शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

By admin | Updated: June 24, 2017 15:10 IST

काळानुसार बदलला मेनू ; आता प्रतीक्षा वैष्णव भक्तांची

आॅनलाईन लोकमतमलटण ( जि. सातारा) , दि. २४ : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी प्रत्येक मंडळांनी एखादी दिंडी कायमची बांधून घेतलेली असते. ती दिंडी न चुकता दरवर्षी त्याच ठिकाणी उतरते. या अन्नदानासाठी तरुण मंडळांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. जसजसा समाज बदलत गेला, तसतशी या जेवणावळ्या आणि त्यातील मेनू ही बदलत गेले हे फलटणमध्ये दिसून येत आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती, टाळ, मृदुंगाची गरज करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. वैष्णव भक्तांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक फलटणनगरी नेहमीच सज्ज असते. श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा फलटणकर नागरिकांसाठी दिवाळीचा सणच असतो; आलेल्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत करण्यास मनोभावे फलटणकर सज्ज असतात. गेल्या सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा जोपासली जात आहे. पंढरपूर वारीमधील मध्य ठिकाण म्हणूनसुद्धा फलटणनगरीकडे पाहिले जाते. सातारा जिल्हा तसा आर्थिकदृष्ट्या सुगम आणि सुजलाम्-सुफलाम् आहे. त्यामुळे वारकऱ्याची आणि प्रत्येक विठ्ठल भक्तांची सर्व प्रकारची सेवा करण्यास येथील व्यावसायिक, नोकरदार, राजकीय नेतेमंडळी आणि गावोगावची तरुण मंडळे सज्ज असतात. पूर्वी वारकऱ्यांना झुणका-भाकरी तसेच मिचीर्चा ठेचा हमखास असायचा. गव्हाची खमंग लापसी मन तृप्त करायची. सांभर, भात-वरण, भाजी पुरी ही अलीकडच्या काळात पत्रावळीवर दिसायची. गेल्या चार-पाच वर्षांत यात खूपच बदल होत गेला. वारकरी लोकांना परिपूर्ण आहार कसा देता येईल, याकडे मंडळांनी आजच्या पिढीच्या तरुणांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. या बदलत्या जनरेशनमध्ये मेनूही बदलले. गुलाबजामुन, पनीर, लोणचे, पापड, मटकी, चपाती, भात, कोशिंबिर, पुलाव, खिचडी, भरलेलं वांगं आणि बरंच काही अशी यादी वाढतच गेली. चहा-पोह्यांचा नाश्ता तर असतोच; पण सरबत, कोकम, आईस्क्रीम असे वेगळे मेनूही दिसतात. पूर्वी जमिनीवर असेल त्या जागेत बसून पानांच्या पत्रावळीत पंगती वाढल्या जायच्या; आता टेबलखुर्ची आली. मलटणमधील काही मंडळांनी तर बुफे पद्धतही ठेवली आहे. पाण्याचे फिल्टर, जार ही उपलब्ध असतात. एकूणच हा सोहळा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कालातंराने जेवणावळीही बदलत गेली. त्यातील मेनू बदलले; पण वैष्णवांची भक्ती कायम तशीच आहे, चिरंतन.

फलटण, मलटण सज्ज...

फलटण तालुक्यातील वडजल, सुरवडी, खराडेवाडी या छोट्या गावांमधूनही जेवणावळीचे मोठे कार्यक्रम ठेवले जातात. मलटण-फलटण तर केव्हाच सज्ज आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे, टाळ मृदुंगाचा गजर करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. अन्नदानाची आमची ही परंपरा गेल्या २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. आता आमची पुढची पिढीही मनोभावे ही परंपरा जपत आहे.- अशोक गुंजवटे, सगुणामातानगर, मलटण - मुंबईवरून दरवर्षी येऊन सलग दोन दिवस माउली भक्तांसाठी जेवणाची सेवा आम्ही करतो. यातून मिळणारा आनंद वर्षभर आम्हाला ऊर्जा देत असतो. - शिवाजी दडस, उद्योजक, मुंबई