शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गावदेवाच्या पायापडणीला नवरी निघाली घोड्यावर-हौस पुरविण्याचा पालकांकडे अट्टाहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:31 IST

खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे.

ठळक मुद्देशहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही काही प्रथांना प्राधान्य

नम्रता भोसले।खटाव : लग्न म्हटलं की हौसेला मोजमाप नाही. विशेषत: मुलींची हौस पुरवण्याचा पालकांचा अट्टाहास पाहता लग्न म्हणजे आजही आनंदाचा व उत्साहाचा सोहळाच बनला आहे. मुलींचे पालकच आता गावदेवाला मुलगी घोड्यावरून जाईल, या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत असल्यामुळे या हौसेला आता सीमाच राहिली नाही.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही काही प्रथांना प्राधान्याने महत्त्व दिले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा असो वा नवरी, ही गावदेवाला पाया पडणीसाठी जाण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीत बदल होताना दिसून येत आहेत. पूर्वी गावदेव म्हटलं की बँडच्या तालावर चालत वर किंवा वधू निघत असत आणि गावातील प्रत्येक देवाला लग्नाला येण्याचे निमंत्रण देऊन पाया पडून घरी येत असत. या चालत जाण्याच्या पद्धतीमध्ये कालांतराने बदल होत गेला. सुरुवातीला मुलगा गावदेवाला घोड्यावरून जात असे; परंतु यामध्ये अधिकच बदल होऊन सध्या या पद्धतीमध्ये मुलींचीच मागणी घोड्यावरून गावदेवाला जाण्याची वाढल्यामुळे आता सर्रास मुली घोड्यावरून पायापडणीला जाताना दिसून येत आहेत.या बदलत्या पद्धतीमुळे मात्र घोडेमालकांचेही आता दर वाढू लागले आहेत. तर लग्न तिथी मोजक्याच असल्याने प्रत्येकांनी आधीच घोडे बुक करून ठेवल्याचे पाहावयास मिळत आहे. नडलेल्या लोकांना मात्र याकरिता ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. तर बऱ्याच नवरी व नवºया मुलीला वेळआधीच गावदेवाची मिरवणूक काढावी लागत आहे. पारंपरिक पद्धतीने निघणाºया मिरवणुकांना आजही ग्रामीण भागात महत्त्व असल्याने लग्नाच्या निमित्ताने या पद्धती पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी शहरातून पै-पाहुणे तसेच मित्रमंडळ गावाकडे दाखल होत आहेत. या प्रथेमुळे बँडचालक व घोडे मालकांचा लग्न सराईत बक्कळ व्यवसाय होत आहे.लग्न सराईमुळे घोड्याला अधिक महत्त्व आले आहे. पायापडणी तसेच वरातीला घोडा लागत असल्यामुळे घोड्याला मागणी वाढत आहे. पायापडणीसाठी मुलींच्या पायापडणीसाठी वेगळा दर आहे. तर मुलांच्या पाया पडणीसाठी वेगळा दर आहे. ज्याप्रमाणे मुलाचे वजन असेल त्याप्रमाणे घोड्याचे दर सांगावे लागत आहेत. कारण ही गावदेव मिरवणूक कमीत कमी चार तास चालत असल्याने वजनदार व्यक्तीमुळे घोड्यालाही त्रास होऊ शकतो.-सोन्या जाधव, घोडा मालकग्रामीण भागात आता गावदेवासाठी मुलापेक्षा मुलींचीच घोड्यावरून जाण्यासाठी मागणी वाढली आहे.