शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महामार्गावर विनाहेल्मेटवाल्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:12 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. तरीही अनेकजण विनाहेल्मेट वाहने चालवितात. त्यामुळे जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी ...

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग वाढला आहे. तरीही अनेकजण विनाहेल्मेट वाहने चालवितात. त्यामुळे जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली. (छाया : जावेद खान)

००००००

विजेच्या वापरात वाढ

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने उकाडा जाणवायला लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात विजेचा वापर वाढला आहे. घर, कार्यालयात पंखे, वातानुकूलित यंत्रणा रात्रंदिवस सुरू राहते. त्यामुळे वीज बिल वाढवून मिळण्याची शक्यता आहे.

००

शहरातील बागा बंदच

सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने शहरातील बागा, उद्याने पुन्हा बंद करण्यात आले आहेत. बागेत लहान मुलं खेळण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बागा पुन्हा बंद कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

००००००

एसटीची स्वच्छता

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण राहू नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीची नियमित स्वच्छता केली जाते. तसेच निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला जात आहे. संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. प्रवाशांनीही काळजी घेण्याची गरज आहे.

०००००००००

पाण्याला गळती

सातारा : साताऱ्यातील खालच्या रस्त्यावरील शेटे चौक परिसरात भूअंतर्गत अंथरलेल्या जलवाहिनीला शुक्रवारी रात्री गळती लागली होती. त्यामुळे पाणी बाहेर पडून वाहत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात होते. या ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.

०००००००००

गतिरोधक हटविला

सातारा : साताऱ्यातील शेटेचौकात सुसाट गाड्यांना आवर घालण्यासाठी गतिरोधक स्थानिकांनी बनविला होता. तो धोकादायक होता. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते. तो हटविण्याची मागणी होत होती. एका रात्री तो गतिरोधक हटविण्यात आला आहे.

००००००

महादरे तलावातील पाणी पातळी घटली

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागातील व्यंकटपुरा, चिमणपुरा, मंगळवार पेठेतील काही भागात महादरे तलावातून दुपारी पाणीपुरवठा केला जातो. या तलावात सध्या उन्हामुळे पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याचा नागरिकांनी जपून वापर केल्यास तसेच आठवड्यातून किमान दोन दिवस कपात करण्याची गरज आहे.

०००००००००

लसीकरणासाठी गर्दी

सातारा : कोरोनाचा शिरकाव होत असल्याने शासनातर्फे लस उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक पैसे खर्च करून लस घेण्याच्या मानसिकतेत असल्याने खासगी दवाखान्यात जाऊन चौकशी करतात.

०००००

जाळीवरून कचरा

सातारा : सातारा शहरातून ठिकठिकाणाहून ओढे वाहत आहेत. त्याच्या कडेलाच सदनिका आहेत. त्यामुळे अनेकजण कचरा ओढ्यात टाकत असतात. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. ओढे तुंबल्याने दुर्गंधी पसरते. पालिकेने संरक्षक जाळी बसविली आहे. मात्र त्यावरून कचरा टाकला जातो.

००००००

ओला-सुका एकत्र

सातारा : साताऱ्यातील गल्ली बोळातून घंटागाडीतून कचरा गोळा केला जातो. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा आणण्याबाबत पालिकेकडून वारंवार आवाहन केले जाते. मात्र तरीही असंख्य सातारकर प्लॅस्टिक पिशव्यांसह ओला कचरा टाकत असतात. त्यामुळे कचऱ्याचे विघटन करणे अवघड जात आहे.

००००००

धास्ती कायम

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती वाढत आहे. याबाबत नागरिकांनी आता तरी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून खबरदारी घेण्याची गरज आहे.

००००

रुग्णवाहिकेला न जागा

सातारा : सातारा शहरातून गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाहिकांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. मात्र सातारा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अनेक दुचाकीस्वार रुग्णवाहिकेला जागा देत नाहीत. त्यामुळे मार्ग काढताना अडचण भासत आहे.