जकातवाडी हे गाव ‘माझं गाव कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील चित्रकारांना गावातील भिंतींवर कविता रेखाटण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, काही नामवंत चित्रकारांनी या गावातील भिंतीवर कविता रेखाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच जकातवाडीची ओळख ‘माझं गाव कवितांचे गाव’ म्हणून होणार आहे.सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याप्रमाणेच जकातवाडी हे गाव ‘कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. त्यानुसार या गावात काही प्रमाणात काम सुरू होते. सुरुवातीच्या काळात लोखंडी फ्रेम तयार करून त्यावर कविता लावण्याचे नियोजन होते. मात्र, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील भिंतीवरच कविता रेखाटण्याचे नियोजन करण्यात आले. गावकऱ्यांनीही त्याला संमती दर्शविली आणि नुकतेच याठिकाणी घरांच्या भिंतीवर कविता रेखाटण्यास सुरुवात झाली. ज्या घरांवर कविता रेखाटली जात आहे, ते घरच या कवितांची काळजी घेणार आहे. त्यामुळे गावकºयांच्या सहभागातूनच हे कवितांचे गाव उभे राहत आहे. या उपक्रमासाठी विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय, ग्रामपंचायत जकातवाडी, गावातील सांस्कृतिक मंडळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. गावामध्ये अनेक निवांतपणे थांबण्यासारखी ठिकाणे आहेत. मोठी वडाची झाडे आहेत, ज्याठिकाणी वाटसरू निवांत बसू शकतात. त्या ठिकाणीही कविता लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील पाणवठे, बसस्थानक, शाळा आणि मंदिर तसेच ग्रामपंचायतीच्या इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी या कविता रंगविण्यात येत आहेत. त्याबरोबरच येथील सार्वजनिक ग्राम वाचनालयामध्ये प्रत्येक कवीची विविध पुस्तके वाचण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.‘कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प केला होता. त्याला सर्वांची साथ मिळाली. त्यामुळे आता गावातील प्रत्येक घरावर कविता रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. जकातवाडी हे कवितांचे गाव होणार म्हणून समाधान आहे.- प्रल्हाद पार्टे, अध्यक्ष, सार्वजनिक ग्रामवाचनालय, जकातवाडी