शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरीलच गावांना पालकमंत्र्यांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:14 IST

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय ...

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही रविवारी नुकसानग्रस्त भागाचा अर्धवट पाहणी दौरा केला. रस्त्यावरच्या २-३ गावांनाच भेटी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. हा दौरा गांभीर्यपूर्वक झालाच नाही, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या फळबागा, पिके व अन्य नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकरी व सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज आणि फलटण शहरात बाणगंगा नदीपात्राची तसेच खचलेल्या पुलाची पाहणी केली.फलटण तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब व अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, सोयाबीन, मका ही पिकेही वाया गेलीत. त्याचबरोबर उसाच्या नवीन लागणी पूर्णपणे वाया गेल्या आहेत. तर उभ्या उसाचेही सतत पाणी राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करून मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्यामार्फत सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवतारे यांनी फलटण प्रशासनाला स्पष्ट शब्दात केल्या आहेत.फलटण तालुक्यात शेती, पिके तसेच रस्ते, साकव, तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी, पाईपलाईन वाहून गेल्या आहेत. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही शिवतारे यांनी दिले आहेत. तसेच फळबागांशिवाय कांदा, सोयाबीन, मका व बाजरी पिकाचे मोठं नुकसान झालंय. मक्याचे ४-५ एकरांचे मोठे प्लॉट अक्षरश: उद्ध्वस्त झालेत. त्याचा चारा म्हणूनही उपयोग होणार नाही. द्राक्षं व डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा निश्चित आकडा समजण्यास काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्या नुकसानीची नोंदही प्रशासनाने घ्यावी, असेही पालकमंत्री शिवतारे यांनी अधिकाºयांना सांगितले.दरम्यान, पालकमंत्री शिवतारेंनी बाणगंगा नदीवरील खचलेल्या शहरालगतच्या पुलाची व नदीपात्राची पाहणी केली. त्यानंतर पंचनाम्याची सूचना संंबंधित यंत्रणांना करण्यात आली. तसेच तरडगाव येथील सतीश झुंजार यांनी बाजरी व सोयाबीन पिकाबाबत झालेल्या नुकसानीची आणि कुटुंबावर ओढविलेल्या परिस्थितीची माहिती दिली. अशी परिस्थिती तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकºयांवर आली असल्याचे निदर्शनास आणून देत नुकसान भरपाईबरोबरच संपूर्ण कर्जमाफीची मागणीही केली.दौरा दिखाव्यापुरताचनिरगुडी, धुमाळवाडी, खडकी या भागातील द्राक्षं व डाळिंबासह अन्य फळबागांचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले. या भागातील सुमारे १०० एकरवरील क्षेत्रातील हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर आभाळच कोसळले आहे. तर पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा पूर्ण न करता केवळ रस्त्यावरील २-३ गावांनाच भेटी देऊन दौºयाचा देखावा करीत तहसील कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या. अशा संतप्त भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या.