शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

By admin | Updated: June 24, 2017 15:10 IST

काळानुसार बदलला मेनू ; आता प्रतीक्षा वैष्णव भक्तांची

आॅनलाईन लोकमतमलटण ( जि. सातारा) , दि. २४ : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी प्रत्येक मंडळांनी एखादी दिंडी कायमची बांधून घेतलेली असते. ती दिंडी न चुकता दरवर्षी त्याच ठिकाणी उतरते. या अन्नदानासाठी तरुण मंडळांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. जसजसा समाज बदलत गेला, तसतशी या जेवणावळ्या आणि त्यातील मेनू ही बदलत गेले हे फलटणमध्ये दिसून येत आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती, टाळ, मृदुंगाची गरज करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. वैष्णव भक्तांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक फलटणनगरी नेहमीच सज्ज असते. श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा फलटणकर नागरिकांसाठी दिवाळीचा सणच असतो; आलेल्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत करण्यास मनोभावे फलटणकर सज्ज असतात. गेल्या सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा जोपासली जात आहे. पंढरपूर वारीमधील मध्य ठिकाण म्हणूनसुद्धा फलटणनगरीकडे पाहिले जाते. सातारा जिल्हा तसा आर्थिकदृष्ट्या सुगम आणि सुजलाम्-सुफलाम् आहे. त्यामुळे वारकऱ्याची आणि प्रत्येक विठ्ठल भक्तांची सर्व प्रकारची सेवा करण्यास येथील व्यावसायिक, नोकरदार, राजकीय नेतेमंडळी आणि गावोगावची तरुण मंडळे सज्ज असतात. पूर्वी वारकऱ्यांना झुणका-भाकरी तसेच मिचीर्चा ठेचा हमखास असायचा. गव्हाची खमंग लापसी मन तृप्त करायची. सांभर, भात-वरण, भाजी पुरी ही अलीकडच्या काळात पत्रावळीवर दिसायची. गेल्या चार-पाच वर्षांत यात खूपच बदल होत गेला. वारकरी लोकांना परिपूर्ण आहार कसा देता येईल, याकडे मंडळांनी आजच्या पिढीच्या तरुणांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. या बदलत्या जनरेशनमध्ये मेनूही बदलले. गुलाबजामुन, पनीर, लोणचे, पापड, मटकी, चपाती, भात, कोशिंबिर, पुलाव, खिचडी, भरलेलं वांगं आणि बरंच काही अशी यादी वाढतच गेली. चहा-पोह्यांचा नाश्ता तर असतोच; पण सरबत, कोकम, आईस्क्रीम असे वेगळे मेनूही दिसतात. पूर्वी जमिनीवर असेल त्या जागेत बसून पानांच्या पत्रावळीत पंगती वाढल्या जायच्या; आता टेबलखुर्ची आली. मलटणमधील काही मंडळांनी तर बुफे पद्धतही ठेवली आहे. पाण्याचे फिल्टर, जार ही उपलब्ध असतात. एकूणच हा सोहळा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कालातंराने जेवणावळीही बदलत गेली. त्यातील मेनू बदलले; पण वैष्णवांची भक्ती कायम तशीच आहे, चिरंतन.

फलटण, मलटण सज्ज...

फलटण तालुक्यातील वडजल, सुरवडी, खराडेवाडी या छोट्या गावांमधूनही जेवणावळीचे मोठे कार्यक्रम ठेवले जातात. मलटण-फलटण तर केव्हाच सज्ज आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे, टाळ मृदुंगाचा गजर करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. अन्नदानाची आमची ही परंपरा गेल्या २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. आता आमची पुढची पिढीही मनोभावे ही परंपरा जपत आहे.- अशोक गुंजवटे, सगुणामातानगर, मलटण - मुंबईवरून दरवर्षी येऊन सलग दोन दिवस माउली भक्तांसाठी जेवणाची सेवा आम्ही करतो. यातून मिळणारा आनंद वर्षभर आम्हाला ऊर्जा देत असतो. - शिवाजी दडस, उद्योजक, मुंबई