शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

उरमोडीच्या पातळीवर ठरतेय स्मशानभूमीची जागा

By admin | Updated: August 8, 2014 00:41 IST

बनघर : आतापर्यंत आठवेळा उचलबांगडी; पावसाळ्यात शोधावी लागते जागा

विशाल गुजर - परळी ,, परळी खोऱ्यातील जवळपास नव्वद टक्के गावांत स्मशानभूमी आहे. मात्र, बनघर गाव याबाबतीत अधांतरीच आहे. उरमोडी धरणाच्या बाजूला हे गाव वसलेलं असल्यामुळे धरणातील पाणीच ठरवते गावच्या स्मशानभूमीची जागा. धरणातील पाणी जसे कमी होत जाईल तशी स्मशानभूमी सरकते. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते.बनघर हे गाव उरमोडी धरणात विस्थापित झाले आहे. २००० मध्ये त्याचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे झाले आहे. काही जणांना जमिनी मिळाल्या, काहींना मिळालीच नाही. तेथे पाण्याची गैरसोय, मुरमाड जमीन, मग खायचे काय, या विवंचनेमुळे या गावाने आपली मूळ जमीन सोडली नाही. या गावात १९५ कुटुंबे आहेत. ही कुटुंबे सहा ठिकाणी वसलेली आहेत. डोंगराच्या पायथ्याला गाव वसल्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी झाली आहे. धरणाची पाणीपातळी वाढली की अंत्यसंस्काराची जागा बदलावी लागते. उघड्यावर धरणाच्या काठी अंत्यसंस्कार केले जातात. पावसाळ्यात झाडाझुडपातून, काट्या-कुट्यातून, खाचखळग्यांतून वाट काढत स्मशानभूमीकडे जावे लागते. दीड-दोन किलोमीटरचा हा रस्ता तुडविणे म्हणजे जुलूम झाला आहे, अशा भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.गाव उरमोडी धरणात गेले आणि सर्वजण वेगवेगळ्या पाच ठिकाणी राहिले. त्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी बदलली आहे. पावसाळ्यात जागा शोधून अंत्यविधी करावा लागतो. - रमेश गुजर, ग्रामस्थ, बनघर