शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

मुळीकवाडीच्या माळावर फुलल्या डाळिंब बागा

By admin | Updated: November 23, 2015 00:25 IST

‘जलसंवर्धना’ने नांदलमध्ये जलक्रांती : विहिरींची पाणीपातळी वाढली

फलटण : येथील औद्योगिक वसाहतीमधील कमिन्स मेगासाईट प्रकल्पाने सामाजिक बांधिलकीतून परिसरातील गावांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविलेल्या जलसंवर्धन प्रकल्पाचे हळूहळू सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, नांदल व मुळीकवाडीच्या माळावर डाळिंबाच्या बागा फुलू लागल्या आहेत. या परिसरात बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.फलटण औद्योगिक वसाहतीत कमिन्स मेगासाईटचे काम सुरू झाल्यापासून विविध सामाजिक उपक्रमांचा एक भाग म्हणून परिसरातील गावात जाणवत असलेल्या पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले. त्यात सिमेंट बंधारा बांधणे, उपलब्ध पाणीसाठ्यातील गाळ काढणे, ठिबक सिंचनपद्धती राबविणे व महत्त्वाचा भाग म्हणून जलसंवर्धनाविषयी लोकशिक्षण व जनजागृती करणे आदी बाबी आग्रहपूर्वक केल्यामुळे सद्य:स्थितीत टाकुबाईचीवाडी, नांदल, मुळीकवाडी, ढवळेवाडी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढल्याचे दृष्य परिणाम दिसू लागले आहेत.गेल्या पाच दशकांपासून नांदल गावाने पाण्याची कमतरता अनुभवली. मात्र, २०१२ पासून ‘कमिन्स’ने राबविलेल्या जलसंवर्धनाच्या प्रकल्पातून भूजल पातळी वाढली आहे. परिणामी शेती व पिण्यासाठी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाल्याचे गावचे माजी सरपंच अनिल कोळेकर यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर सध्या आम्ही उपलब्ध पाण्यावर कांदा, सोयाबीन, बाजरीची पिके चांगल्या प्रमाणात घेत आहोत. परिणामी लोणंद बाजारपेठेत कांदा विक्रीला पाठविणाऱ्या गावात आमच्या गावाचीही गणना होऊ लागली आहे. त्यांनी स्पष्ट केले. ‘कमिन्स’नजीक मुळीकवाडी गावात जलसंवर्धनाबाबत केलेल्या जनजागृतीमुळे समृद्धी आली आहे.पूर्वी जेमतेम पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी टिकत होते ते आता वर्षभर टिकून राहिल्याने शेतीचे उत्पादन चांगलेच वाढले असल्याचे तेथील शेतकरी दत्ता बांदलकर यांनी सांगितले. तालुक्याच्या दक्षिण भागातील टाकुबाईचीवाडी गावाला उन्हाळ्यात नेहमी पाण्याची कमतरता भासत होती. ‘कमिन्स’ने परिसरातील दोन तलावांतील गाळ काढल्याने पडलेल्या पावसाचे पाणी अडवले गेल्यामुळे टाकुबाईचीवाडी गावच्या परिसरातील विहिरी हाताने पाणी काढण्याइतक्या काठोकाठ भरल्या असल्याचे चित्र आहे. किंबहुना या गावातील शेतकऱ्यांकडे सध्या शेतीची औजारे मोकळेपणाने खरेदी करण्याची क्षमता आली आहे. (प्रतिनिधी)तब्बल ९६०५ तास समाजोपयोगी खर्च‘कमिन्स’मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेतील ९६०५ तास आतापर्यंत अशा प्रकारच्या कार्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध प्रकारच्या समाजोपयोगी कामासाठी खर्च केल्याचे संबंधित यंत्रणेने सांगितले.