शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Lok Sabha Election 2019 सातारा जिल्ह्यातील जनता दहा वर्षांपासून दहशतीखाली: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:09 PM

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे ...

पाल : ‘जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून दहशतीखाली आहे. यामुळे येथे विकास झाला नसतानाही जनता अन्याय सहन करत आहे. यापुढे येथील जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझी राहील,’ असे आवाहनसातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केले.पाल येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कºहाड उत्तर भाजपा नेते मनोज घोरपडे, माजी सभापती हिंदुराव चव्हाण, कºहाड उत्तरचे कार्याध्यक्ष महेश जाधव, बाजार समितीचे संचालक रामकृष्ण वेताळ उपस्थित होते.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये विकासकामे व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही. याला कारणीभूत फक्त विद्यमान खासदार आहेत. कोल्हापूरला मंत्री चंद्रकांत पाटील टोलमुक्त करत असतील तर साताऱ्याच्या खासदारांनी सातारकरांसाठी टोलमुक्त का नाही केले? जिल्ह्यामध्ये मोठी धरणे असूनही जिल्ह्यातील दुष्काळ त्यांना का हटविता आला नाही. जिल्ह्यात तरुणांची संख्या मोठी आहे. नव्या पिढीला कॉलर उलटी करण्याचा आदर्श देण्यापेक्षा चांगला आर्दश द्या.’चरेगावकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील बंद पडलेल्या योजना विधानसभेच्या पूर्वीच सुरू केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.’पावसकर म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. अद्याप ती पूर्ण झाली नाहीत व ती करण्याचाही प्रयत्न कुणी केला नाही. त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे.’नरेंद्र पाटील यांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पाली या गावामध्ये नरेंद्र पाटील यांची रॅली काढण्यात आली. रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, विश्वासराव काळभोर, कºहाड उत्तरचे भाजपाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, माजी सरपंच सयाजी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पंचायत समितीचे सदस्य संजय घोरपडे, अ‍ॅड. विशाल शेजवळ, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम गायकवाड, तालुकाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, सुनील पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, विश्वासराव काळभोर, संतोष पाटील, सयाजीराव पाटील-कोर्टी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक