शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

धोकादायक : पिंपरद-टाकळवाडी गावांना जोडणारा पुलाचा खांब खचला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 11:11 IST

हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

कोळकी : पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा पिलर खचला असून, मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा गेला असून, हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. यामुळे या कालव्यावरील बांधण्यात अनेक पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहे.

पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पूल सन १९१८ साली बांधला असल्याचे दगडावर टाकलेल्या सालावरून दिसून येत आहे. पुलास शंभर वर्षे होऊन गेले आहे. पुलाचे दगडी बांधकाम चुनखडीत बांधले आहे. नीरा उजवा कालवा बारा महिने पूर्ण क्षमतेने वाहत असतो. शिवाय पाण्याचा प्रवाह वेग खूप असतो. त्यामुळे या पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

जीर्ण पुलावर धोक्याची शक्यता...

- पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या भागात उसाचे क्षेत्र भरपूर असून, सध्या साखर कारखानाचे गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यास उसाची वाहतूक, ट्रँकर, बैलगाडी ट्रक या अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून सध्या सुरू आहे.- त्यामुळे पण मोठी दुर्घटना घडू शकते. नीरा उजवा कालवा ब्रिटिशकालीन बांधकाम असून, यास शंभर वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. कालव्यावरील सर्वच पूल कालबाह्य झाले आहेत. या कालव्यामधील मोऱ्यांचे काम सध्या सुरू आहे.- या पद्धतीने पुलाचेदेखील काम करण्यात यावे, असे टाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच राहुल इवरे यांनी पाटबंधारे विभागास पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर