शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

उरमोडीच्या पातळीवर ठरतेय स्मशानभूमीची जागा

By admin | Updated: August 8, 2014 00:41 IST

बनघर : आतापर्यंत आठवेळा उचलबांगडी; पावसाळ्यात शोधावी लागते जागा

विशाल गुजर - परळी ,, परळी खोऱ्यातील जवळपास नव्वद टक्के गावांत स्मशानभूमी आहे. मात्र, बनघर गाव याबाबतीत अधांतरीच आहे. उरमोडी धरणाच्या बाजूला हे गाव वसलेलं असल्यामुळे धरणातील पाणीच ठरवते गावच्या स्मशानभूमीची जागा. धरणातील पाणी जसे कमी होत जाईल तशी स्मशानभूमी सरकते. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कारासाठी जागा शोधावी लागते.बनघर हे गाव उरमोडी धरणात विस्थापित झाले आहे. २००० मध्ये त्याचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे झाले आहे. काही जणांना जमिनी मिळाल्या, काहींना मिळालीच नाही. तेथे पाण्याची गैरसोय, मुरमाड जमीन, मग खायचे काय, या विवंचनेमुळे या गावाने आपली मूळ जमीन सोडली नाही. या गावात १९५ कुटुंबे आहेत. ही कुटुंबे सहा ठिकाणी वसलेली आहेत. डोंगराच्या पायथ्याला गाव वसल्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी झाली आहे. धरणाची पाणीपातळी वाढली की अंत्यसंस्काराची जागा बदलावी लागते. उघड्यावर धरणाच्या काठी अंत्यसंस्कार केले जातात. पावसाळ्यात झाडाझुडपातून, काट्या-कुट्यातून, खाचखळग्यांतून वाट काढत स्मशानभूमीकडे जावे लागते. दीड-दोन किलोमीटरचा हा रस्ता तुडविणे म्हणजे जुलूम झाला आहे, अशा भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी गावासाठी कायमस्वरूपी स्मशानभूमी बांधून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.गाव उरमोडी धरणात गेले आणि सर्वजण वेगवेगळ्या पाच ठिकाणी राहिले. त्यामुळे आतापर्यंत आठ ठिकाणी स्मशानभूमी बदलली आहे. पावसाळ्यात जागा शोधून अंत्यविधी करावा लागतो. - रमेश गुजर, ग्रामस्थ, बनघर