शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

लाल दिव्याभोवती पिंगा? आता वाजवा शिट्टी!

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : ‘श्रीराम’च्या वार्षिक सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीकास्त्र

फलटण : साखरधंद्यातले आपल्याला जास्त कळतेय, हे दाखवण्याच्या नादात अव्वाच्या सव्वा दर मागणारे आज सत्तेत आल्यावर गप्प बसून लाल दिव्याभोवती पिंगा घालत आहेत. दरासाठी आता तुमची शिट्टी का वाजत नाही? ऊस परिषद का होत नाही? आंदोलन होत नाही, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाव न घेता केला.येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण करीत आणला आहे. मोठ्या अडचणीतून कारखाना बाहेर काढताना एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. कारखान्याची देणी कमी करीत आणली असून सगळेच गोडधोड होत असताना कारखान्याला कधीही ऊस न घालणारे विरोधक सभेत नाहक प्रश्न उपस्थित करुन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातत्याने कारखान्याच्या विरोधकात कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांना खरेतर बोलण्याचा अधिकार नाही. विकृत बुध्दीने बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी कारखान्यात राजकारण आम्ही शिरू देणार नाही.’ शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना साखरधंदा व कारखाने तेजीत होते. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळत होता. आता सत्ताबदल झाल्याने व नवीन सरकारचा साखरधंदा व सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने साखरधंदा अडचणीत येऊ लागला आहे. यापूर्वी आमचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना ऊसदरासाठी जयसिंगपूरला ऊस परिषदा घेऊन दर ठरविणारे व आंदोलने करणारे आता कोठे आहेत, असा सवाल करुन आपल्याला शेती व साखर धंद्यातले जास्त कळतेय, असे समजणारे आता का आंदोलन करीत नाहीत, असा सवाल रामराजेंनी केला.संजीवराजे नाईक-निंबाळकर दादाराजे खर्डेकर, डॉ. बाळासाहेब शेंडे यांची भाषणे झाली. सभेपूर्वी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रामराजेंच्या हस्ते पार पडला. (प्रतिनिधी)श्रीराम’कडून ८४ कोटी शेतकऱ्यांना अदाश्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ३ लाख ३३ हजार ५०१ मेट्रिक टन उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७.८२ रुपये दराने ८४ कोटी ६७ लाख ३ हजार १२० रुपयांचे पेमेंट आजअखेर संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे श्रीराम जवाहरकडे गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तथापि, रामराजे नाईक-निंबाळकर, कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशराव आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीराम साखर उद्योगास जिल्हा बँकेतून उसाचे पेमेंट अदा करण्यासाठी ११ कोटी १ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याने उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७ रुपये ८२ पैसे प्रमाणे पेमेंट करण्याचे शक्य झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. बलकवडीचे पाणी लवकरच आंदरुडलानीरा-देवघरच्या कालव्याचा प्रश्न एका गावामुळे अडला आहे. तो सुटल्यास कालव्यांची कामे मार्गी लागणार आहे. धोम-बलकवडीचे पाणी एक ते दीड वर्षात आंदरुडपर्यंत पोहोचणार आहे. मी पाहिलेले स्वप्न ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेले १० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधकांकडे मोठे मन नाही. त्यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. श्रीराम कारखाना सुरळीत चालू राहण्यासाठी संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन रामराजेंनी केले.विरोधकांचा सभात्याग अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी या सभेत दोन प्रश्न उपस्थित केले. त्यांची अपेक्षित उत्तरे त्यांना न मिळाल्याने त्यांनी सर्व विरोधकांना घेऊन सभात्याग केला. त्यावेळी काही सत्ताधारी व विरोधकांत प्रश्नांवरून ‘तू तू - मैं मैं’ झाली.