शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भातशेती ठरतेय सुवर्णकाळ!

By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST

पेरणी सुरू : पाटण तालुका खरीप हंगाम

पाटण : पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ आणि कड्याकपाऱ्यांनी व्यापला असल्याने या ठिकाणी भातखाचराच्या शेतीला प्राधान्याने महत्त्व दिले जाते. त्यामुळे पावसाळ्यातील खरीप हंगाम हा येथील शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ बनून जातो. भातपिकाबरोबरच ज्वारी, सोयाबीन, उडीद, नाचणी, भुईमूग, वरी, चवळी आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात. सध्या शेतकरी पेरणीत मग्न असून, डोंगराळ भागातील गावांमध्ये भात, नाचणी तर सखल भागांमध्ये ज्वारी, हायब्रिड, सोयाबीन आदी पिकांची प्रामुख्याने पेरणी सुरू आहे.पाटण तालुक्यात चढ उताराच्या शेतजमिनींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लांबलचक शेतजमिनीऐवजी छोटे-छोटे जमिनींचे तुकडे त्यात बैलजोडीच्या साह्णाने खरीप पिकांची लागवड केली जात आहे. मोरगिरी, कोयन, मणदुरे, ढेबेवाडी या विभागातील दुर्गम भागांमध्ये अशा चढ उताराच्या शेतजमिनींमध्ये भात हे पीक प्रामुख्याने घेतले जाते. त्यासाठी बाजारात आलेले नवीन सुधारित बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तसेच खते, कीटकनाशके देखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहेत. सेंद्रिय खताचा वापर दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. या उलट तालुक्यातील मल्हारपेठ, मारुल हवेली, नवारस्ता, तारळे, विहे या परिसरात लागवड सुरू असून, खरीप पिकांमध्ये सोयाबीन, हायब्रिड, ज्वारी ही पिके घेतली जातात. (प्रतिनिधी)पारंपरिक पिकांकडे कल...डोंगराळ भागात अजूनही नाचणी, वरी ही पारंपरिक पिके घेण्याचा कल शेतकऱ्यांमध्ये आहे. ढेबेवाडीचा फसणी, निवी, वाल्मिक पठारावरील गावे तर मोरगिरी भागातील पांढरेपाणी, पाचगणी, कोयना विभागातील मळे-कोळणे, पांथरपुंज, गोठणे, चाफ्याचा खडक यांसारख्या दुर्गम भागामध्ये भात, नाचणी आदी खरीप पिकांसाठी मशागत सुरू असल्याचे दिसते.कृषी विभागाचे नियोजन कागदावरच...पाटण तालुका कृषी विभाग व पंचायत समितीचा कृषी विभाग हा खरीप हंगामाच्या पिकांसाठी जय्यत असल्याचा देखावा फक्त कागदोपत्री दाखविला जात आहे. या विभागाचे कृषी अधिकारी पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन व मदत करत नसल्याचे दिसून येत आहे.