शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

धोकादायक : पिंपरद-टाकळवाडी गावांना जोडणारा पुलाचा खांब खचला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 11:11 IST

हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

कोळकी : पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पुलाचा पिलर खचला असून, मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याची त्वरित दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

फलटण तालुक्यातून नीरा उजवा कालवा गेला असून, हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. यामुळे या कालव्यावरील बांधण्यात अनेक पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहे.

पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या गावांना जोडणारा नीरा उजवा कालव्यावरील पूल सन १९१८ साली बांधला असल्याचे दगडावर टाकलेल्या सालावरून दिसून येत आहे. पुलास शंभर वर्षे होऊन गेले आहे. पुलाचे दगडी बांधकाम चुनखडीत बांधले आहे. नीरा उजवा कालवा बारा महिने पूर्ण क्षमतेने वाहत असतो. शिवाय पाण्याचा प्रवाह वेग खूप असतो. त्यामुळे या पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत.

जीर्ण पुलावर धोक्याची शक्यता...

- पिंपरद-टाकळवाडी-गुणवरे या भागात उसाचे क्षेत्र भरपूर असून, सध्या साखर कारखानाचे गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यास उसाची वाहतूक, ट्रँकर, बैलगाडी ट्रक या अवजड वाहनांची वाहतूक या पुलावरून सध्या सुरू आहे.- त्यामुळे पण मोठी दुर्घटना घडू शकते. नीरा उजवा कालवा ब्रिटिशकालीन बांधकाम असून, यास शंभर वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. कालव्यावरील सर्वच पूल कालबाह्य झाले आहेत. या कालव्यामधील मोऱ्यांचे काम सध्या सुरू आहे.- या पद्धतीने पुलाचेदेखील काम करण्यात यावे, असे टाकळवाडी ग्रामपंचायत सरपंच राहुल इवरे यांनी पाटबंधारे विभागास पत्राद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर