शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

पाटणला महामार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणला जाणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर आणि सांगली या ...

कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग पश्चिम महाराष्ट्रामधून कोकणला जाणारा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरून पुणे, सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणांहून अवजड वाहनांची कायम ये-जा सुरू असते. या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. आणि रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली. रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे आणि तातडीने चौपदरीकरण सुरू झाल्यामुळे तालुक्याचा विकास होणार, या आशेने जनतेच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच या मार्गावर पाटण येथे एसटी बसस्थानकानजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत अनेक वाहने आदळून अपघात होत आहेत. तसेच वाहनांचेही नुकसान होत आहे. या मार्गावरून सामान्य जनतेसह मंत्री, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींची वर्दळ असते. मात्र, जीवघेणे ठरणारे हे खड्डे बुजविण्याबाबत संबंधित विभागाला अद्यापही कुणी सूचना दिलेली नाही, हे दुर्दैव.

- चौकट

विकासाऐवजी निर्माण झाल्या समस्या

कऱ्हाड-चिपळूण रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली. मात्र, अद्यापही काम पूर्णत्वास गेले नाही. रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे जनतेत नाराजी आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे तालुक्याचा विकास होईल, अशी अपेक्षा असताना विकासाऐवजी समस्याच निर्माण झाल्या.

फोटो : ०७केआरडी०२

कॅप्शन : कऱ्हाड ते चिपळूण मार्गावर पाटण येथील बसस्थानकानजीक मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहने याठिकाणी आदळून अपघात होत आहेत. (छाया : प्रवीण जाधव)