शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रस्त्यावरीलच गावांना पालकमंत्र्यांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:14 IST

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय ...

फलटण : फलटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणा कागदी घोडे नाचवत असतानाच पालकमंत्री विजय शिवतारे यांनीही रविवारी नुकसानग्रस्त भागाचा अर्धवट पाहणी दौरा केला. रस्त्यावरच्या २-३ गावांनाच भेटी दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. हा दौरा गांभीर्यपूर्वक झालाच नाही, अशा प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या फळबागा, पिके व अन्य नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकरी व सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पालकमंत्र्यांना जिल्ह्याचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. त्यानुसार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तालुक्यातील कापडगाव, तरडगाव, काळज आणि फलटण शहरात बाणगंगा नदीपात्राची तसेच खचलेल्या पुलाची पाहणी केली.फलटण तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब व अन्य फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, सोयाबीन, मका ही पिकेही वाया गेलीत. त्याचबरोबर उसाच्या नवीन लागणी पूर्णपणे वाया गेल्या आहेत. तर उभ्या उसाचेही सतत पाणी राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे सोमवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करून मंगळवारी जिल्हाधिकाºयांच्यामार्फत सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शिवतारे यांनी फलटण प्रशासनाला स्पष्ट शब्दात केल्या आहेत.फलटण तालुक्यात शेती, पिके तसेच रस्ते, साकव, तलाव, पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी, पाईपलाईन वाहून गेल्या आहेत. याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही शिवतारे यांनी दिले आहेत. तसेच फळबागांशिवाय कांदा, सोयाबीन, मका व बाजरी पिकाचे मोठं नुकसान झालंय. मक्याचे ४-५ एकरांचे मोठे प्लॉट अक्षरश: उद्ध्वस्त झालेत. त्याचा चारा म्हणूनही उपयोग होणार नाही. द्राक्षं व डाळिंब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा निश्चित आकडा समजण्यास काही कालावधी लागणार आहे. मात्र, त्या नुकसानीची नोंदही प्रशासनाने घ्यावी, असेही पालकमंत्री शिवतारे यांनी अधिकाºयांना सांगितले.दरम्यान, पालकमंत्री शिवतारेंनी बाणगंगा नदीवरील खचलेल्या शहरालगतच्या पुलाची व नदीपात्राची पाहणी केली. त्यानंतर पंचनाम्याची सूचना संंबंधित यंत्रणांना करण्यात आली. तसेच तरडगाव येथील सतीश झुंजार यांनी बाजरी व सोयाबीन पिकाबाबत झालेल्या नुकसानीची आणि कुटुंबावर ओढविलेल्या परिस्थितीची माहिती दिली. अशी परिस्थिती तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकºयांवर आली असल्याचे निदर्शनास आणून देत नुकसान भरपाईबरोबरच संपूर्ण कर्जमाफीची मागणीही केली.दौरा दिखाव्यापुरताचनिरगुडी, धुमाळवाडी, खडकी या भागातील द्राक्षं व डाळिंबासह अन्य फळबागांचे व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले. या भागातील सुमारे १०० एकरवरील क्षेत्रातील हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांवर आभाळच कोसळले आहे. तर पालकमंत्र्यांनी नियोजित दौरा पूर्ण न करता केवळ रस्त्यावरील २-३ गावांनाच भेटी देऊन दौºयाचा देखावा करीत तहसील कार्यालयात बैठक घेतली व सूचना केल्या. अशा संतप्त भावना शेतकºयांनी व्यक्त केल्या.