शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

पंढरीची वारी : जेवणावळीच्या तयारीत गुंतली तरुण मंडळे !

By admin | Updated: June 24, 2017 15:10 IST

काळानुसार बदलला मेनू ; आता प्रतीक्षा वैष्णव भक्तांची

आॅनलाईन लोकमतमलटण ( जि. सातारा) , दि. २४ : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी प्रत्येक मंडळांनी एखादी दिंडी कायमची बांधून घेतलेली असते. ती दिंडी न चुकता दरवर्षी त्याच ठिकाणी उतरते. या अन्नदानासाठी तरुण मंडळांची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. जसजसा समाज बदलत गेला, तसतशी या जेवणावळ्या आणि त्यातील मेनू ही बदलत गेले हे फलटणमध्ये दिसून येत आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती, टाळ, मृदुंगाची गरज करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. वैष्णव भक्तांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक व ऐतिहासिक फलटणनगरी नेहमीच सज्ज असते. श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा फलटणकर नागरिकांसाठी दिवाळीचा सणच असतो; आलेल्या प्रत्येक वारकऱ्याचे स्वागत करण्यास मनोभावे फलटणकर सज्ज असतात. गेल्या सातशे वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा जोपासली जात आहे. पंढरपूर वारीमधील मध्य ठिकाण म्हणूनसुद्धा फलटणनगरीकडे पाहिले जाते. सातारा जिल्हा तसा आर्थिकदृष्ट्या सुगम आणि सुजलाम्-सुफलाम् आहे. त्यामुळे वारकऱ्याची आणि प्रत्येक विठ्ठल भक्तांची सर्व प्रकारची सेवा करण्यास येथील व्यावसायिक, नोकरदार, राजकीय नेतेमंडळी आणि गावोगावची तरुण मंडळे सज्ज असतात. पूर्वी वारकऱ्यांना झुणका-भाकरी तसेच मिचीर्चा ठेचा हमखास असायचा. गव्हाची खमंग लापसी मन तृप्त करायची. सांभर, भात-वरण, भाजी पुरी ही अलीकडच्या काळात पत्रावळीवर दिसायची. गेल्या चार-पाच वर्षांत यात खूपच बदल होत गेला. वारकरी लोकांना परिपूर्ण आहार कसा देता येईल, याकडे मंडळांनी आजच्या पिढीच्या तरुणांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. या बदलत्या जनरेशनमध्ये मेनूही बदलले. गुलाबजामुन, पनीर, लोणचे, पापड, मटकी, चपाती, भात, कोशिंबिर, पुलाव, खिचडी, भरलेलं वांगं आणि बरंच काही अशी यादी वाढतच गेली. चहा-पोह्यांचा नाश्ता तर असतोच; पण सरबत, कोकम, आईस्क्रीम असे वेगळे मेनूही दिसतात. पूर्वी जमिनीवर असेल त्या जागेत बसून पानांच्या पत्रावळीत पंगती वाढल्या जायच्या; आता टेबलखुर्ची आली. मलटणमधील काही मंडळांनी तर बुफे पद्धतही ठेवली आहे. पाण्याचे फिल्टर, जार ही उपलब्ध असतात. एकूणच हा सोहळा दिवसेंदिवस वाढत गेला आणि कालातंराने जेवणावळीही बदलत गेली. त्यातील मेनू बदलले; पण वैष्णवांची भक्ती कायम तशीच आहे, चिरंतन.

फलटण, मलटण सज्ज...

फलटण तालुक्यातील वडजल, सुरवडी, खराडेवाडी या छोट्या गावांमधूनही जेवणावळीचे मोठे कार्यक्रम ठेवले जातात. मलटण-फलटण तर केव्हाच सज्ज आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे, टाळ मृदुंगाचा गजर करत येणाऱ्या वैष्णव भक्तांची. अन्नदानाची आमची ही परंपरा गेल्या २० वर्षांपासून अविरत सुरू आहे. आता आमची पुढची पिढीही मनोभावे ही परंपरा जपत आहे.- अशोक गुंजवटे, सगुणामातानगर, मलटण - मुंबईवरून दरवर्षी येऊन सलग दोन दिवस माउली भक्तांसाठी जेवणाची सेवा आम्ही करतो. यातून मिळणारा आनंद वर्षभर आम्हाला ऊर्जा देत असतो. - शिवाजी दडस, उद्योजक, मुंबई