शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय"; कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरुन CM फडणवीस भडकले
2
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
3
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
4
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
6
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
7
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
8
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
9
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
10
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
11
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
12
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
13
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ
14
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
15
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
16
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
17
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
18
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
19
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
20
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!

रस्त्यावरीलच गावांना पालकमंत्र्यांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:14 IST

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय ...

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही रविवारी नुकसानग्रस्त भागाचा अर्धवट पाहणी दौरा केला. रस्त्यावरच्या २-३ गावांनाच भेटी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. हा दौरा गांभीर्यपूर्वक झालाच नाही, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या फळबागा, पिके व अन्य नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकरी व सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज आणि फलटण शहरात बाणगंगा नदीपात्राची तसेच खचलेल्या पुलाची पाहणी केली.फलटण तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब व अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, सोयाबीन, मका ही पिकेही वाया गेलीत. त्याचबरोबर उसाच्या नवीन लागणी पूर्णपणे वाया गेल्या आहेत. तर उभ्या उसाचेही सतत पाणी राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करून मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्यामार्फत सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवतारे यांनी फलटण प्रशासनाला स्पष्ट शब्दात केल्या आहेत.फलटण तालुक्यात शेती, पिके तसेच रस्ते, साकव, तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी, पाईपलाईन वाहून गेल्या आहेत. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही शिवतारे यांनी दिले आहेत. तसेच फळबागांशिवाय कांदा, सोयाबीन, मका व बाजरी पिकाचे मोठं नुकसान झालंय. मक्याचे ४-५ एकरांचे मोठे प्लॉट अक्षरश: उद्ध्वस्त झालेत. त्याचा चारा म्हणूनही उपयोग होणार नाही. द्राक्षं व डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा निश्चित आकडा समजण्यास काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्या नुकसानीची नोंदही प्रशासनाने घ्यावी, असेही पालकमंत्री शिवतारे यांनी अधिकाºयांना सांगितले.दरम्यान, पालकमंत्री शिवतारेंनी बाणगंगा नदीवरील खचलेल्या शहरालगतच्या पुलाची व नदीपात्राची पाहणी केली. त्यानंतर पंचनाम्याची सूचना संंबंधित यंत्रणांना करण्यात आली. तसेच तरडगाव येथील सतीश झुंजार यांनी बाजरी व सोयाबीन पिकाबाबत झालेल्या नुकसानीची आणि कुटुंबावर ओढविलेल्या परिस्थितीची माहिती दिली. अशी परिस्थिती तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकºयांवर आली असल्याचे निदर्शनास आणून देत नुकसान भरपाईबरोबरच संपूर्ण कर्जमाफीची मागणीही केली.दौरा दिखाव्यापुरताचनिरगुडी, धुमाळवाडी, खडकी या भागातील द्राक्षं व डाळिंबासह अन्य फळबागांचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले. या भागातील सुमारे १०० एकरवरील क्षेत्रातील हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर आभाळच कोसळले आहे. तर पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा पूर्ण न करता केवळ रस्त्यावरील २-३ गावांनाच भेटी देऊन दौºयाचा देखावा करीत तहसील कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या. अशा संतप्त भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या.