शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिव्याभोवती पिंगा? आता वाजवा शिट्टी!

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : ‘श्रीराम’च्या वार्षिक सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीकास्त्र

फलटण : साखरधंद्यातले आपल्याला जास्त कळतेय, हे दाखवण्याच्या नादात अव्वाच्या सव्वा दर मागणारे आज सत्तेत आल्यावर गप्प बसून लाल दिव्याभोवती पिंगा घालत आहेत. दरासाठी आता तुमची शिट्टी का वाजत नाही? ऊस परिषद का होत नाही? आंदोलन होत नाही, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाव न घेता केला.येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण करीत आणला आहे. मोठ्या अडचणीतून कारखाना बाहेर काढताना एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. कारखान्याची देणी कमी करीत आणली असून सगळेच गोडधोड होत असताना कारखान्याला कधीही ऊस न घालणारे विरोधक सभेत नाहक प्रश्न उपस्थित करुन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातत्याने कारखान्याच्या विरोधकात कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांना खरेतर बोलण्याचा अधिकार नाही. विकृत बुध्दीने बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी कारखान्यात राजकारण आम्ही शिरू देणार नाही.’ शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना साखरधंदा व कारखाने तेजीत होते. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळत होता. आता सत्ताबदल झाल्याने व नवीन सरकारचा साखरधंदा व सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने साखरधंदा अडचणीत येऊ लागला आहे. यापूर्वी आमचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना ऊसदरासाठी जयसिंगपूरला ऊस परिषदा घेऊन दर ठरविणारे व आंदोलने करणारे आता कोठे आहेत, असा सवाल करुन आपल्याला शेती व साखर धंद्यातले जास्त कळतेय, असे समजणारे आता का आंदोलन करीत नाहीत, असा सवाल रामराजेंनी केला.संजीवराजे नाईक-निंबाळकर दादाराजे खर्डेकर, डॉ. बाळासाहेब शेंडे यांची भाषणे झाली. सभेपूर्वी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रामराजेंच्या हस्ते पार पडला. (प्रतिनिधी)श्रीराम’कडून ८४ कोटी शेतकऱ्यांना अदाश्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ३ लाख ३३ हजार ५०१ मेट्रिक टन उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७.८२ रुपये दराने ८४ कोटी ६७ लाख ३ हजार १२० रुपयांचे पेमेंट आजअखेर संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे श्रीराम जवाहरकडे गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तथापि, रामराजे नाईक-निंबाळकर, कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशराव आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीराम साखर उद्योगास जिल्हा बँकेतून उसाचे पेमेंट अदा करण्यासाठी ११ कोटी १ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याने उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७ रुपये ८२ पैसे प्रमाणे पेमेंट करण्याचे शक्य झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बलकवडीचे पाणी लवकरच आंदरुडलानीरा-देवघरच्या कालव्याचा प्रश्न एका गावामुळे अडला आहे. तो सुटल्यास कालव्यांची कामे मार्गी लागणार आहे. धोम-बलकवडीचे पाणी एक ते दीड वर्षात आंदरुडपर्यंत पोहोचणार आहे. मी पाहिलेले स्वप्न ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेले १० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधकांकडे मोठे मन नाही. त्यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. श्रीराम कारखाना सुरळीत चालू राहण्यासाठी संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन रामराजेंनी केले.विरोधकांचा सभात्याग अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी या सभेत दोन प्रश्न उपस्थित केले. त्यांची अपेक्षित उत्तरे त्यांना न मिळाल्याने त्यांनी सर्व विरोधकांना घेऊन सभात्याग केला. त्यावेळी काही सत्ताधारी व विरोधकांत प्रश्नांवरून ‘तू तू - मैं मैं’ झाली.