शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीच्या वाटेने निघाली ‘व्यसनमुक्तीची वारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:51 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यामध्ये ४२७ पेक्षा जास्त दिंड्या सहभागी झाल्या आहे. त्यामधील ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देणारे वारकरी सर्वांचे लक्ष वेधत आहेत.‘माउली-माउली...’ अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिवे घाटातून साडेचार किलो मीटरचे नागमोडी अंतर पार करून सासवड येथे दाखल झाला. यावेळी व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात हरिनामाचा जप करीत वारीत सहभागी झाले आहेत.टाळ-मृदुंगचा तालावर व्यसनमुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ‘दारूत रंगला, संसार भंगला, संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू,’ असा संदेश देत ‘वारी व्यसनमुक्तीची’या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली.कीर्तनकार बंडातात्या कºहाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, गोशाळा आदी विविध विषयांवर काम सुरू आहे. व्यसनमुक्ती चळवळींमध्ये काम करत असताना गावपातळीवर व तालुका पातळीवर युवकांचे तसेच ग्रामस्थांचे संपूर्ण महाराष्ट्रभरात सुमारे २०० पेक्षा अधिक शिबिरे अथवा मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे पंधराशे तर दोन हजार युवकांना एकत्रित करून दरवर्षी राज्य पातळीवर चार दिवसांची १४ शिबिरे घेतली असून, या माध्यमातून हजारो युवकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली आहे.त्याचबरोबर गुटखा विक्री व अवैध दारूविक्रीच्या विरोधात युवकांनी व महिलांच्या मदतीने कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. अनेक ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून शासनाला दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे विविध पातळीवर काम करीत असताना पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत लाखो लोक सहभागी होतात. त्यामध्ये विविध स्तरातून आलेल्या लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी व्यसनमुक्ती संघाच्या वतीने वारी व्यसनमुक्तीची या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यात लोकांना दारू, गुटका व तंबाखू व्यसनापासून सुटका होण्यासाठी प्रबोधन केले जात आहे.दारूबंदीसाठी सह्यांची मोहीम...राज्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे इतर सर्व जिल्ह्यांमध्येही दारूबंदीचा निर्णय व्हावा, यासाठी मागील अनेक वर्षांपासून व्यसनमुक्ती युवक संघाच्या माध्यमातून सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली होती. ते लाखो लोकांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.