शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

गावदेवाच्या पायापडणीला नवरी निघाली घोड्यावर-हौस पुरविण्याचा पालकांकडे अट्टाहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:31 IST

खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे.

ठळक मुद्देशहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही काही प्रथांना प्राधान्य

नम्रता भोसले।खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे. मुलींचे पालकच आता गावदेवाला मुलगी घोड्यावरून जाईल, या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत असल्यामुळे या हौसेला आता सीमाच राहिली नाही.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही काही प्रथांना प्राधान्याने महत्त्व दिले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा असो वा नवरी, ही गावदेवाला पाया पडणीसाठी जाण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीत बदल होताना दिसून येत आहेत. पूर्वी गावदेव म्हटलं की बँडच्या तालावर चालत वर किंवा वधू निघत असत आणि गावातील प्रत्येक देवाला लग्नाला येण्याचे निमंत्रण देऊन पाया पडून घरी येत असत. या चालत जाण्याच्या पद्धतीमध्ये कालांतराने बदल होत गेला. सुरुवातीला मुलगा गावदेवाला घोड्यावरून जात असे; परंतु यामध्ये अधिकच बदल होऊन सध्या या पद्धतीमध्ये मुलींचीच मागणी घोड्यावरून गावदेवाला जाण्याची वाढल्यामुळे आता सर्रास मुली घोड्यावरून पायापडणीला जाताना दिसून येत आहेत.या बदलत्या पद्धतीमुळे मात्र घोडेमालकांचेही आता दर वाढू लागले आहेत. तर लग्न तिथी मोजक्याच असल्याने प्रत्येकांनी आधीच घोडे बुक करून ठेवल्याचे पाहावयास मिळत आहे. नडलेल्या लोकांना मात्र याकरिता ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. तर बऱ्याच नवरी व नवºया मुलीला वेळआधीच गावदेवाची मिरवणूक काढावी लागत आहे. पारंपरिक पद्धतीने निघणाºया मिरवणुकांना आजही ग्रामीण भागात महत्त्व असल्याने लग्नाच्या निमित्ताने या पद्धती पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी शहरातून पै-पाहुणे तसेच मित्रमंडळ गावाकडे दाखल होत आहेत. या प्रथेमुळे बँडचालक व घोडे मालकांचा लग्न सराईत बक्कळ व्यवसाय होत आहे.लग्न सराईमुळे घोड्याला अधिक महत्त्व आले आहे. पायापडणी तसेच वरातीला घोडा लागत असल्यामुळे घोड्याला मागणी वाढत आहे. पायापडणीसाठी मुलींच्या पायापडणीसाठी वेगळा दर आहे. तर मुलांच्या पाया पडणीसाठी वेगळा दर आहे. ज्याप्रमाणे मुलाचे वजन असेल त्याप्रमाणे घोड्याचे दर सांगावे लागत आहेत. कारण ही गावदेव मिरवणूक कमीत कमी चार तास चालत असल्याने वजनदार व्यक्तीमुळे घोड्यालाही त्रास होऊ शकतो.-सोन्या जाधव, घोडा मालकग्रामीण भागात आता गावदेवासाठी मुलापेक्षा मुलींचीच घोड्यावरून जाण्यासाठी मागणी वाढली आहे.