शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
5
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
6
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
7
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
8
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
9
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
10
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
11
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
12
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
13
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
14
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
15
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
16
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
17
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
18
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
19
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
20
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...

भय्यू महाराज यांचे आदर्श विचार जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:54 IST

राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.

ठळक मुद्देमाने-कदम : संगममाहुली येथे अस्थीकलशाचे विसर्जन

सातारा : ‘राष्ट्रसंत भय्यू महाराज हे धार्मिक, आध्यात्मिक गुरू होतेच याशिवाय सकल जणांचे ते चांगले मित्र व हितचिंतकही होते. त्यांच्या अशाप्रकारे आकस्मिक जाण्याने कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मात्र ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे महान सामाजिक कार्य, आदर्श विचार आपल्यात कायमच राहतील. त्यांचे विचार व सामाजिक कार्य अधिक गतीने पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या चित्रलेखा माने-कदम यांनी केले.

भय्यू महाराज यांच्या अस्थीकलशाचे सातारा येथील संगम माहुली येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. चंद्र्रशेखर घोरपडे, रणजित देशमुख, बाबूराव शिंदे, संतोष जाधव, गणेशचंद्र पिसाळ, रविराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘भय्यू महाराज हे विचारांचे व्यासपीठ होते. त्यांच्या विचारांनी आज देशभरात आमच्यासारखे लाखो तरुण कार्यरत आहेत. त्यांचे विचार जोपासणे व वाढविणे हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे.’ बाबूराव शिंदे म्हणाले, ‘एकाच व्यक्तीच्या ठायी असे अनंत सद्गुण असणाऱ्या या राष्ट्रसंताला आज आपण मुकलो आहोत. त्यांची लोकांवर व लोकांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा ही अफाट आहे. त्यांच्या विचारांचे व आदर्शाचे कायमच जतन व्हावे.’यावेळी गणेशचंद्र पिसाळ, संतोष जाधव, सुशांत निंबाळकर, सुजित आंबेकर, रणधीर जाधव आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

असा सामाजिक संत होणे नाही..भय्यू महाराज यांचे सामाजिक कार्य अफाट आहे. अनेक पिढ्यांना आदर्शवत काम दाखविणाºया या व्यक्तिमत्त्वाचे असे आकस्मिक जाणे हे मनाला न पटणारे आहे. देशासाठी ही एक प्रचंड मोठी सामाजिक हानी ठरली आहे. असा सामाजिक संत यापुढे होणे नाही. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.- श्रीनिवास पाटील, राज्यपाल (सिक्कीम)