शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

बारामतीकरांसाठी फलटणचे कालवे अपूर्ण

By admin | Updated: February 9, 2017 23:58 IST

जयकुमार गोरेंचा रामराजेंवर घणाघात : गिरवीत प्रचारास प्रारंभ; दूध संघ, कारखाना, बॅँक देशोधडीला लावली

फलटण : ‘लाल दिव्याची गाडी टिकवून ठेवण्यासाठीच सातारा जिल्ह्याच्या हक्काचे पाणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे पुणे आणि सांगली जिल्ह्याला देत असून, बारामतीकरांसाठीच त्यांनी नीरा-देवघरच्या कालव्याची कामे केलेली नाहीत. गेल्या २५ वर्षांत त्यांच्या सत्तेच्या काळात तालुक्यातील दूध संघ, कारखाना, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बॅँक देशोधडीला लागले असून, त्यांना मते मागण्याचा आता अधिकारच राहिलेला नाही,’ असा घणाघात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. गिरवी, ता. फलटण येथे गिरवी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रीय कॉँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, गिरवी गणातील उमेदवार जयश्री आगवणे यांच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी आयोजित जाहीर सभेत आमदार गोरे बोलत होते. यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अशोकराव जाधव, तुकाराम शिंदे, प्रकाश निकाळजे आदी उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, ‘एकीकडे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोणतीही सत्ता नसताना स्वराज दूध संघ उभा केला. साखर कारखाना काढला, एमआयडीसीला मंजुरी मिळविली तर दुसरीकडे २५ वर्षे अमर्याद सत्ता, मंत्रिपदे, विधान परिषदेचे सभापतिपद एवढे सगळे असतानाही तालुका पाणी प्रश्नासाठी, रस्त्यासाठी झगडतोय, ही दुर्दैवी गोष्ट आहे. २५ वर्षे मंत्रिपदाच्या काळात रामराजेंना भरपूर काही करता आले असते. मात्र, स्वत:चा लाल दिवा व खुर्ची टिकविण्यासाठी ते बारामतीकरांच्या मर्जीप्रमाणे वागू लागले आहेत. मी माण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न फक्त सात वर्षांत सोडवत आणला असतानाही २५ वर्षांची सत्ता भोगणारे रामराजे नीरा-देवघर व धोम-बलकवडीच्या कालव्यांची कामे करू शकत नाहीत, शेतीला पाणी देऊ शकत नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे.’ आमदार गोरे म्हणाले, ‘ऐन उन्हाळ्यात येथील कॅनॉल बारामतीकरांची मर्जी सांभाळण्यासाठी बंद ठेवला. बारामतीला पाणी सोडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नीरा-देवघरच्या कालव्याचे काम पूर्ण झाले तर बारामतीकरांना पाणी देता येणार नाही म्हणून त्यांनी कालव्याचे काम केले नाही.फलटण विकासाच्या बाबतीत का मागे पडला याचे आत्मचिंतन जनतेने करावे. कोणतीही सत्ता नसताना जनतेच्या प्रश्नासाठी झगडणारे रणजितसिंह नाईक-निंबाळकर कोठे व रामराजे कोठे याचा जरूर विचार करावा. तालुक्यातील सहकार उद्ध्वस्त करणाऱ्या राष्ट्रवादी व त्यांच्या नेतेमंडळींना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ,’ असेही गोरे म्हणाले. (प्रतिनिधी) रामराजेंनी आठवे आश्चर्य पाहावे...‘मला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कालावधीत शेवटच्या दहा दिवसांत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाले. या दहा दिवसांत मी नीरा-देवघरच्या कालव्यासाठी १४२ कोटी रुपये मंजूर केले. धोम-बलकवडीच्या कामांना गती दिली. मी दहा दिवसांत एवढा निधी आणू शकलो तर २५ वर्षांत सत्तेवर असूनही रामराजेंना का निधी आणता आला नाही. का कामे पूर्ण करता आली नाहीत, याचे जरूर उत्तर त्यांनी द्यावे. आम्ही उभारलेला कारखाना आठवे आश्चर्य म्हणणाऱ्या रामराजेंनी आता कारखाना कसा चालवून दाखविला व आठवे आश्चर्य कसे करून दाखविले हे पाहावयास जरूर यावे. जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या व घराण्यासाठी सत्ता राबविणाऱ्या राष्ट्रवादीला घरी बसविण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.