शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

अखेर रामराजेंचा शब्द खरा : १२१ किलोमीटर अंतर पार करून प्रकल्प यशस्वी

वाठार-निंबाळकर : धोम-बलकवडी धरणाचे पाणी अखेर फलटण तालुक्यातील गिरवी या गावी पोहोचले. तब्बल २० वर्षांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे पाणी तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या बागेला देणार असल्याचा शब्द दिला होता. तो अखेर खरा-खुरा ठरला. फलटण तालुक्यातील १२८ गावांपैकी ३६ गावे नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत. ती वगळता उर्वरित गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जात. त्या गावांच्या शेतीपाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात फार परिश्रम घेतले होते; मात्र त्यांना यश आले नव्हते.१९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याच पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून आपण चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला पाणी देणार, असे प्रचारात वेळोवेळी अश्वासन दिले होते.१९९५ मध्ये युती शासनाला अपक्ष आमदारांची गरज सत्तेसाठी होती. ही गरज ओळखून रामराजेंनी अपक्ष आमदार एकत्रित करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. धोम-बलकवडी व नीरा-देवघर ही दोन धरणे बांधून घेतली. पुढे सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी अथक परिश्रम घेऊन धोम-बलकवडी धरणाचे काम पूर्ण करून व प्रत्यक्ष कालव्याचे काम सुरू करून धोम-बलकवडीचे पाणी ठिकठिकाणी बोगदे पाडून फलटण तालुक्यात आणले.फलटण तालुक्यात पाणी आल्यानंतर आदर्की येथे दिवंगत चिमणराव कदम व शंकरराव जगताप तसेच माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होेते. वेगवेगळ्या अडचणींमुळे गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी वेळ लागत होता. तरीही रामराजेंना चिमणराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये गिरवी गावात पाणी पूजन घ्यायचे होते. सध्या गिरवी गावात ‘गुरवदरा’ नावाच्या तलावात पाणी सोडले आहे; मात्र, गावात आलेले पाणी पाहण्यासाठी चिमणराव कदम हवे होते. कारण या पाण्यासाठी त्यांनी ही अथक प्रयत्न केले होते, अशी हळहळ आज गिरवीकर ग्रामस्थांनी व्यक्त केली. (वार्ताहर)शेतकऱ्यांमध्ये आनंद गिरवी गावात १२१ किलोमीटर अंतरावर धरणापासून पाणी येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये पाणी गिरवीत पोहोचले होते. सध्या फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, गिरवी ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. यात धोम-बलकवडीचे पाणी गिरवी गावात पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र जुनी जाणते मंडळी आपापसात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात १९९५ मध्ये आमदारकी लढविताना तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून स्वर्गीय ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंब बागेला पाणी दिले,’ अशी आदराची भावना व्यक्त केली.