शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

प्लास्टिक बंदीची मोहीम गारठली; कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 11:53 IST

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण ...

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे.

शहरातून दररोज वीस टनांपेक्षा जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात शंभरहून अधिक हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भांडीविक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

भाजीमंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी, बसस्थानक परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी प्लास्टिक कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

जाळले तर प्रदूषण; साठवले तर कचरा

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे की, तो पुरला तरी तो नष्ट होऊ शकत नाही. जाळला तर हवेचे प्रदूषण होते. त्यातून गंभीर आजारही होण्याची भीती असते. तसेच तो साठवून ठेवला तर त्यापासून दुर्गंधी व इतर आजारही होऊ शकतात.

कचऱ्यात दररोज २५ किलो प्लास्टिक

कऱ्हाड शहरातून दररोज सुमारे २४ टन कचरा संकलित केला जातो. या संकलित कचऱ्यात १० ते १२ टन सुका कचरा असतो. या सुक्या कचऱ्यात दररोज सरासरी २५ ते ३० किलो प्लास्टिक असते, असे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेची स्वच्छता टीम

१८ : घंटागाड्या

९ : संकलन वाहने

१४० : सफाई कर्मचारी

१३ : मुकादम

१ : आरोग्य निरीक्षक

दररोज जमा होणारा कचरा

११ टन : सुका कचरा

१३ टन : ओला कचरा

विघटनासाठी लागतात शेकडो वर्षे!

- प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

- प्लास्टिक पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचे विघटन होत नाही.

- पिशवीचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी चारशे ते पाचशे वर्षांचा कालावधी लागतो.

- आज आपण पिशवी वापरून टाकून दिली तर पुढच्या चार ते पाच पिढ्यांंना त्याचा त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदी