शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खटावमधील जनता कर्फ्यू आणखी कडक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:36 IST

खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची ...

खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची वाढती संख्या खटावकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत तसेच दक्षता समितीने जनता कर्फ्यू कडक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे नियम पाळत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, अशोक कुदळे, दीपक घाडगे, असलम पठाण, आयुब मुल्ला, दीपक विधाते, केशव धुमाळ, मुसा काझी उपस्थित होते.

खटाव येथे काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे. विनाकारण मेडिकल किंवा दूध आणण्याचे कारण सांगत रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने प्रत्येक चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या १५ दिवसांपासून खटाव व परिसरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सहा दिवस बंद कडक ठेवण्याचा व नागरिकांना पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कॅप्शन नम्रता भोसले यांनी मेल केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी खटावमध्ये दक्षता कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये कडक निर्बंध पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया : नम्रता भोसले)