शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

अखेर रामराजेंचा शब्द खरा : १२१ किलोमीटर अंतर पार करून प्रकल्प यशस्वी

वाठार-निंबाळकर : धोम-बलकवडी धरणाचे पाणी अखेर फलटण तालुक्यातील गिरवी या गावी पोहोचले. तब्बल २० वर्षांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे पाणी तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या बागेला देणार असल्याचा शब्द दिला होता. तो अखेर खरा-खुरा ठरला. फलटण तालुक्यातील १२८ गावांपैकी ३६ गावे नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत. ती वगळता उर्वरित गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जात. त्या गावांच्या शेतीपाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात फार परिश्रम घेतले होते; मात्र त्यांना यश आले नव्हते.१९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याच पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून आपण चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला पाणी देणार, असे प्रचारात वेळोवेळी अश्वासन दिले होते.१९९५ मध्ये युती शासनाला अपक्ष आमदारांची गरज सत्तेसाठी होती. ही गरज ओळखून रामराजेंनी अपक्ष आमदार एकत्रित करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. धोम-बलकवडी व नीरा-देवघर ही दोन धरणे बांधून घेतली. पुढे सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी अथक परिश्रम घेऊन धोम-बलकवडी धरणाचे काम पूर्ण करून व प्रत्यक्ष कालव्याचे काम सुरू करून धोम-बलकवडीचे पाणी ठिकठिकाणी बोगदे पाडून फलटण तालुक्यात आणले.फलटण तालुक्यात पाणी आल्यानंतर आदर्की येथे दिवंगत चिमणराव कदम व शंकरराव जगताप तसेच माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होेते. वेगवेगळ्या अडचणींमुळे गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी वेळ लागत होता. तरीही रामराजेंना चिमणराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये गिरवी गावात पाणी पूजन घ्यायचे होते. सध्या गिरवी गावात ‘गुरवदरा’ नावाच्या तलावात पाणी सोडले आहे; मात्र, गावात आलेले पाणी पाहण्यासाठी चिमणराव कदम हवे होते. कारण या पाण्यासाठी त्यांनी ही अथक प्रयत्न केले होते, अशी हळहळ आज गिरवीकर ग्रामस्थांनी व्यक्त केली. (वार्ताहर)शेतकऱ्यांमध्ये आनंद गिरवी गावात १२१ किलोमीटर अंतरावर धरणापासून पाणी येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये पाणी गिरवीत पोहोचले होते. सध्या फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, गिरवी ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. यात धोम-बलकवडीचे पाणी गिरवी गावात पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र जुनी जाणते मंडळी आपापसात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात १९९५ मध्ये आमदारकी लढविताना तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून स्वर्गीय ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंब बागेला पाणी दिले,’ अशी आदराची भावना व्यक्त केली.