शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खटावमधील जनता कर्फ्यू आणखी कडक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:36 IST

खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची ...

खटाव : शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने तसेच वाढती रुग्ण संख्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची वाढती संख्या खटावकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत तसेच दक्षता समितीने जनता कर्फ्यू कडक पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे नियम पाळत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, ग्रामविकास अधिकारी विकास चव्हाण, अशोक कुदळे, दीपक घाडगे, असलम पठाण, आयुब मुल्ला, दीपक विधाते, केशव धुमाळ, मुसा काझी उपस्थित होते.

खटाव येथे काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत्या प्रमाणावर दिसून येत आहे. विनाकारण मेडिकल किंवा दूध आणण्याचे कारण सांगत रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. ग्रामपंचायत सदस्य यांच्यावतीने प्रत्येक चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर करडी नजर तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय दक्षता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

गेल्या १५ दिवसांपासून खटाव व परिसरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रादुर्भावाला गांभीर्याने घेण्यासाठी राज्य शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून सहा दिवस बंद कडक ठेवण्याचा व नागरिकांना पाळण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कॅप्शन नम्रता भोसले यांनी मेल केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी खटावमध्ये दक्षता कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये कडक निर्बंध पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. (छाया : नम्रता भोसले)