शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

दुष्काळात डुकरांचा महिमा!

By admin | Updated: January 14, 2015 23:37 IST

रब्बी ज्वारीवर संक्रांत : पिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी त्रस्त

पिंपोडे ब्रुदुक : उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करित असतानाच सध्या रब्बी ज्वारी पिकाचे रानडुकरे अतोनात नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थती निर्माण झालेली आहे.यापूर्वी सोळशी, रणदुल्लाबाद, करंजखोप, सर्कलवाडी, राऊतवाडी, अनपटवाडी, आसनगाव या डोंगर पायथ्याच्या गावाना वन्य प्राण्यांचा त्रास नित्याचा होता. डोंगर पायथ्याच्या शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या प्रान्यांकडून होत होते. आजही होते आहे. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षापासून अगदी मानवी वस्तीजवळ हे प्राणी येऊ लागले आहेत. त्यामुळे नित्य रहदारी असलेल्या रस्त्याकडेच्या शेतातही हे प्राणी दिवसाही वास्तव्य करू लागले आहेत. त्यामुळे सध्या शेतात एकट्याने जाणे धाडसाचे ठरू लागले आहे.पिंपोडे बुद्रुकसह परिसरातील शिवारात ज्वारींचे पीक बहरात येऊ लागले आहे. मुळातच दुष्काळी सावटाचाली इथला शेतकरी वावरतो आहे. कधी अचानक थंडी वाढत आहे. तर कधी अवकाळी पाऊस या बदलत्या निसर्गचक्रामधून सध्या उभी असलेली ज्वारी, गहु, हरभरा ही पिके अजूनही पूर्णपणे हातात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.अशातच सध्या पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, घिगेवाडी, आसनगाव येथील शिवारात रानडुकरांनी धुमाकुळ घातला आहे. ज्वारीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर रानडुकरे नुकसान करित आहेत. त्यामुळे सध्या निसवलेली व पोटऱ्यात असलेली ज्वारी डोळ्यादेखत आडवी झालेली पहावी लागत आहे. या रानडुकरांचा बंदोबस्त करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य काम आहे. त्यामुळे वन खात्याने लक्ष घालण्याची मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. (वार्ताहर)४गेल्या चार वर्षापासून सोळशी, ता. कोरेगाव येथिल डोंगर रांगेपासून अरबवाडी, दुधनवाडी पर्यंतच्या डोंगरावर पवनचक्क्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्याकामी डोंगरमधून मोठ-मोठे रस्ते करण्यात आलेले आहेत. पवनचक्क्यांच्या सुरक्षेसाठी तेथे सुरक्षा रक्षक काम करतात. त्याचबरोबर पात्यांच्या घर-घर आवाजामुळे वन्य प्राण्यांनी आपले निवासस्थान बदलल्या लक्षात येते. एरव्ही दाट झाडी अथवा अडोशाला राहणारे लांडगा, तरस, रानडुक्कर आणि वन्यप्राणी सध्या मानवी वस्तीकडे सरकल्याचे लक्षात येते. अन् त्याचमुळे ऊस अथवा ज्वारीच्या पिकाचा आडोसा रानडुक्कर अथवा लांडगा, तरस या या प्राण्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. पिकांच्या नुकसानीस हे प्राणी कारणीभूत ठरु लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसाणीस सामोरे जावे लागत आहे.सध्या ज्वारी पोटरा धरू लागली आहे. त्यामुळे ज्वारीचे नुकसान भरून निघणार नाही. जवळपास अर्ध्या एकरामध्ये ज्वारीचे पीक अर्ध्यातच कुरतडुन टाकून रानडुकरांनी नुकसान केले आहे. वन विभागाने या प्राण्यांच्या बंदोबस्त करणे आवश्यक आहे.-नानासाहेब लेंभे, शेतकरी पिंपोडे बुदु्रकवन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागलेरात्र गस्त धोकादायकपिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.विद्युत करंटचा प्रयोगअनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.वन्य प्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागलेरात्र गस्त धोकादायकपिकांचे नुकसान हे बहुतेकवेळा रात्रीचेच होत असते. हे प्राणी दिवसां अडचणीचे ठिकाण शोधतात. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जर शेतकऱ्यांनी रात्रगस्त घालून या पाण्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केल्यास ते धोकादायक ठरू शकते. लांडग्यांचा कळप अथवा रानडुकर माणसावर प्रतिहल्ला करण्यासही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे शेतकरी हा धोका पत्करु शकत नाहीत.विद्युत करंटचा प्रयोगअनेक वेळा शेतकरी रानडुकरांच्यापासून पिकांचे संरक्ष करण्यासाठी विद्युत करंट देण्याचा प्रयोग केला जातो. शेतीच्या चौफेर तारांचे कुंपन तयार करून त्याला विद्युत करंट देण्यात येतो. त्यामुळे रानडुक्कर करंट लागल्यास सहजासहजी पिकात शिरकाव करू शकत नाही. मात्र संबंधित शेतकरी अथवा शेजारी किंवा अन्य कुणी त्या शेतामध्ये गेल्यास आणि याचा अंदाज न आल्यास मोठी जिवितहानी होऊ शकते. त्यामुळे तो प्रयोगही अंगलट येण्याची शक्यताच जास्त असते.