शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

४७ हजार सातारकरांकडे पासपोर्ट : परदेशात जाण्यासाठी युवक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:59 IST

दत्ता यादव। सातारा : जगभरातील विविध देशांमध्ये सातारकरांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी आयटी क्षेत्रात करिअर करायचं असेल ...

ठळक मुद्देसातारा : चार तालुके अग्रेसर

दत्ता यादव।सातारा : जगभरातील विविध देशांमध्ये सातारकरांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी आयटी क्षेत्रात करिअर करायचं असेल तर परदेशात जायचं, असं युवकांचं ठरलेलं होतं; पण काळ बदलत गेला तसं असंख्य सातारकर हवापालट करण्यासाठी म्हणूनही परदेशवारी करू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत तब्बल ४७ हजार ८०७ सातारकरांनी पासपोर्ट काढले असून, यामध्ये शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या तरुणाईची संख्या सर्वाधिक आहे.

पूर्वी परदेशातून एखादी व्यक्ती आपल्या गावात आली की, अनेकांना फार नवल वाटायचं. त्यांच्याकडून परदेशातील रितीरिवाज, तेथील कायदे, आपल्या देशातील आणि त्यांच्या देशातील फरक, याची माहिती घेतली जायची. एवढेच नव्हे तर परदेशातून आलेल्या व्यक्तीला समाजामध्येही चांगले स्थान दिले जायचे. एकंदरीत त्या व्यक्तीबद्दल कुतूहल असायचे. मात्र, आता अशी परिस्थिती राहिली नाही. परदेश गमनासाठी आता अख्खी कुटुंबेही जाऊ लागली आहेत.

पूर्वी एखादी व्यक्ती परदेशात जायची. परंतु आता आपल्या शेजारी पाजारी अनेकजण परदेशात जाऊन फिरून आले आहेत. त्यामुळे परदेशात जाणे आता सोपे झाले आहे, हे पाहायला मिळत आहे. परंतु परदेशात जाण्यासाठी लागणारा पैसा महत्त्वाचा असतो. तो पैसा मिळवणारी लोक स्थिरस्थावर झाली असल्यामुळे लोकांच्या हातात पैसा आला. त्यामुळेच परदेशवारीचे स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

आयटी क्षेत्रात नोकरी करणाºया युवकांना पासपोर्ट सक्तीचे केल्यामुळे वर्षाकाठी ही संख्या आणखीनच वाढत आहे. त्याचबरोबर व्यापारी, डॉक्टर या वर्गातील लोकांच्याही परदेश वाºया होऊ लागल्या असून, सातारा जिल्ह्यातील बागायतदार शेतकºयांमधूनही पासपोर्ट काढण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. पूर्वी काहीजण केवळ नोकरीनिमित्त पासपोर्ट काढत होते; परंतु आता लगेच परदेशात जाता आले नाही तरी भविष्यात कधी प्लॅनिंग होईल, त्यावेळी जाऊ, असे ठरवून अनेकजण कुटुंबातील सर्वच व्यक्तींचा पासपोर्ट काढून ठेवत असल्याचे व्हेरीफिकेशन करणाºया अधिकाºयांनी सांगितले. अलीकडे पासपोर्ट काढणाºयांची संख्या वाढत असून, गेल्या तीन वर्षांमध्ये तब्बल ४७ हजार ८०७ सातारकरांनी पासपोर्ट काढून परदेश गमनाचा मार्ग खुला केला आहे.आख्खं कुटुंब काढतंय पासपोर्ट..कºहाड, सातारा, फलटण आणि वाई हे चार तालुके पासपोर्ट काढण्यासाठी आघाडीवर आहेत.महिन्याकाठी तीन ते चार हजार व्यक्तींचे पासपोर्टसाठी अर्ज येतात.संपूर्ण कुटुंब पासपोर्टसाठी आग्रहीपडताळणीनंतर एका महिन्यात मिळतोय पासपोर्ट.

 

व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आम्ही पासपोर्टची सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयात पाठवितो. त्यानंतर तीस दिवसांच्या आत संंबंधित व्यक्तीला पासपोर्ट मिळते. पासपोर्टसाठी अर्ज अलीकडच्या काळात वाढले आहे.- ज्योतिराम गुंजवटे पोलीस निरीक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरpassportपासपोर्ट