शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

By admin | Updated: November 23, 2015 00:25 IST

‘जलसंवर्धना’ने नांदलमध्ये जलक्रांती : विहिरींची पाणीपातळी वाढली

फलटण : येथील औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स मेगासाईट प्रकल्पाने सामाजिक बांधिलकीतून परिसरातील गावांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविलेल्या जलसंवर्धन प्रकल्पाचे हळूहळू सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, नांदल व मुळीकवाडीच्या माळावर डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या आहेत. या परिसरात बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.फलटण औद्योगिक वसाहतीत कमिन्स मेगासाईटचे काम सुरू झाल्यापासून विविध सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून परिसरातील गावात जाणवत असलेल्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. त्यात सिमेंट बंधारा बांधणे, उपलब्ध पाणीसाठ्यातील गाळ काढणे, ठिबक सिंचनपद्धती राबविणे व महत्त्वाचा भाग म्हणून जलसंवर्धनाविषयी लोकशिक्षण व जनजागृती करणे आदी बाबी आग्रहपूर्वक केल्यामुळे सद्य:स्थितीत टाकुबाईचीवाडी, नांदल, मुळीकवाडी, ढवळेवाडी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.गेल्या पाच दशकांपासून नांदल गावाने पाण्याची कमतरता अनुभवली. मात्र, २०१२ पासून ‘कमिन्स’ने राबविलेल्या जलसंवर्धनाच्या प्रकल्पातून भूजल पातळी वाढली आहे. परिणामी शेती व पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाल्याचे गावचे माजी सरपंच अनिल कोळेकर यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर सध्या आम्ही उपलब्ध पाण्यावर कांदा, सोयाबीन, बाजरीची पिके चांगल्या प्रमाणात घेत आहोत. परिणामी लोणंद बाजारपेठेत कांदा विक्रीला पाठविणाऱ्या गावात आमच्या गावाचीही गणना होऊ लागली आहे. त्यांनी स्पष्ट केले. ‘कमिन्स’नजीक मुळीकवाडी गावात जलसंवर्धनाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे समृद्धी आली आहे.पूर्वी जेमतेम पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी टिकत होते ते आता वर्षभर टिकून राहिल्याने शेतीचे उत्पादन चांगलेच वाढले असल्याचे तेथील शेतकरी दत्ता बांदलकर यांनी सांगितले. तालुक्याच्या दक्षिण भागातील टाकुबाईचीवाडी गावाला उन्हाळ्यात नेहमी पाण्याची कमतरता भासत होती. ‘कमिन्स’ने परिसरातील दोन तलावांतील गाळ काढल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडवले गेल्यामुळे टाकुबाईचीवाडी गावच्या परिसरातील विहिरी हाताने पाणी काढण्याइतक्या काठोकाठ भरल्या असल्याचे चित्र आहे. किंबहुना या गावातील शेतकऱ्यांकडे सध्या शेतीची औजारे मोकळेपणाने खरेदी करण्याची क्षमता आली आहे. (प्रतिनिधी)तब्बल ९६०५ तास समाजोपयोगी खर्च‘कमिन्स’मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेतील ९६०५ तास आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध प्रकारच्या समाजोपयोगी कामासाठी खर्च केल्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले.