शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पाटणला अर्ध्या तालुक्यावर बिबट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:44 IST

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर्ध्या तालुक्यातील जनता बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.पाटण तालुक्यातील विविध भागांत ...

मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील अनेक विभागांत सतत बिबट्याचे दर्शन होत आहे. मात्र, वनविभाग याबाबत ठोस पावले उचलत नाही. अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. तर अनेक गावांतील मोकाट श्वान अचानक गायब झाली आहेत. त्यामुळे अर्ध्या तालुक्यातील जनता बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र आहे.पाटण तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजपर्यंत त्याने मानवावर हल्ला केला नाही. मात्र, मानवी वस्तीत येऊन तो मोकाट, पाळीव श्वान, शेळ्या, लहान रेडके यांच्यावर हल्ला करत असल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, मानवी वस्त्या बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे चित्र दिसत आहे. आजपर्यंत विविध कारणास्तव तालुक्यात झालेली बेसुमार वृक्षतोड, लोकसंख्या वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जंगलक्षेत्रात केलेले सपाटीकरण, नष्ट होत असलेली वनसंपदा यामुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली आहेत. याशिवाय जंगल परिसरात लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार खुलेआम केली जात असल्याने वनप्राण्याच्या खाद्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे खाद्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे शेतात काम करण्यास जाणारे शेतकरी, शेतमजूर, सकाळी व्यायाम करण्यास जाणारे ग्रामस्थ यांच्यात भीतीचे वातावरण आहे.वनविभागाने चाफळ भागात लावलेला पिंजºयाने पूर्ण पावसाळा सोसला. ठोस कार्यवाही न झाल्यामुळे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सुस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अर्धा तालुका बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे दिसते. दोन-तीन वर्षांपासून बिबट्या मानवी वस्तीजवळ लहान-मोठ्या पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत....या गावांत बिबट्याचा मुक्कामउरूल, विहे, मोरगिरी, चाफळ, मारूल हवेली, दिवशी बुद्रुक विभागात असे प्रकार सतत घडत आहेत. उरूल भागातील ठोमसे, उरूल घाट, विहे घाट येथे तर बिबट्या मुक्कामालाच आहे. उरूल घाटात पाटण-उंब्रज मार्गावर डोंगराच्या आसपास त्याचे दर्शन प्रवाशांसह ग्रामस्थांच्यासाठी नित्याचीच बाब झाली आहे. उरूल, मल्हारपेठ, विहे, मोरगिरी, मारूल हवेली भागातील वाडीवस्तीवरील लोक वस्तीत घुसून बिबट्याने घराजवळ असणाºया जनावरांच्या शेडवर हल्ला करून अनेक पाळीव जनावरांना ठार केले आहे.वन संरक्षण समित्या कागदावरतालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती लुप्त होऊ लागली असून, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. केवळ कागदावरच असणाºया वन संरक्षक समित्या, जंगल परिसरात मानवाचा वाढता हस्तक्षेप, छुपी वृक्षतोड, वन्यप्राण्यांची होणारी चोरटी शिकार, लोकसंख्या वाढीमुळे वनसंपदेवर आलेले संकट आदी कारणांमुळे तालुक्यातील वनवैभव व वन्य प्राण्यांची दहशत चर्चेत आहे. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.