शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खटावच्या पूर्व भागातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:10 IST

स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके विकासापासून वंचित असलेल्या खटाव तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांकडे प्रशासन व राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माणिक महाराजा पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. खटावपर्यंत पदयात्रा काढली.

ठळक मुद्देमाणिक महाराजांचा उपक्रम कानकात्रे तरसवाडीपर्यंतचा २५ किलोमीटरचा पायी प्रवास

मायणी : स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके विकासापासून वंचित असलेल्या खटाव तालुक्यातील पूर्व भागातील विविध समस्यांकडे प्रशासन व राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी माणिक महाराजा पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. खटावपर्यंत पदयात्रा काढली.

देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्षांचा काळ लोटला तरी जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाºयांकडून विखळे, पाचवड, मुळीकवाडी, कलेढोण, ढोकळवाडी, औतरवाडी, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व मायणी पूर्व भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला नाही. वर्षातील सहा ते आठ महिने या भागांतील ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागते. तसेच हंडाभर पाण्यासाठी दोन-चार किलोमीटर पायपीट करावी लागते.

निवडणुकीच्या काळात प्रत्येक राज्यकर्त्यांकडून फक्त पाणी प्रश्नाचे गाजर दाखविले जात आहे. पाण्याव्यतिरिक्त इतर प्रश्नांकडे कानाडोळा केला जात आहे. आज या भागात एक किलोमीटरही अंतरात खड्डा नाही असा रस्ता नाही.

औद्योगिक क्षेत्र नाही. पावसाच्या जीवावर शेती केली जाते. उद्योगासाठी व कुटुंब चालविण्यासाठी तसेच रोजगारासाठी शेकडो किलोमीटर दूरवर जाऊन नोकरीच्या शोधात येथील तरुण भटकत आहे. मात्र, शासन व राज्यकर्ते या गोष्टींकडे कायम कानाडोळा करीत आले आहेत.

या भागातील विविध समस्यांकडे शासन व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी माणिक महाराज पाचवडकर यांनी मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावरील मौजे कानकात्रे येथून तरसवाडी, ता. खटावपर्यंत पदयात्रा काढली. या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरामध्ये कोणत्याही शासकीय किंवा कार्यकर्त्यांनी त्यांना भेट दिली नाही.

विखळे तालुका येथील काही कार्यकर्त्यांनी विखळे चौकांमध्ये त्यांचे स्वागत केले तर मायणी पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी यांनी भेट देऊन सुरक्षिततेचे नियोजन केले.