शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाचगणीचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : नैसर्गिक चक्रीवादळाच्या दणक्याने पाचगणीमधील विद्युत वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचगणी : नैसर्गिक चक्रीवादळाच्या दणक्याने पाचगणीमधील विद्युत वाहिन्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला असून, गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पाचगणीतील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

पाचगणी शहर व परिसराला चक्रीवादळाचा प्रचंड फटका बसला आहे. वादळाने शहरातील विद्युत व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. यात उच्चदाब वाहिनीचे सहा खांब जमीनदोस्त झालेत तर लघु दाब वाहिनीच्या ५० खांबांचे नुकसान झाले. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता कंत्राटी ३० व महावितरणाचे २२ कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता आणखी दोन दिवस लागू शकतात.

पाचगणी शहराला होणारा पाणी पुरवठा महाबळेश्वर येथून होत असतो. त्याठिकाणी सुध्दा अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम पाचगणीला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.