शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्लास्टिक बंदीची मोहीम गारठली; कचऱ्यात जिथे-तिथे प्लास्टिक दिसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 11:53 IST

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण ...

कऱ्हाड : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचऱ्यात साचणाऱ्या प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे.

शहरातून दररोज वीस टनांपेक्षा जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात शंभरहून अधिक हॉटेल्स, चायनीज, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भांडीविक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.

भाजीमंडई येथील चांदणी चौक, कृष्णाबाई कार्यालय रोड, हटकेश्वर मंदिर, बापूजी साळुंखे पुतळा परिसर, मंगळवार पेठ, स्टेडियम परिसर, प्रभात टॉकीज, बाराडबरी, बसस्थानक परिसर, कर्मवीर चौक, कृष्णा नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, दूरध्वनी केंद्र परिसर याठिकाणी प्लास्टिक कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

जाळले तर प्रदूषण; साठवले तर कचरा

प्लास्टिक हा असा पदार्थ आहे की, तो पुरला तरी तो नष्ट होऊ शकत नाही. जाळला तर हवेचे प्रदूषण होते. त्यातून गंभीर आजारही होण्याची भीती असते. तसेच तो साठवून ठेवला तर त्यापासून दुर्गंधी व इतर आजारही होऊ शकतात.

कचऱ्यात दररोज २५ किलो प्लास्टिक

कऱ्हाड शहरातून दररोज सुमारे २४ टन कचरा संकलित केला जातो. या संकलित कचऱ्यात १० ते १२ टन सुका कचरा असतो. या सुक्या कचऱ्यात दररोज सरासरी २५ ते ३० किलो प्लास्टिक असते, असे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

पालिकेची स्वच्छता टीम

१८ : घंटागाड्या

९ : संकलन वाहने

१४० : सफाई कर्मचारी

१३ : मुकादम

१ : आरोग्य निरीक्षक

दररोज जमा होणारा कचरा

११ टन : सुका कचरा

१३ टन : ओला कचरा

विघटनासाठी लागतात शेकडो वर्षे!

- प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत.

- प्लास्टिक पिशव्यांची पहिली समस्या म्हणजे या पिशव्यांचे विघटन होत नाही.

- पिशवीचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी चारशे ते पाचशे वर्षांचा कालावधी लागतो.

- आज आपण पिशवी वापरून टाकून दिली तर पुढच्या चार ते पाच पिढ्यांंना त्याचा त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदी