शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अगोदर सत्तर हजार कोटींचा हिशेब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:37 IST

कºहाड : ‘मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. शरद पवारांचा विद्यार्थी नव्हे. खरं बोलणं रक्तातला गुण आहे. सत्तेत असून, सत्तेच्या विरोधात बोलतो. यावर शरद पवार टीका करतात. पक्षातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे जनता विसरलेली नाही. आधी ७० हजार कोटींचा हिशेब द्यावा,’ असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

कºहाड : ‘मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. शरद पवारांचा विद्यार्थी नव्हे. खरं बोलणं रक्तातला गुण आहे. सत्तेत असून, सत्तेच्या विरोधात बोलतो. यावर शरद पवार टीका करतात. पक्षातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे जनता विसरलेली नाही. आधी ७० हजार कोटींचा हिशेब द्यावा,’ असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला दिले. कºहाड येथील भाजी मंडईतील जनता व्यासपीठावर रविवारी शिवसेनेचा शेतकरी संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार दगडू सकपाळ, आमदार शंभूराज देसाई, गजानन कीर्तीकर, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गेले दोन दिवस मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथल्या कार्यकर्त्यांचे प्रेम आणि उत्साह पाहत आहे आणि त्याबरोबरच इथल्या जनतेचा सरकारविरोधातील आक्रोश अनुभवत आहे. यशवंतराव चव्हाण यांची शनिवारीच पुण्यतिथी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवीत असल्याचे सांगितले. मात्र, ते नेमकं कसलं राजकारण करताहेत, हे अवघ्या महाराष्ट्राने ओळखले आहे. महाराष्ट्रातील राजकारण नासत चाललं आहे. होय, आमचा सरकारला पाठिंबा आहे; पण याचा अर्थ असा नाही की चुकीचं चालल्यावर बोलू नये. आणि खरं बोलणं हा तर आमचा गुण आहे. हे धाडस मी करत असताना खरंतर एखाद्याने माझे कौतुक करायला पाहिजे; पण उलट माझ्यावर टीका होते, याचं मला विशेष वाटतं.वीज कनेक्शन मागितलं तरी मिळत नाही. वीज बिले वाढवून येताहेत. शेतकºयांच्या कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झालाय आणि या सगळ्या परिस्थितीत तीन वर्षांनंतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं या योजनेला नाव दिलं. मला खूप आनंद झाला; पण ज्यादिवशी शेतकºयांचा सात-बारा कोरा होईल, त्यादिवशी खºया अर्थाने मला आनंद होईल. शेतकरी म्हणजे कोणी मल्ल्या नाही. तो बळिराजा आहे. तुम्हा-आम्हा सगळ्यांचा तो पोशिंदा आहे. अहो, तो मल्ल्या कोट्यवधींची फसवणूक करून तिकडं मजा मारतोय आणि दुसरीकडं आमचा शेतकरी मुलीचं लग्न कसं करायचं, या विवंचनेत आत्महत्या करतोय. याचा विचार सरकार करणार आहे की नाही, हा माझा सवाल आहे....मग त्याचीही जाहिरात करा!तुम्हाला कर्जमाफीचा किती फायदा झाला? तुम्हाला जीएसटीचा किती फायदा झाला? तुम्हाला नोटाबंदीचा किती फायदा झाला? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला विचारले. समोरून ‘नाही’ असे उत्तर आले. त्यावेळी ठाकरे म्हणाले, ‘रविशंकर नावाचे ज्येष्ठ नेते तर नोटाबंदीमुळे वेश्या व्यवसायाला चाप लागला,’ असं सांगतात. त्यांना हे कसे कळाले माहीत नाही. आणि खरंच जर याला चाप लागला असेल तर त्याचीही जाहिरात करा,’ असा टोला त्यांनी भाजप सरकारला लगावला.भाजप, राष्ट्रवादीला हल्लाबोलचा अधिकार नाहीकºहाडात शनिवारी राष्ट्रवादीचा हल्लाबोल झाला; पण अजित पवारांनी सोलापूरच्या शेतकºयाला दिलेले उत्तर अजूनही शेतकरी विसरलेला नाही, तर शेतकºयाच्या छातीवर नाही तर पायावर गोळ्या घालायला पाहिजे होत्या, असे विधान करणारे भाजप नेते या दोघांनाही हल्लाबोल करण्याचा नैतिक अधिकार नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त शेतकºयाला आहे. तरीही तुम्हाला हल्लाबोल आंदोलन करायचे असेल तर आधी ७० हजार कोटींचा हिशेब द्या आणि मग खुशाल हल्लाबोल करा,’ असा टोला ठाकरे यांनी राष्ट्रवादीला लगावला.

टॅग्स :Politicsराजकारण