शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

By admin | Updated: September 13, 2015 22:14 IST

अखेर रामराजेंचा शब्द खरा : १२१ किलोमीटर अंतर पार करून प्रकल्प यशस्वी

वाठार-निंबाळकर : धोम-बलकवडी धरणाचे पाणी अखेर फलटण तालुक्यातील गिरवी या गावी पोहोचले. तब्बल २० वर्षांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे पाणी तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या बागेला देणार असल्याचा शब्द दिला होता. तो अखेर खरा-खुरा ठरला. फलटण तालुक्यातील १२८ गावांपैकी ३६ गावे नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत. ती वगळता उर्वरित गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जात. त्या गावांच्या शेतीपाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात फार परिश्रम घेतले होते; मात्र त्यांना यश आले नव्हते.१९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याच पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून आपण चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला पाणी देणार, असे प्रचारात वेळोवेळी अश्वासन दिले होते.१९९५ मध्ये युती शासनाला अपक्ष आमदारांची गरज सत्तेसाठी होती. ही गरज ओळखून रामराजेंनी अपक्ष आमदार एकत्रित करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. धोम-बलकवडी व नीरा-देवघर ही दोन धरणे बांधून घेतली. पुढे सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी अथक परिश्रम घेऊन धोम-बलकवडी धरणाचे काम पूर्ण करून व प्रत्यक्ष कालव्याचे काम सुरू करून धोम-बलकवडीचे पाणी ठिकठिकाणी बोगदे पाडून फलटण तालुक्यात आणले.फलटण तालुक्यात पाणी आल्यानंतर आदर्की येथे दिवंगत चिमणराव कदम व शंकरराव जगताप तसेच माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होेते. वेगवेगळ्या अडचणींमुळे गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी वेळ लागत होता. तरीही रामराजेंना चिमणराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये गिरवी गावात पाणी पूजन घ्यायचे होते. सध्या गिरवी गावात ‘गुरवदरा’ नावाच्या तलावात पाणी सोडले आहे; मात्र, गावात आलेले पाणी पाहण्यासाठी चिमणराव कदम हवे होते. कारण या पाण्यासाठी त्यांनी ही अथक प्रयत्न केले होते, अशी हळहळ आज गिरवीकर ग्रामस्थांनी व्यक्त केली. (वार्ताहर)शेतकऱ्यांमध्ये आनंद गिरवी गावात १२१ किलोमीटर अंतरावर धरणापासून पाणी येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये पाणी गिरवीत पोहोचले होते. सध्या फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, गिरवी ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. यात धोम-बलकवडीचे पाणी गिरवी गावात पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र जुनी जाणते मंडळी आपापसात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात १९९५ मध्ये आमदारकी लढविताना तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून स्वर्गीय ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंब बागेला पाणी दिले,’ अशी आदराची भावना व्यक्त केली.